शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:18 IST

शेतकरी ते थेट विक्री याबाबत एक चांगली व्यवस्था निर्माण करण्यासाठी शासनाने आता पाऊल उचलले आहे. बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला ...

शेतकरी ते थेट विक्री याबाबत एक चांगली व्यवस्था निर्माण करण्यासाठी शासनाने आता पाऊल उचलले आहे. बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव, ग्राहकांना ताजी फळे, भाजीपाला वाजवी दरात उपलब्ध होईल अशा दुहेरी उद्देशाची ही संकल्पना राज्यात सुरू करण्यात आली आहे. तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्यांकडे पुरवठा साखळी कार्यरत राहण्यासाठी व ग्राहकांच्या मागणीप्रमाणे पुरवठा होण्यासाठी या अभियानात थेट विक्रीसाठी इच्छा व्यक्त करणाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांचे लागवड क्षेत्र, वाण निवड, निविष्ठा वापराबाबत व बाजारात असलेल्या मागणीबाबत जागृती करण्याचे महत्त्वाचे काम कृषी विभागाकडे देण्यात आले आहे. फळे भाजीपाला व इतर शेतीमाल उत्पादित झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांमध्ये शेतीमालाची स्वच्छता व प्रतवारी करणे, ग्रेडिंग करणे, पॅकिंग करणे, विक्री व्यवस्थापन याबाबत तांत्रिक प्रशिक्षणाची सोयही करण्यात आली आहे. जिल्ह्यात ७०० शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांचे लक्ष्यांक देण्यात आले होते. यापैकी ६८७ शेतकरी गट व १३ शेतकरी उत्पादक कंपन्यांना विक्री स्थळांशी जोडण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील ३०० ठिकाणी प्रत्यक्षात माल विक्री सुरू झाली आहे. कृषी विभागाच्या आत्मा विभागांतर्गत ही योजना राबविल्या जात आहे.

--बॉक्स--

मालाची ८,४८८ मेट्रिक टन विक्री

रयत बाजार योजनेंतर्गत ३०० स्थळांवर ८ हजार ४८८ मेट्रिक टन मालाची विक्री करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक अकोला तालुक्यात ७८०० मे. टन मालाची विक्री झाली आहे.

--बॉक्स--

मिळालेला लक्ष्यांक

७००

निवड झालेले गट व उत्पादक कंपन्या

७००

जोडलेले शेतकरी गट

६८७

जोडलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्या

१३

प्रत्यक्षात विक्री सुरू असलेली स्थळे

३००

महिनाअखेर झालेली विक्री (मे.टन)

८४८८.५०

--बॉक्स--

लॉकडाऊनमध्ये १०.८४ कोटींची उलाढाल

मागील वर्षी लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांपर्यंत शेतमाल पोहोचविला होता. कुठलीही योजना कार्यान्वित नसताना जून २०२० महिन्यापर्यंत १० कोटी ८४ लाख रुपयांची उलाढाल झाली होती.