शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

पातूर तालुक्यात होणार सीएनजी निर्मिती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:34 IST

एमसीएल अंतर्गत शीलाबाई शेतकरी उत्पादन संघटनेच्या पुढाकाराने भारतातील पहिले सीएनजी युनिट पातूर तालुक्यात उभारण्यात येणार आहे. तालुक्यातील शीलाबाई प्रोड्युसर ...

एमसीएल अंतर्गत शीलाबाई शेतकरी उत्पादन संघटनेच्या पुढाकाराने भारतातील पहिले सीएनजी युनिट पातूर तालुक्यात उभारण्यात येणार आहे. तालुक्यातील शीलाबाई प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, तालुक्यातील बायोफ्युएल कंपनी, शीला क्लीनफ्युएल लिमिटेड, एमसीएल, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पातूर तालुक्यातील सुमारे एक लक्ष कि.ग्रॅ. दररोज निर्मिती क्षमतेच्या बायो-सीएनजी प्रकल्पाची सुरुवात होत आहे. तालुक्यात स्वच्छ इंधन बायोफ्युएल व कँसर केमिकलमुक्त सेंद्रिय शेती या दोन क्षेत्रांचा विकास या प्रकल्पाद्वारे करण्यात येणार आहे. सदर प्रकल्पामुळे संपूर्ण तालुक्याला इंधनामध्ये स्वयंपूर्ण करणार असून, त्यामध्ये वाहतुकीचे इंधन पेट्रोल, डिझेल, खनिज, सीएनजी या आंतरराष्ट्रीय गुणवत्तेच्या इंधनाची निर्मिती करण्यात येणार आहे. स्वच्छ इंधनामुळे तालुका प्रदूषणमुक्त होण्यासाठी मदत होणार आहे. सदर इंधन निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल शेतातच निर्माण होणार असून, कर्जमुक्त अशा करार शेतीमार्फत शेतकाऱ्यांसाठी शाश्वत व चांगले उत्पन्न देऊन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी कार्य होणार आहे. या प्रकल्पांतर्गत सुमारे २ हजार हेक्टर ते एक लाख हेक्टरपर्यंत करार शेती करण्यात येणार आहे. सदर प्रकल्पामुळे अंदाजित २ हजारांवर रोजगार तालुक्यात निर्माण होणार आहे. व्यवसायांच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक कुटुंबामध्ये शाश्वत व कायमचे उत्पन्न देण्याचा प्रयत्न राहणार आहे, अशी माहिती संचालक छगन राठोड यांनी दिली.

या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा १६ डिसेंबर रोजी सकाळी होणार आहे. या सोहळ्याचे अध्यक्ष डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले राहतील. कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून मुंबईचे उपजिल्हाधिकारी डॉ. शाम शिवाजी घोलप, आमदार नितीन देशमुख, आमदार अमोल मिटकरी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सावित्री राठोड, पातूर पंचायत समिती सभापती लक्ष्मी डाखोरे, जिल्हा परिषद सदस्य अर्चना राऊत, पातूर पंचायत समिती उपसभापती नजम उन्निसा मोहम्मद इब्राहिम, कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. महेंद्र नागदेवे, वनविभागाचे उपवनसंरक्षक विजय माने, तालुका कृषी अधिकारी विनोद शिंदे, एकात्मिक बालविकास अधिकारी समाधान राठोड, ठाणेदार हरीश गवळी, राहुल वाघ, आरोग्य अधिकारी विजय जाधव राहणार आहेत. विशेष उपस्थिती म्हणून कार्थिक रावल, किशोर राठोड, रणजित दातीर, वैभव चव्हाण, छगन राठोड आदी प्रामुख्याने उपस्थित राहतील.