शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

शेतमाल हमीदराने खरेदीसाठी सरकारच उतरणार बाजारात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 01:51 IST

अकोला : हमीपेक्षा कमी दराने मूग, उडिदाची खरेदी सुरू  आहे. शेतकर्‍यांचे हे होणारे नुकसान टाळण्यासाठी येत्या ३ ऑक्टोबर रोजी राज्यात शासकीय मूग खरेदी केंद्र सुरू  करण्यात येणार आहे. तसेच एक लाख टन सोयाबीन खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारच बाजारात उतरणार  असल्याचे वृत्त आहे.

ठळक मुद्देएक लाख टन सोयाबीन घेणार३ ऑक्टोबरपासून मूग खरेदी केंद्र होणार सुरू

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : हमीपेक्षा कमी दराने मूग, उडिदाची खरेदी सुरू  आहे. शेतकर्‍यांचे हे होणारे नुकसान टाळण्यासाठी येत्या ३ ऑक्टोबर रोजी राज्यात शासकीय मूग खरेदी केंद्र सुरू  करण्यात येणार आहे. तसेच एक लाख टन सोयाबीन खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारच बाजारात उतरणार  असल्याचे वृत्त आहे.यावर्षी मुगाचा काढणी हंगाम सुरू  होऊन एक महिना होत आला, तरी अद्याप शासकीय मूग खरेदी राज्यात सुरू  झाली नाही. सणासुदीचे दिवस असल्याने शेतकर्‍यांना मूग विकावा लागत आहे. केंद्र शासनाने मुगाचे हमीदर प्रतिक्विंटल ५ हजार ३७५ रुपये जाहीर केले असून, प्रतिक्विंटल २00 रुपये बोनसही देण्यात येणार आहे. म्हणजे शासनाने मूग खरेदी केल्यास शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल ५ हजार ५७५ रुपये दर मिळणार आहेत. पण, बाजारात सध्या ४ हजार ५८0 रुपये प्रतिक्विंटल दराने मूग खरेदी केली जात आहे.म्हणजेच एक हजार रुपयाने शेतकर्‍यांची लूट सुरू  आहे. सोयाबीनचे हमीदर २ हजार ८५0 रुपये आहेत. २00 रुपये बोनस मिळून शेतकर्‍यांना ३ हजार ५0 रुपये प्रतिक्विंटल मिळणार आहेत. पण, बाजारात सध्या सरासरी २,७00 रुपये दराने सोयाबीनची खरेदी केली जात आहे. प्रतवारीनुसार हे दर कमी जास्त होत आहेत. मागच्या वर्षी सोयाबीन खरेदीत शेतकर्‍यांची प्रचंड लूट झाली. १ हजार ८00 ते २ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने शेतकर्‍यांकडून सोयाबीनची खरेदी करण्यात आली. यावर्षी राज्यात ३७ लाखावर सोयाबीनचा पेरा झाला आहे. विदर्भात हे क्षेत्र १७ लाख हेक्टरवर आहे. विदर्भात सुरुवातीला पाऊस लांबल्याने या पिकावर त्याचे प्रतिकूल परिणाम झाले आहेत. या सर्व पृष्ठभूमीवर केंद्र शासनाने यावर्षी हमी दराने एक लाख टन सोयाबीन खेरदीचा निर्णय घेतला आहे. सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू  होत असल्याने लवकरच सोयाबीन खरेदी केली जाणार आहे.  

सरकार स्वस्थ बसलेले नाही, अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. तूर, मूग, उडीद आयातीवर नियंत्रण आणले. २00६ पासूनची निर्यात बंदी उठवली. खाद्य तेलावर १0 टक्के आयात शुल्क वाढवले, वाटले सोयाबीनचे दर वाढतील, पण एवढे सर्व करू नही हमीदर मिळत नसतील, तर शासनालाच बाजारात उतरावे लागणार असून, तसा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. राज्यातील एक लाख टन सोयाबीन खरेदी केले जाणार आहे. - पाशा पटेल, अध्यक्ष, राज्य कृषी मूल्य आयोग.-