शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

हवामान बदलाचा पिकांना बसणार फटका!

By admin | Updated: January 1, 2015 00:30 IST

हलका पाऊस, किमान तापमानात वाढ, तूर, हरभरा, फळ पिकांना धोका.

अकोला : विदर्भात ढगाळ वातावरण तयार झाले असून, काही ठिकाणी हलक्या स्वरू पाच्या पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. या वातावरणाचा फटका मात्र तूर, हरभरा या रब्बी पिकांना बसण्याची शक्यता असल्याने शेतकरी धास्तावला आहे. दरम्यान, या वातावरणामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. २0१४ मध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्याने खरीप पिके हातची गेली आणि रब्बी पिकांवरही परिणाम झाला आहे. अकोला जिल्हय़ात तर ३0 ते ४0 टक्के शेतकर्‍यांनीच रब्बी पिकांची पेरणी केली आहे. यामध्ये हरभरा पीक सर्वाधिक आहे. तथापि जमिनीतील ओलावा संपल्याने अनेक ठिकाणी हे पीक उलटले आहे. जेथे हरभरा आला त्याची वाढ खुंटली आहे.अशावेळी अवकाळी पावसाचे ढग तयार झाल्याने, या पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून, थंडी वाढल्यास त्याचा फटका या पिकांना बसू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. तर ज्या शेतकर्‍यांनी ऑक्टोबर महिन्यात गहू पेरणी केली आहे. हे गव्हाचे पीक परिपक्वता म्हणजेच ओंबीवर आले आहे. या गव्हाला अवकाळी पावसाचा फटाक बसण्याची शक्यता आहे. करडई तेलबिया पिकाची काही ठिकाणी पेरणी केली आहे. या पिकांना ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता असून, भाजीपाला, फळ पिके,आंब्याचा मोहोर गळून पडण्याची शक्यता आहे. सध्या तूर पीक शेतात आहे. या ढगाळ वातावरणामुळे या पिकावर किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. कापूस शेतात असेल तर या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असली तरी जेथे कापूस काढून झाला तेथील कापसाला या पावसामुळे नवी फरदड येईल. अवकाळी पाऊस दोन-चार दिवस सुरू राहिला तर पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असून, ढगाळ वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कृषी अधिष्ठाता डॉ. व्ही.एम. भाल यांनी वर्तवली.