शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
9
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
10
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
11
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
12
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
13
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
14
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
15
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
16
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
17
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
18
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
19
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
20
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!

पणन महासंघ मार्चअखेर करणार कापूस खरेदी केंद्रे बंद!

By admin | Updated: March 8, 2016 02:49 IST

बाजारात २२0 लाख गाठी कापूस खरेदी ; सव्वाशे लाख गाठींची व्यापा-यांकडे साठवणूक.

राजरत्न सिरसाट/अकोलायावर्षी कापसाचे उत्पादन घटल्याने अल्पभूधारक, छोट्या शेतकर्‍यांकडील कापूस जवळपास संपला आहे. त्यामुळे महाराष्ट्र कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघ व भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) ची कापूस खरेदी केंद्रेही ठप्प पडली आहेत. परिणामी मार्चअखेर कापूस खरेदी बंद करण्याचा निर्णय पणन महासंघाने घेतला आहे. दरम्यान, खाजगी बाजारात आजमितीस २२0 लाख गाठी कापूूस शेतकर्‍यांनी विकला असून, जवळपास १२५ लाख गाठीहून अधिक कापूस व्यापार्‍यांनी दरवाढीच्या प्रतीक्षेत साठवूण ठेवल्याचा अंदाज आहे.महाराष्ट्रात यावर्षी ६५ लाख गाठी कापूस उत्पादन होण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत येथील शेतकर्‍यांनी त्यांच्याकडील जवळपास कापूस विकला आहे, तर येथील २५ टक्के व्यापार्‍यांनी दरवाढीच्या प्रतीक्षेत कापूस साठवून ठेवल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. पणन महांसघाने यावर्षी अडीच लाख क्विंटल, तर सीसीआयने साडेपाच लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे. दरम्यान, देशातील खासगी बाजारात जवळपास २२0 लाख गाठी कापसाची खरेदी झाली आहे. यावर्षी देशांतर्गत ३५६ ते ३५८ लाख गाठी कापूस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आहे. आतापर्यंत २२0 लाख गाठी कापसाची खरेदी झाल्याने जवळपास १२५ लाख गाठीच्यावर कापूस अद्याप बाजारात यायचा आहे. बहुतांश शेतकर्‍यांनी त्यांच्याकडील कापूस विकल्याने, १२५ लाखांच्यावर कापसाच्या ज्या गाठी आहेत, त्या व्यापार्‍यांनी दरवाढीच्या प्रतीक्षेत साठवून ठेवल्या आहेत. यात काही सधन शेतकर्‍यांचाही समावेश आहे. केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने यावर्षी कापसाचे हमीदर ४१00 रुपये प्रतिक्विंटल जाहीर केले. तथापि, महाराष्ट्रात प्रतवारीचे निकष लावून ह्यझोडाह्णच्या नावाखाली अनेक ठिकाणी ३५00 रुपये क्विंटल दराने अल्पभूधारक शेतकर्‍यांकडून कापूस खरेदी करण्यात आला. आर्थिक गरजेपोटी अल्पभूधारक शेतकर्‍यांनी व्यापार्‍यांना कापूस विकला आहे.