शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:09 IST

मूर्तिजापूर : तालुक्यातील ग्रामीण भागात वीजपुरवठा नेहमी खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. या समस्येकडे वीज वितरण कंपनीचे ...

मूर्तिजापूर : तालुक्यातील ग्रामीण भागात वीजपुरवठा नेहमी खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. या समस्येकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांची अनेक शासकीय कामे खंडित होत आहे, याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

--------------------------------------------

शेतकरी नवीन वीज जोडणीपासून वंचित !

पातूर : नवीन कृषिपंपांना वीजखांबापासून सर्व्हिस वायरद्वारे ३० मीटरपर्यंत एका महिन्यात, तर २०० मीटरपर्यंत एरियल, लघु दाब वीज वाहिनीद्वारे तीन महिन्यात देण्याचे जाहीर करण्यात आले होते ; मात्र शेतकरी नवीन वीज जोडणीपासून वंचित आहे.

-----------------------------------------

रेती मिळत नसल्याने सर्वसामान्य हैराण

बाळापूर : तालुक्यात रेतीघाटांचा लिलाव झाला नसल्याने सर्वसामान्य हैराण झाले आहे. तालुक्यात सध्या रेतीअभावी नव्या बांधकामावर मोठ्या प्रमाणात गदा आली आहे. बांधकाम करायचे कसे, असा प्रश्न उभा ठाकला आहे. व्यावसायिकांना ही रेतीघाट लिलावांची प्रतीक्षा लागली आहे.

---------------------------

पाणीपातळी खोल, तरीही बोअरचा सपाटा !

बाळापूर : जिल्हाधिकाऱ्यांनी बोअर करणाऱ्या रिंग माउंटेड मशीनवर बंदी घातली असताना त्या मशीन येऊन बोअर करून जातात. तालुक्यात कोरोना वेगाने फैलावत असताना अधिकारी व्यस्त असल्याचा गैरफायदा घेऊन काही दलाल अधिक रक्कम घेऊन अवैध बोअर करून देत आहेत. काही भागात भर दिवसा बोअर केली जात आहेत.

------------------------------------------------------

कंचनपूर-बादलापूर मार्ग खड्डेमय

हातरूण : येथून जवळच असलेला कंचनपूर-बादलापूर मार्ग वर्दळीचा आहे. या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असून, किरकोळ अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

------------------------------------

ग्रामीण भागात संचारबंदीचा बोजवारा !

बार्शीटाकळी : ग्रामीण विभागात प्रशासन पोहोचत नसल्यामुळे स्थानिक प्रशासनाला नागरिकांनी हूल दिल्याचे चित्र येथे दिसत आहे. काम नसताना व्यर्थ घराबाहेर पडणे, मास्क न घालणे, १४४ जमावबंदी कलम लागू असूनही अनावश्यक गर्दी करणे, सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळणे, असले प्रकार येथे रोजच पहायला मिळत आहे.

-------------------------------------------

कोरोना लॉकडाऊनमुळे लग्न प्रसंगावर मर्यादा

तेल्हारा : राज्यात संचारबंदी व जमावबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी जाहीर झाल्याने सर्व लग्न सोहळ्यात अडचणी आल्या आहेत. ग्रामीणमध्ये काही ठिकाणी कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. केवळ २५ जणांनाच परवानगी व त्यात २ तासात लग्न आटपणे बंधनकारक असल्याने अनेक लग्न पुढे ढकलण्यात आले आहे.

----------------------------------------------

वादळ वाऱ्याने आंबा पिकाचे नुकसान

माझोड : शनिवार व रविवारी काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात झाडावरील कैऱ्यांचेच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शनिवारी रात्रीच्या सुमारास ग्रामीण भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. दोन दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण होते. मोठ्या प्रमाणात वादळ वारा सुटला होता.

----------------------------------------------

नेटवर्क अभावी नागरिक झाले त्रस्त

पिंजर : विविध शासकीय कार्यालयातील कामकाजासह खासगी कंपनी कार्यालयातील कामे ऑनलाईन सुरू झाली आहेत. त्यामुळे मोबाईलचा वापरही वाढला आहे ; मात्र आता पिंजर परिसरातील निहिदा, पिंजर, महान आदी भागातील नागरिक नेटवर्क अभावी त्रस्त झाले आहेत.

-------------------------------------------

‘त्या’ योजनेमुळे शेतकऱ्यांना दिलासा

अकोट : आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात किसान सन्मान योजनेचा हप्ता जमा झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रूपये तीन टप्प्यात दिले जात आहे.

-------------------------------------

गावागावातील हातपंप नादुरुस्त

बाळापूर : गावागावात असलेले बहुतांश हातपंप नादुरुस्त असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाईत आणखी भर पडत आहे. पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून अनेक ठिकाणी हातपंप बसविण्यात आले आहेत ; मात्र ते नादुरुस्त असल्याने अडचणी वाढल्या आहेत.

-------------------------------------------