शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं टम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
5
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
6
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
7
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
8
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
9
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
10
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
12
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
13
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
14
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
15
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
16
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
17
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
18
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
19
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
20
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल

लोकाभिमुख कारभारासाठी जिल्हा व तालुका स्तरावर समित्या

By admin | Updated: July 25, 2015 01:51 IST

ग्राहकांच्या सोयीसाठी महावितरणचा पुढाकार

अकोला: विद्युत पुरवठा अचानक खंडित होणे, शॉर्टसर्किट होणे, जास्त वीज देयक येणे आदी समस्या नियमित उद्भवल्यास ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो. यासंदर्भात दाद कुठे मागावी, याचीही माहिती ग्राहकांना नसते. यापृष्ठभूमिवर महावितरणचा कारभार अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि प्रभावी होण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरीय विद्युत वितरण नियंत्रण समित्या स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. महावितरणच्या ग्राहकांना अनेक समस्या भेडसावत असतात; मात्र त्या सोडविण्यासाठी योग्य पर्यायांची अनेकांना माहिती नसते. महावितरणकडे तक्रार करावी, तर योग्य प्रतिसाद न मिळाल्याने नागरिकांना अनेक अडचणी येतात. ग्राहकांच्या समस्या त्वरित सुटाव्या व महावितरणचा कारभार लोकाभिमुख व्हावा, याकरिता महावितरणच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून महावितरण आपल्या दारी हा उपक्रम नुकताच राबविण्यात आला. आता जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय विद्युत वितरण नियंत्रण समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीच्यावतीने विविध योजनांचा आढावा, वीज बिलाची वसुली, विजेचा गैरवापर आणि हा गैरवापर रोखण्यासाठी केले जाणारे प्रयत्न, पैसे भरूनही वीज जोडणी न मिळालेल्या कृषिपंप व घरगुती ग्राहकांच्या जोडण्यांचा आढावा घेणे, ग्राहकांना खात्रीशीर विद्युत पुरवठा व चांगली सेवा मिळावी यासाठी मार्गदर्शन करणे, समितीच्या कार्यक्षेत्रातील सर्व विभाग भारनियमनमुक्त करणे अशा विविध बाबींचा समितीतर्फे आढावा घेण्यात येणार आहे. समितीच्या सूचना अथवा मार्गदर्शन शासन स्तरावर पाठविण्यात येणार असून, त्यावर उपाययोजना करण्यात येणार आहेत. *फिडरनिहाय राहणार व्यवस्थापक ग्राहकांच्या सेवेत आणखी सुधारणा व्हावी, ज्या फिडरवर भारनियमन आहे, अशा फिडरवरील भारनियमन कमी व्हावे आणि ग्राहकांना दिलासा मिळावा, तसेच वितरण कंपनीच्या महसुलात वाढ व्हावी, यासाठी राज्यात फिडरनिहाय व्यवस्थापक नेमण्याचा निर्णय ऊर्जामंत्र्यांनी घेतला आहे. प्रारंभी ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे.