शहरं
Join us  
Trending Stories
1
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
2
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
3
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
4
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
7
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
8
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
11
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
12
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
13
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
14
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
15
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
16
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
17
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
18
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
19
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
20
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल

म्हैसांग येथे दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 01:39 IST

बोरगाव मंजू : बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील म्हैसांग  येथे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील गायरान जमिनीवरील  अतिक्रमण काढण्याच्या वादावरून गावातील नागरिक  आणि अतिक्रमकांत तुफान हाणामारी झाल्याने यात जवळ पास १0 जण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी  सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली असून, पोलिसांनी  याप्रकरणी दोन्ही गटातील नागरिकांवर गुन्हे दाखल केले  आहेत.

ठळक मुद्देगायरान जमिनीचा वाद चिघळला१0 जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कबोरगाव मंजू : बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील म्हैसांग  येथे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील गायरान जमिनीवरील  अतिक्रमण काढण्याच्या वादावरून गावातील नागरिक  आणि अतिक्रमकांत तुफान हाणामारी झाल्याने यात जवळ पास १0 जण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी  सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली असून, पोलिसांनी  याप्रकरणी दोन्ही गटातील नागरिकांवर गुन्हे दाखल केले  आहेत.म्हैसांग येथील सर्व्हे नं २५ मध्ये ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात  उत्तरेला जवळपास ७५ एकर गायरान जमीन आहे. त्या  जमिनीवर गावातील काही लोकांनी मागील १५ वषार्ंपासून  अतिक्रमण केले असून, त्यावर ते लोक पीक घेतात; परंतु  गावातील नागरिकांनी त्यांच्या जनावरांना चरायला  गायरानाची जमीन शिल्लक नसल्याने ग्रामपंचायतीला ते  अतिक्रमण काढण्यास सांगितले. त्यानुसार सन २0१२ मध्ये  ग्रामपंचायतीने गायरानावरील अतिक्रमकांना जमीन खाली  करण्याबाबत नोटीस बजावल्या होत्या. त्याला विरोध करीत  अतिक्रमकांनी नागपूर हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला होता.  त्यामुळे सदरचे प्रकरण हे न्यायालयीन असल्याने सदर  प्रकरण विभागीय आयुक्तांकडे आहे, असे लोकांना सांगण्या त आले. त्याला न जुमानता गावातील शेकडो नागरिक  आणि ग्रामपंचायत प्रशासनाने बोरगाव मंजू ठाणेदार पी. के.  काटकर यांना पोलीस संरक्षण मागितले होते; पण सदरचे  प्रकरण हे न्यायालयीन असल्याने त्यात पोलिसांना बंदोबस्त  देता येत नाही, असे ठाणेदार काटकर यांनी समजावले,  त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य आणि काही नागरिकांनी  १७  तारखेला अमरावती विभागीय आयुक्तांना भेटून या गायरान  जमिनीबाबत काही प्रकरण आपल्या स्तरावर प्रलंबित आहे  का, असे विचारले असता, विभागीय आयुक्तांनी त्यांच्याकडे  असे कोणतेच प्रकरण प्रलंबित नाही, असे लेखी पत्र ग्राम पंचायतीला दिले, त्यामुळे गावातील तंटामुक्ती अध्यक्ष नरेंद्र  देशमुख, पोलीस पाटील सुनील पायदाळे, सरपंच उषा गवई,  ग्रा.पं. सदस्य गजानन बाभुळकार आणि गावातील नागरिक  असे सर्व जण गावालगत असलेल्या गायरान शेतात  त्यांच्यासोबत जनावरे घेऊन गेले. तेव्हा तेथे दोन्ही गटात प्र थम शाब्दीक वाद होऊन नंतर त्याचे रूपांतर हाणामारीत  झाले. या हाणामारीत अतिक्रमकांमधील श्रीकृष्ण तायडे,  गणेश तायडे, ज्योती सोळंके, गणेश सोळंके, दिलीप  सोळंके, मारोती गवई, वंदना गवई, प्रतिभा गवई, दुर्गा सावळे  हे नऊ नागरिक जखमी झाले, तसेच यावेळी दुसर्‍या गटात  असलेले गावातील काही नागरिक किरकोळ जखमी झाले.  यामुळे म्हैसांग गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले  आहे. दरम्यान, ठाणेदार पी. के. काटकर यांनी परिस्थिती  नियंत्रणात आणून जखमींना अकोला येथे उपचारार्थ भरती  केले असून, दोन्ही गटातील नागरिकांवर गुन्हे दाखल आणि  अटक करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान,  म्हैसांग गावात आता शांतता असून, गावात पोलीस बंदोबस्त  ठेवण्यात आला आहे.