शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

मुख्यमंत्री, पुरवठा मंत्र्यांना फासावर चढवा - रघुनाथ पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 01:38 IST

अकोला : राज्यात मोठय़ा प्रमाणात तुरीचे उत्पादन झाले; परंतु तुरीला भाव नाही. नाफेडच्या तूर खरेदीसाठी जाचक अटी लादल्या आणि दुसरीकडे भाजप सरकारने परदेशातून १३५ रुपये किलो दराप्रमाणे तूर आयात केली. हा सारा प्रकार शेतकर्‍यांची फसवणुक करून त्यांना आत्महत्यांसाठी प्रवृत्त करणारा आहे. याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, पुरवठा मंत्री गिरीश बापट हेच जबाबदार आहेत. त्यांच्यावर शेतकरी हत्येचे गुन्हे दाखल करून त्यांना फासावर लटकवले पाहिजे, असा घणाघाती आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी येथे केला. 

ठळक मुद्देशेतकरी जागर यात्रा अकोल्यात परदेशातून तूर आयात करण्याची गरज काय?

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यात मोठय़ा प्रमाणात तुरीचे उत्पादन झाले; परंतु तुरीला भाव नाही. नाफेडच्या तूर खरेदीसाठी जाचक अटी लादल्या आणि दुसरीकडे भाजप सरकारने परदेशातून १३५ रुपये किलो दराप्रमाणे तूर आयात केली. हा सारा प्रकार शेतकर्‍यांची फसवणुक करून त्यांना आत्महत्यांसाठी प्रवृत्त करणारा आहे. याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, पुरवठा मंत्री गिरीश बापट हेच जबाबदार आहेत. त्यांच्यावर शेतकरी हत्येचे गुन्हे दाखल करून त्यांना फासावर लटकवले पाहिजे, असा घणाघाती आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी येथे केला. महाराष्ट्रातील ४0 शेतकरी संघटनांची असलेली सुकाणू समितीच्यावतीने शहिद दिन २३ मार्च रोजी हुतात्मा अभिवादन शेतकरी जागर यात्रा काढण्यात आली. ही यात्रा शुक्रवारी दुपारी अकोल्यात पोहोचली. यावेळी शासकीय विश्रामगृहात सायंकाळी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. राज्यात मोठय़ा प्रमाणात तुरीचे उत्पादन झाले असताना, परदेशातून तूर आयात करण्याची गरजच काय? असा प्रश्न उपस्थित करीत, तूर खरेदीत मोठा घोटाळा या सरकारने केला आहे. शेतकर्‍यांना आत्महत्या करण्यास मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारचे धोरण भाग पाडत आहे. शेतकर्‍यांची ५0 रुपये किलो दराने तूर खरेदी करण्यास सरकार तयार नाही आणि परदेशातून १३५ रुपये किलो दराने तूर आयात केली जाते. शेतकर्‍यांच्या मालाला आधारभूत भाव देऊ आणि ५0 टक्के नफा देण्याचे आश्‍वासन भाजपने दिले होते; परंतु शेतकर्‍यांना आधारभूत भाव तर मिळालाच नाही, उलट मोदींच्या सत्ताकाळात ३५ टक्क्यांनी शेतकरी आत्महत्या वाढल्याचा आरोप रघुनाथ पाटील यांनी केला. त्यामुळेच शेतकर्‍यांना जागरूक करण्यासाठी शेतकरी संघटनेने जागर यात्रा काढली. सत्ताधारी व विरोधी पक्ष मिळून खाताहेत. सरकारला अडचणीत आणण्यासाठी विरोधी पक्षांनी काहीही केलेले नाही. शेतकर्‍यांविषयी कोणालाही कळवळा नाही. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे चारही पक्ष उद्योगपतींच्या पैशांवर चालत असल्याचाही आरोप रघुनाथ पाटील यांनी केला. भाजप सरकारच्या विरोधात शेतकरी संघटनांच्यावतीने  प्रत्येक जिल्हय़ात १0 मे रोजी सविनय कायदेभंग आंदोलन करून जेलभरो करण्यात येईल, अशी माहिती यांनी यावेळी दिली. पत्रपरिषदेला कष्टकरी शेतकरी संघाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष कापुसदे, दिनकर दाभाडे, कालिदास आपेट, किशोर ढमाले उपस्थित होते. 

भाजपचा मेळावा म्हणजे पैशांचा चुराडाशेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी व वीज बिल माफीसाठी यांच्याकडे पैसा नाही आणि भाजपच्या मेळाव्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केला जातो. हा जनतेच्या पैशांचा दुरुपयोग आहे, असा आरोप करीत रघुनाथ पाटील यांनी, आगामी निवडणुका भाजप केवळ पैशांच्या भरवशावरच लढणार आहे, असेही ते म्हणाले.-

टॅग्स :Akolaअकोला