शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

मुख्यमंत्री, पुरवठा मंत्र्यांना फासावर चढवा - रघुनाथ पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 01:38 IST

अकोला : राज्यात मोठय़ा प्रमाणात तुरीचे उत्पादन झाले; परंतु तुरीला भाव नाही. नाफेडच्या तूर खरेदीसाठी जाचक अटी लादल्या आणि दुसरीकडे भाजप सरकारने परदेशातून १३५ रुपये किलो दराप्रमाणे तूर आयात केली. हा सारा प्रकार शेतकर्‍यांची फसवणुक करून त्यांना आत्महत्यांसाठी प्रवृत्त करणारा आहे. याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, पुरवठा मंत्री गिरीश बापट हेच जबाबदार आहेत. त्यांच्यावर शेतकरी हत्येचे गुन्हे दाखल करून त्यांना फासावर लटकवले पाहिजे, असा घणाघाती आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी येथे केला. 

ठळक मुद्देशेतकरी जागर यात्रा अकोल्यात परदेशातून तूर आयात करण्याची गरज काय?

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यात मोठय़ा प्रमाणात तुरीचे उत्पादन झाले; परंतु तुरीला भाव नाही. नाफेडच्या तूर खरेदीसाठी जाचक अटी लादल्या आणि दुसरीकडे भाजप सरकारने परदेशातून १३५ रुपये किलो दराप्रमाणे तूर आयात केली. हा सारा प्रकार शेतकर्‍यांची फसवणुक करून त्यांना आत्महत्यांसाठी प्रवृत्त करणारा आहे. याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, पुरवठा मंत्री गिरीश बापट हेच जबाबदार आहेत. त्यांच्यावर शेतकरी हत्येचे गुन्हे दाखल करून त्यांना फासावर लटकवले पाहिजे, असा घणाघाती आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी येथे केला. महाराष्ट्रातील ४0 शेतकरी संघटनांची असलेली सुकाणू समितीच्यावतीने शहिद दिन २३ मार्च रोजी हुतात्मा अभिवादन शेतकरी जागर यात्रा काढण्यात आली. ही यात्रा शुक्रवारी दुपारी अकोल्यात पोहोचली. यावेळी शासकीय विश्रामगृहात सायंकाळी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. राज्यात मोठय़ा प्रमाणात तुरीचे उत्पादन झाले असताना, परदेशातून तूर आयात करण्याची गरजच काय? असा प्रश्न उपस्थित करीत, तूर खरेदीत मोठा घोटाळा या सरकारने केला आहे. शेतकर्‍यांना आत्महत्या करण्यास मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारचे धोरण भाग पाडत आहे. शेतकर्‍यांची ५0 रुपये किलो दराने तूर खरेदी करण्यास सरकार तयार नाही आणि परदेशातून १३५ रुपये किलो दराने तूर आयात केली जाते. शेतकर्‍यांच्या मालाला आधारभूत भाव देऊ आणि ५0 टक्के नफा देण्याचे आश्‍वासन भाजपने दिले होते; परंतु शेतकर्‍यांना आधारभूत भाव तर मिळालाच नाही, उलट मोदींच्या सत्ताकाळात ३५ टक्क्यांनी शेतकरी आत्महत्या वाढल्याचा आरोप रघुनाथ पाटील यांनी केला. त्यामुळेच शेतकर्‍यांना जागरूक करण्यासाठी शेतकरी संघटनेने जागर यात्रा काढली. सत्ताधारी व विरोधी पक्ष मिळून खाताहेत. सरकारला अडचणीत आणण्यासाठी विरोधी पक्षांनी काहीही केलेले नाही. शेतकर्‍यांविषयी कोणालाही कळवळा नाही. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे चारही पक्ष उद्योगपतींच्या पैशांवर चालत असल्याचाही आरोप रघुनाथ पाटील यांनी केला. भाजप सरकारच्या विरोधात शेतकरी संघटनांच्यावतीने  प्रत्येक जिल्हय़ात १0 मे रोजी सविनय कायदेभंग आंदोलन करून जेलभरो करण्यात येईल, अशी माहिती यांनी यावेळी दिली. पत्रपरिषदेला कष्टकरी शेतकरी संघाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष कापुसदे, दिनकर दाभाडे, कालिदास आपेट, किशोर ढमाले उपस्थित होते. 

भाजपचा मेळावा म्हणजे पैशांचा चुराडाशेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी व वीज बिल माफीसाठी यांच्याकडे पैसा नाही आणि भाजपच्या मेळाव्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केला जातो. हा जनतेच्या पैशांचा दुरुपयोग आहे, असा आरोप करीत रघुनाथ पाटील यांनी, आगामी निवडणुका भाजप केवळ पैशांच्या भरवशावरच लढणार आहे, असेही ते म्हणाले.-

टॅग्स :Akolaअकोला