शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

म्हैसांग येथे दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 01:39 IST

बोरगाव मंजू : बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील म्हैसांग  येथे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील गायरान जमिनीवरील  अतिक्रमण काढण्याच्या वादावरून गावातील नागरिक  आणि अतिक्रमकांत तुफान हाणामारी झाल्याने यात जवळ पास १0 जण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी  सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली असून, पोलिसांनी  याप्रकरणी दोन्ही गटातील नागरिकांवर गुन्हे दाखल केले  आहेत.

ठळक मुद्देगायरान जमिनीचा वाद चिघळला१0 जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कबोरगाव मंजू : बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील म्हैसांग  येथे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील गायरान जमिनीवरील  अतिक्रमण काढण्याच्या वादावरून गावातील नागरिक  आणि अतिक्रमकांत तुफान हाणामारी झाल्याने यात जवळ पास १0 जण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी  सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली असून, पोलिसांनी  याप्रकरणी दोन्ही गटातील नागरिकांवर गुन्हे दाखल केले  आहेत.म्हैसांग येथील सर्व्हे नं २५ मध्ये ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात  उत्तरेला जवळपास ७५ एकर गायरान जमीन आहे. त्या  जमिनीवर गावातील काही लोकांनी मागील १५ वषार्ंपासून  अतिक्रमण केले असून, त्यावर ते लोक पीक घेतात; परंतु  गावातील नागरिकांनी त्यांच्या जनावरांना चरायला  गायरानाची जमीन शिल्लक नसल्याने ग्रामपंचायतीला ते  अतिक्रमण काढण्यास सांगितले. त्यानुसार सन २0१२ मध्ये  ग्रामपंचायतीने गायरानावरील अतिक्रमकांना जमीन खाली  करण्याबाबत नोटीस बजावल्या होत्या. त्याला विरोध करीत  अतिक्रमकांनी नागपूर हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला होता.  त्यामुळे सदरचे प्रकरण हे न्यायालयीन असल्याने सदर  प्रकरण विभागीय आयुक्तांकडे आहे, असे लोकांना सांगण्या त आले. त्याला न जुमानता गावातील शेकडो नागरिक  आणि ग्रामपंचायत प्रशासनाने बोरगाव मंजू ठाणेदार पी. के.  काटकर यांना पोलीस संरक्षण मागितले होते; पण सदरचे  प्रकरण हे न्यायालयीन असल्याने त्यात पोलिसांना बंदोबस्त  देता येत नाही, असे ठाणेदार काटकर यांनी समजावले,  त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य आणि काही नागरिकांनी  १७  तारखेला अमरावती विभागीय आयुक्तांना भेटून या गायरान  जमिनीबाबत काही प्रकरण आपल्या स्तरावर प्रलंबित आहे  का, असे विचारले असता, विभागीय आयुक्तांनी त्यांच्याकडे  असे कोणतेच प्रकरण प्रलंबित नाही, असे लेखी पत्र ग्राम पंचायतीला दिले, त्यामुळे गावातील तंटामुक्ती अध्यक्ष नरेंद्र  देशमुख, पोलीस पाटील सुनील पायदाळे, सरपंच उषा गवई,  ग्रा.पं. सदस्य गजानन बाभुळकार आणि गावातील नागरिक  असे सर्व जण गावालगत असलेल्या गायरान शेतात  त्यांच्यासोबत जनावरे घेऊन गेले. तेव्हा तेथे दोन्ही गटात प्र थम शाब्दीक वाद होऊन नंतर त्याचे रूपांतर हाणामारीत  झाले. या हाणामारीत अतिक्रमकांमधील श्रीकृष्ण तायडे,  गणेश तायडे, ज्योती सोळंके, गणेश सोळंके, दिलीप  सोळंके, मारोती गवई, वंदना गवई, प्रतिभा गवई, दुर्गा सावळे  हे नऊ नागरिक जखमी झाले, तसेच यावेळी दुसर्‍या गटात  असलेले गावातील काही नागरिक किरकोळ जखमी झाले.  यामुळे म्हैसांग गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले  आहे. दरम्यान, ठाणेदार पी. के. काटकर यांनी परिस्थिती  नियंत्रणात आणून जखमींना अकोला येथे उपचारार्थ भरती  केले असून, दोन्ही गटातील नागरिकांवर गुन्हे दाखल आणि  अटक करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान,  म्हैसांग गावात आता शांतता असून, गावात पोलीस बंदोबस्त  ठेवण्यात आला आहे.