शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

शेतमाल हमीदराने खरेदीसाठी सरकारच उतरणार बाजारात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 01:51 IST

अकोला : हमीपेक्षा कमी दराने मूग, उडिदाची खरेदी सुरू  आहे. शेतकर्‍यांचे हे होणारे नुकसान टाळण्यासाठी येत्या ३ ऑक्टोबर रोजी राज्यात शासकीय मूग खरेदी केंद्र सुरू  करण्यात येणार आहे. तसेच एक लाख टन सोयाबीन खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारच बाजारात उतरणार  असल्याचे वृत्त आहे.

ठळक मुद्देएक लाख टन सोयाबीन घेणार३ ऑक्टोबरपासून मूग खरेदी केंद्र होणार सुरू

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : हमीपेक्षा कमी दराने मूग, उडिदाची खरेदी सुरू  आहे. शेतकर्‍यांचे हे होणारे नुकसान टाळण्यासाठी येत्या ३ ऑक्टोबर रोजी राज्यात शासकीय मूग खरेदी केंद्र सुरू  करण्यात येणार आहे. तसेच एक लाख टन सोयाबीन खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारच बाजारात उतरणार  असल्याचे वृत्त आहे.यावर्षी मुगाचा काढणी हंगाम सुरू  होऊन एक महिना होत आला, तरी अद्याप शासकीय मूग खरेदी राज्यात सुरू  झाली नाही. सणासुदीचे दिवस असल्याने शेतकर्‍यांना मूग विकावा लागत आहे. केंद्र शासनाने मुगाचे हमीदर प्रतिक्विंटल ५ हजार ३७५ रुपये जाहीर केले असून, प्रतिक्विंटल २00 रुपये बोनसही देण्यात येणार आहे. म्हणजे शासनाने मूग खरेदी केल्यास शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल ५ हजार ५७५ रुपये दर मिळणार आहेत. पण, बाजारात सध्या ४ हजार ५८0 रुपये प्रतिक्विंटल दराने मूग खरेदी केली जात आहे.म्हणजेच एक हजार रुपयाने शेतकर्‍यांची लूट सुरू  आहे. सोयाबीनचे हमीदर २ हजार ८५0 रुपये आहेत. २00 रुपये बोनस मिळून शेतकर्‍यांना ३ हजार ५0 रुपये प्रतिक्विंटल मिळणार आहेत. पण, बाजारात सध्या सरासरी २,७00 रुपये दराने सोयाबीनची खरेदी केली जात आहे. प्रतवारीनुसार हे दर कमी जास्त होत आहेत. मागच्या वर्षी सोयाबीन खरेदीत शेतकर्‍यांची प्रचंड लूट झाली. १ हजार ८00 ते २ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने शेतकर्‍यांकडून सोयाबीनची खरेदी करण्यात आली. यावर्षी राज्यात ३७ लाखावर सोयाबीनचा पेरा झाला आहे. विदर्भात हे क्षेत्र १७ लाख हेक्टरवर आहे. विदर्भात सुरुवातीला पाऊस लांबल्याने या पिकावर त्याचे प्रतिकूल परिणाम झाले आहेत. या सर्व पृष्ठभूमीवर केंद्र शासनाने यावर्षी हमी दराने एक लाख टन सोयाबीन खेरदीचा निर्णय घेतला आहे. सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू  होत असल्याने लवकरच सोयाबीन खरेदी केली जाणार आहे.  

सरकार स्वस्थ बसलेले नाही, अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. तूर, मूग, उडीद आयातीवर नियंत्रण आणले. २00६ पासूनची निर्यात बंदी उठवली. खाद्य तेलावर १0 टक्के आयात शुल्क वाढवले, वाटले सोयाबीनचे दर वाढतील, पण एवढे सर्व करू नही हमीदर मिळत नसतील, तर शासनालाच बाजारात उतरावे लागणार असून, तसा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. राज्यातील एक लाख टन सोयाबीन खरेदी केले जाणार आहे. - पाशा पटेल, अध्यक्ष, राज्य कृषी मूल्य आयोग.-