शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

हिवरखेड येथे लॉकडाऊनविरोधात व्यापाऱ्यांचा सविनय कायदेभंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:19 IST

कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी शासन उपाय योजना करीत आहे. मागच्या वर्षीसुद्धा ७८ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला होता. शासनाने ८ ते ...

कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी शासन उपाय योजना करीत आहे. मागच्या वर्षीसुद्धा ७८ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला होता. शासनाने ८ ते ३० एप्रिलपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा आदेश दिला. त्यामुळे या अन्यायपूर्वक फतव्याविरोधात हिवरखेड येथील व्यापाऱ्यांच्या सहनशीलतेचा बांध फुटला. आधीच दुकानाचे भाडे, अवाढव्य वीजबिले, एल. आय. सी. हप्ते, कर्जाचे हप्ते व मजुरांची मजुरी देतांना व्यापाऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे. त्यामुळे हिवरखेडचे सर्व व्यावसायिक रस्त्यावर उतरले असून, त्यांनी शांततेत मोर्चा काढत, ग्रामपंचायत सरपंच आणि ठाणेदारांना निवेदन दिले. सर्व व्यावसायिक आपली दुकाने उघडी ठेवणार असून, कोणतीही दंडात्मक कारवाई करू नये, अशी विनवणी केली.

गावातील अवैध धंदे सुरू कसे?

प्रसंगी ग्रामपंचायत गटनेत्यांनी गावात दोन नंबर, वरलीचे आणि इतर अवैध धंदे सर्रास जोमाने सुरू असताना सर्वसामान्य व्यापाऱ्यांना वेठीस धरणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया देऊन व्यापाऱ्यांना पाठिंबा दिला. सोबतच व्यापाऱ्यांनी ठाणेदारांनासुद्धा आम्ही दुकाने सुरूच ठेवणार असल्याचे निवेदन दिले. पाठीवर मारा, पण पोटावर मारू नका, गरज पडल्यास आम्ही मुलाबाळांसह रस्त्यावर उतरू, अशा संतप्त प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्या.

पालकमंत्र्यांकडून व्यापाऱ्यांना अपेक्षा

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जनतेने हिवरखेड येथील ग्रामपंचायतीवर प्रहारचा झेंडा फडकविला होता. त्यामुळे जनतेला भरपूर अपेक्षा आहेत.

परंतु दुकाने उघडल्यास १० हजार रुपये दंड वसुली करण्याची दवंडी पिटल्याने व्यापाऱ्यांनी थेट ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. त्यावर शासनाच्या निर्देशानुसार दवंडी देणे भाग पडले असून, ग्रामपंचायत कोणावरही दंडात्मक कारवाई करणार नसल्याचे सरपंच, उपसरपंच आणि गटनेत्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्र्यांनी आता पुन्हा निर्णायक भूमिका घेऊन ३० तारखेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा आणि १० हजार रुपये दंड वसुलीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.