शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

ढगाळ वातावरण, पावसाची प्रतीक्षाच!

By admin | Updated: July 7, 2014 00:56 IST

वर्‍हाडात ढगाळ वातावरण असले तरी पाऊस पडत नाही. पेरणीला उशीर झाल्यामुळे पाऊस पडल्याबरोबरच पेरणी करण्याच्या तयारीत असलेला शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

अकोला- गत दोन दिवसांपासून वर्‍हाडात ढगाळ वातावरण असले तरी पाऊस पडत नाही. पेरणीला उशीर झाल्यामुळे पाऊस पडल्याबरोबरच पेरणी करण्याच्या तयारीत असलेला शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, सध्या वातावरणात आद्र्रता कमी असल्यामुळे पेरणीयोग्य पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे मुबलक पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नका, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरी अद्याप वर्‍हाडात पाऊस पडला नाही. अर्धा हंगाम झाला असूनही पाऊस आला नसल्यामुळे ग्रामीण भागात चिंताग्रस्त वातावरण असून, शेतकर्‍यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. त्यातच गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये आशा निर्माण झाली होती. पेरणीसाठी लागणारे बियाणे व खत आधीच विकत घेऊन ठेवले असून, शेतकरी पाऊस येताच पेरणीच्या तयारीत आहे. मात्र, गत दोन दिवसांपासून पाणी पडले नाही. काही शेतकर्‍यांनी पेरणीला सुरुवातही केली आहे. मात्र, जमिनीतील तापमान अजून कायम असून, यामध्ये पेरणी केली तर बियाणे जळण्याची शक्यता आहे. सध्या वातावरणात आद्र्रता कमी असल्यामुळे मुबलक पाऊस पडण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अशावेळी शेतकर्‍यांनी पेरणी केली तर पेरणी उलटण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते. त्यामुळे १00 मि.मी. पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका, असा सल्ला कृषी संशोधकांनी दिला आहे. वर्‍हाडात १५ ते २0 जुलैनंतरच चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.