शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पणन महासंघ मार्चअखेर करणार कापूस खरेदी केंद्रे बंद!

By admin | Updated: March 8, 2016 02:49 IST

बाजारात २२0 लाख गाठी कापूस खरेदी ; सव्वाशे लाख गाठींची व्यापा-यांकडे साठवणूक.

राजरत्न सिरसाट/अकोलायावर्षी कापसाचे उत्पादन घटल्याने अल्पभूधारक, छोट्या शेतकर्‍यांकडील कापूस जवळपास संपला आहे. त्यामुळे महाराष्ट्र कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघ व भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) ची कापूस खरेदी केंद्रेही ठप्प पडली आहेत. परिणामी मार्चअखेर कापूस खरेदी बंद करण्याचा निर्णय पणन महासंघाने घेतला आहे. दरम्यान, खाजगी बाजारात आजमितीस २२0 लाख गाठी कापूूस शेतकर्‍यांनी विकला असून, जवळपास १२५ लाख गाठीहून अधिक कापूस व्यापार्‍यांनी दरवाढीच्या प्रतीक्षेत साठवूण ठेवल्याचा अंदाज आहे.महाराष्ट्रात यावर्षी ६५ लाख गाठी कापूस उत्पादन होण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत येथील शेतकर्‍यांनी त्यांच्याकडील जवळपास कापूस विकला आहे, तर येथील २५ टक्के व्यापार्‍यांनी दरवाढीच्या प्रतीक्षेत कापूस साठवून ठेवल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. पणन महांसघाने यावर्षी अडीच लाख क्विंटल, तर सीसीआयने साडेपाच लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे. दरम्यान, देशातील खासगी बाजारात जवळपास २२0 लाख गाठी कापसाची खरेदी झाली आहे. यावर्षी देशांतर्गत ३५६ ते ३५८ लाख गाठी कापूस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आहे. आतापर्यंत २२0 लाख गाठी कापसाची खरेदी झाल्याने जवळपास १२५ लाख गाठीच्यावर कापूस अद्याप बाजारात यायचा आहे. बहुतांश शेतकर्‍यांनी त्यांच्याकडील कापूस विकल्याने, १२५ लाखांच्यावर कापसाच्या ज्या गाठी आहेत, त्या व्यापार्‍यांनी दरवाढीच्या प्रतीक्षेत साठवून ठेवल्या आहेत. यात काही सधन शेतकर्‍यांचाही समावेश आहे. केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने यावर्षी कापसाचे हमीदर ४१00 रुपये प्रतिक्विंटल जाहीर केले. तथापि, महाराष्ट्रात प्रतवारीचे निकष लावून ह्यझोडाह्णच्या नावाखाली अनेक ठिकाणी ३५00 रुपये क्विंटल दराने अल्पभूधारक शेतकर्‍यांकडून कापूस खरेदी करण्यात आला. आर्थिक गरजेपोटी अल्पभूधारक शेतकर्‍यांनी व्यापार्‍यांना कापूस विकला आहे.