शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
4
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
5
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
6
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
7
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
8
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
9
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
10
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
11
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
12
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
13
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
14
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
15
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
16
Crime: चुलती- पुतण्याचे अनैतिक संबंध, नवरा ठरत होता अडसर, 'असा' काढला काटा!
17
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
18
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
19
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
20
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)

बाजार समितीतून दुस-या दिवशीही शेतमाल परत गेला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2016 02:08 IST

अकोल्यातील प्रकार; संतप्त शेतक-यांनी विचारला जाब.

अकोला, दि. ३ - बाजार समितीमध्ये मंगळवारपासून शेतकर्‍यांनी थेट खरेदीदारांना शेतमाल विकण्याची पद्धत सुरू झाली. अशा विक्रीसाठी मंगळवारी शेतकर्‍याला आपला माल नगदी पैसे मिळत नसल्याने परत न्यावा लागला. त्यानंतर बुधवारी दुसर्‍या दिवशी पुन्हा एका शेतकर्‍याला कमी भाव मिळाल्याच्या कारणावरून आपली तूर परत न्यावी लागली आहे.बाश्रीटाकळी तालुक्यातील पाटखेड येथील एका शेतकर्‍याने बुधवारी आपली पाच कट्टे तूर विक्रीसाठी आणली; परंतु या शेतकर्‍याच्या तुरीला केवळ ७५५0 रुपयेप्रति क्विंटलचा भाव मिळाल्याने शेतकर्‍याने आपली तूर विकण्यास नकार दिला. त्यानंतर काही शेतकर्‍यांनी एकत्र येऊन बाजार समितीच्या कार्यालयात जाऊन जाब विचारीत सुरू असलेल्या या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. प्राप्त माहितीनुसार या शेतकर्‍याला आपला शेतमाल परत नेण्यासाठी वाहन भाडे देण्यात आल्याचे समजले. या सगळ्या प्रकाराबाबत सचिवांशी संपर्क साधण्याचा अनेक वेळा प्रयत्न केल्यानंतरही त्यांनी उत्तर दिले नाही. जेव्हा अकोल्याच्या बाजारपेठेत शेतकर्‍याच्या तुरीला ७५५0 रुपयांचा भाव निश्‍चित झाला, तेव्हा याच दिवशी दुसरीकडे खामगावच्या बाजारपेठेत ७९५0 रुपयांपर्यंंत भाव मिळाल्याचे समजते. तेही खरेदीदाराने २ टक्के अडत देऊन हा भाव दिला आहे. अडत्याच्या मध्यस्थीशिवाय सरळ खरेदीदाराला शेतमाल विकण्यामागे शेतकर्‍याला तेवढा जास्त भाव मिळावा हा उद्देश आहे; परंतु या उद्देशालाच हरताळ फासल्या जात असल्याचे यावरून दिसून येते.