शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री, पुरवठा मंत्र्यांना फासावर चढवा - रघुनाथ पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 01:38 IST

अकोला : राज्यात मोठय़ा प्रमाणात तुरीचे उत्पादन झाले; परंतु तुरीला भाव नाही. नाफेडच्या तूर खरेदीसाठी जाचक अटी लादल्या आणि दुसरीकडे भाजप सरकारने परदेशातून १३५ रुपये किलो दराप्रमाणे तूर आयात केली. हा सारा प्रकार शेतकर्‍यांची फसवणुक करून त्यांना आत्महत्यांसाठी प्रवृत्त करणारा आहे. याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, पुरवठा मंत्री गिरीश बापट हेच जबाबदार आहेत. त्यांच्यावर शेतकरी हत्येचे गुन्हे दाखल करून त्यांना फासावर लटकवले पाहिजे, असा घणाघाती आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी येथे केला. 

ठळक मुद्देशेतकरी जागर यात्रा अकोल्यात परदेशातून तूर आयात करण्याची गरज काय?

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यात मोठय़ा प्रमाणात तुरीचे उत्पादन झाले; परंतु तुरीला भाव नाही. नाफेडच्या तूर खरेदीसाठी जाचक अटी लादल्या आणि दुसरीकडे भाजप सरकारने परदेशातून १३५ रुपये किलो दराप्रमाणे तूर आयात केली. हा सारा प्रकार शेतकर्‍यांची फसवणुक करून त्यांना आत्महत्यांसाठी प्रवृत्त करणारा आहे. याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, पुरवठा मंत्री गिरीश बापट हेच जबाबदार आहेत. त्यांच्यावर शेतकरी हत्येचे गुन्हे दाखल करून त्यांना फासावर लटकवले पाहिजे, असा घणाघाती आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी येथे केला. महाराष्ट्रातील ४0 शेतकरी संघटनांची असलेली सुकाणू समितीच्यावतीने शहिद दिन २३ मार्च रोजी हुतात्मा अभिवादन शेतकरी जागर यात्रा काढण्यात आली. ही यात्रा शुक्रवारी दुपारी अकोल्यात पोहोचली. यावेळी शासकीय विश्रामगृहात सायंकाळी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. राज्यात मोठय़ा प्रमाणात तुरीचे उत्पादन झाले असताना, परदेशातून तूर आयात करण्याची गरजच काय? असा प्रश्न उपस्थित करीत, तूर खरेदीत मोठा घोटाळा या सरकारने केला आहे. शेतकर्‍यांना आत्महत्या करण्यास मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारचे धोरण भाग पाडत आहे. शेतकर्‍यांची ५0 रुपये किलो दराने तूर खरेदी करण्यास सरकार तयार नाही आणि परदेशातून १३५ रुपये किलो दराने तूर आयात केली जाते. शेतकर्‍यांच्या मालाला आधारभूत भाव देऊ आणि ५0 टक्के नफा देण्याचे आश्‍वासन भाजपने दिले होते; परंतु शेतकर्‍यांना आधारभूत भाव तर मिळालाच नाही, उलट मोदींच्या सत्ताकाळात ३५ टक्क्यांनी शेतकरी आत्महत्या वाढल्याचा आरोप रघुनाथ पाटील यांनी केला. त्यामुळेच शेतकर्‍यांना जागरूक करण्यासाठी शेतकरी संघटनेने जागर यात्रा काढली. सत्ताधारी व विरोधी पक्ष मिळून खाताहेत. सरकारला अडचणीत आणण्यासाठी विरोधी पक्षांनी काहीही केलेले नाही. शेतकर्‍यांविषयी कोणालाही कळवळा नाही. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे चारही पक्ष उद्योगपतींच्या पैशांवर चालत असल्याचाही आरोप रघुनाथ पाटील यांनी केला. भाजप सरकारच्या विरोधात शेतकरी संघटनांच्यावतीने  प्रत्येक जिल्हय़ात १0 मे रोजी सविनय कायदेभंग आंदोलन करून जेलभरो करण्यात येईल, अशी माहिती यांनी यावेळी दिली. पत्रपरिषदेला कष्टकरी शेतकरी संघाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष कापुसदे, दिनकर दाभाडे, कालिदास आपेट, किशोर ढमाले उपस्थित होते. 

भाजपचा मेळावा म्हणजे पैशांचा चुराडाशेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी व वीज बिल माफीसाठी यांच्याकडे पैसा नाही आणि भाजपच्या मेळाव्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केला जातो. हा जनतेच्या पैशांचा दुरुपयोग आहे, असा आरोप करीत रघुनाथ पाटील यांनी, आगामी निवडणुका भाजप केवळ पैशांच्या भरवशावरच लढणार आहे, असेही ते म्हणाले.-

टॅग्स :Akolaअकोला