शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

म्हैसांग येथे दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 01:39 IST

बोरगाव मंजू : बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील म्हैसांग  येथे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील गायरान जमिनीवरील  अतिक्रमण काढण्याच्या वादावरून गावातील नागरिक  आणि अतिक्रमकांत तुफान हाणामारी झाल्याने यात जवळ पास १0 जण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी  सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली असून, पोलिसांनी  याप्रकरणी दोन्ही गटातील नागरिकांवर गुन्हे दाखल केले  आहेत.

ठळक मुद्देगायरान जमिनीचा वाद चिघळला१0 जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कबोरगाव मंजू : बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील म्हैसांग  येथे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील गायरान जमिनीवरील  अतिक्रमण काढण्याच्या वादावरून गावातील नागरिक  आणि अतिक्रमकांत तुफान हाणामारी झाल्याने यात जवळ पास १0 जण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी  सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली असून, पोलिसांनी  याप्रकरणी दोन्ही गटातील नागरिकांवर गुन्हे दाखल केले  आहेत.म्हैसांग येथील सर्व्हे नं २५ मध्ये ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात  उत्तरेला जवळपास ७५ एकर गायरान जमीन आहे. त्या  जमिनीवर गावातील काही लोकांनी मागील १५ वषार्ंपासून  अतिक्रमण केले असून, त्यावर ते लोक पीक घेतात; परंतु  गावातील नागरिकांनी त्यांच्या जनावरांना चरायला  गायरानाची जमीन शिल्लक नसल्याने ग्रामपंचायतीला ते  अतिक्रमण काढण्यास सांगितले. त्यानुसार सन २0१२ मध्ये  ग्रामपंचायतीने गायरानावरील अतिक्रमकांना जमीन खाली  करण्याबाबत नोटीस बजावल्या होत्या. त्याला विरोध करीत  अतिक्रमकांनी नागपूर हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला होता.  त्यामुळे सदरचे प्रकरण हे न्यायालयीन असल्याने सदर  प्रकरण विभागीय आयुक्तांकडे आहे, असे लोकांना सांगण्या त आले. त्याला न जुमानता गावातील शेकडो नागरिक  आणि ग्रामपंचायत प्रशासनाने बोरगाव मंजू ठाणेदार पी. के.  काटकर यांना पोलीस संरक्षण मागितले होते; पण सदरचे  प्रकरण हे न्यायालयीन असल्याने त्यात पोलिसांना बंदोबस्त  देता येत नाही, असे ठाणेदार काटकर यांनी समजावले,  त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य आणि काही नागरिकांनी  १७  तारखेला अमरावती विभागीय आयुक्तांना भेटून या गायरान  जमिनीबाबत काही प्रकरण आपल्या स्तरावर प्रलंबित आहे  का, असे विचारले असता, विभागीय आयुक्तांनी त्यांच्याकडे  असे कोणतेच प्रकरण प्रलंबित नाही, असे लेखी पत्र ग्राम पंचायतीला दिले, त्यामुळे गावातील तंटामुक्ती अध्यक्ष नरेंद्र  देशमुख, पोलीस पाटील सुनील पायदाळे, सरपंच उषा गवई,  ग्रा.पं. सदस्य गजानन बाभुळकार आणि गावातील नागरिक  असे सर्व जण गावालगत असलेल्या गायरान शेतात  त्यांच्यासोबत जनावरे घेऊन गेले. तेव्हा तेथे दोन्ही गटात प्र थम शाब्दीक वाद होऊन नंतर त्याचे रूपांतर हाणामारीत  झाले. या हाणामारीत अतिक्रमकांमधील श्रीकृष्ण तायडे,  गणेश तायडे, ज्योती सोळंके, गणेश सोळंके, दिलीप  सोळंके, मारोती गवई, वंदना गवई, प्रतिभा गवई, दुर्गा सावळे  हे नऊ नागरिक जखमी झाले, तसेच यावेळी दुसर्‍या गटात  असलेले गावातील काही नागरिक किरकोळ जखमी झाले.  यामुळे म्हैसांग गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले  आहे. दरम्यान, ठाणेदार पी. के. काटकर यांनी परिस्थिती  नियंत्रणात आणून जखमींना अकोला येथे उपचारार्थ भरती  केले असून, दोन्ही गटातील नागरिकांवर गुन्हे दाखल आणि  अटक करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान,  म्हैसांग गावात आता शांतता असून, गावात पोलीस बंदोबस्त  ठेवण्यात आला आहे.