शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

हवामान बदलाचा पिकांना बसणार फटका!

By admin | Updated: January 1, 2015 00:30 IST

हलका पाऊस, किमान तापमानात वाढ, तूर, हरभरा, फळ पिकांना धोका.

अकोला : विदर्भात ढगाळ वातावरण तयार झाले असून, काही ठिकाणी हलक्या स्वरू पाच्या पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. या वातावरणाचा फटका मात्र तूर, हरभरा या रब्बी पिकांना बसण्याची शक्यता असल्याने शेतकरी धास्तावला आहे. दरम्यान, या वातावरणामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. २0१४ मध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्याने खरीप पिके हातची गेली आणि रब्बी पिकांवरही परिणाम झाला आहे. अकोला जिल्हय़ात तर ३0 ते ४0 टक्के शेतकर्‍यांनीच रब्बी पिकांची पेरणी केली आहे. यामध्ये हरभरा पीक सर्वाधिक आहे. तथापि जमिनीतील ओलावा संपल्याने अनेक ठिकाणी हे पीक उलटले आहे. जेथे हरभरा आला त्याची वाढ खुंटली आहे.अशावेळी अवकाळी पावसाचे ढग तयार झाल्याने, या पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून, थंडी वाढल्यास त्याचा फटका या पिकांना बसू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. तर ज्या शेतकर्‍यांनी ऑक्टोबर महिन्यात गहू पेरणी केली आहे. हे गव्हाचे पीक परिपक्वता म्हणजेच ओंबीवर आले आहे. या गव्हाला अवकाळी पावसाचा फटाक बसण्याची शक्यता आहे. करडई तेलबिया पिकाची काही ठिकाणी पेरणी केली आहे. या पिकांना ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता असून, भाजीपाला, फळ पिके,आंब्याचा मोहोर गळून पडण्याची शक्यता आहे. सध्या तूर पीक शेतात आहे. या ढगाळ वातावरणामुळे या पिकावर किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. कापूस शेतात असेल तर या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असली तरी जेथे कापूस काढून झाला तेथील कापसाला या पावसामुळे नवी फरदड येईल. अवकाळी पाऊस दोन-चार दिवस सुरू राहिला तर पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असून, ढगाळ वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कृषी अधिष्ठाता डॉ. व्ही.एम. भाल यांनी वर्तवली.