शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

बाजार समितीतून दुस-या दिवशीही शेतमाल परत गेला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2016 02:08 IST

अकोल्यातील प्रकार; संतप्त शेतक-यांनी विचारला जाब.

अकोला, दि. ३ - बाजार समितीमध्ये मंगळवारपासून शेतकर्‍यांनी थेट खरेदीदारांना शेतमाल विकण्याची पद्धत सुरू झाली. अशा विक्रीसाठी मंगळवारी शेतकर्‍याला आपला माल नगदी पैसे मिळत नसल्याने परत न्यावा लागला. त्यानंतर बुधवारी दुसर्‍या दिवशी पुन्हा एका शेतकर्‍याला कमी भाव मिळाल्याच्या कारणावरून आपली तूर परत न्यावी लागली आहे.बाश्रीटाकळी तालुक्यातील पाटखेड येथील एका शेतकर्‍याने बुधवारी आपली पाच कट्टे तूर विक्रीसाठी आणली; परंतु या शेतकर्‍याच्या तुरीला केवळ ७५५0 रुपयेप्रति क्विंटलचा भाव मिळाल्याने शेतकर्‍याने आपली तूर विकण्यास नकार दिला. त्यानंतर काही शेतकर्‍यांनी एकत्र येऊन बाजार समितीच्या कार्यालयात जाऊन जाब विचारीत सुरू असलेल्या या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. प्राप्त माहितीनुसार या शेतकर्‍याला आपला शेतमाल परत नेण्यासाठी वाहन भाडे देण्यात आल्याचे समजले. या सगळ्या प्रकाराबाबत सचिवांशी संपर्क साधण्याचा अनेक वेळा प्रयत्न केल्यानंतरही त्यांनी उत्तर दिले नाही. जेव्हा अकोल्याच्या बाजारपेठेत शेतकर्‍याच्या तुरीला ७५५0 रुपयांचा भाव निश्‍चित झाला, तेव्हा याच दिवशी दुसरीकडे खामगावच्या बाजारपेठेत ७९५0 रुपयांपर्यंंत भाव मिळाल्याचे समजते. तेही खरेदीदाराने २ टक्के अडत देऊन हा भाव दिला आहे. अडत्याच्या मध्यस्थीशिवाय सरळ खरेदीदाराला शेतमाल विकण्यामागे शेतकर्‍याला तेवढा जास्त भाव मिळावा हा उद्देश आहे; परंतु या उद्देशालाच हरताळ फासल्या जात असल्याचे यावरून दिसून येते.