शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:09 IST

मूर्तिजापूर : तालुक्यातील ग्रामीण भागात वीजपुरवठा नेहमी खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. या समस्येकडे वीज वितरण कंपनीचे ...

मूर्तिजापूर : तालुक्यातील ग्रामीण भागात वीजपुरवठा नेहमी खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. या समस्येकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांची अनेक शासकीय कामे खंडित होत आहे, याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

--------------------------------------------

शेतकरी नवीन वीज जोडणीपासून वंचित !

पातूर : नवीन कृषिपंपांना वीजखांबापासून सर्व्हिस वायरद्वारे ३० मीटरपर्यंत एका महिन्यात, तर २०० मीटरपर्यंत एरियल, लघु दाब वीज वाहिनीद्वारे तीन महिन्यात देण्याचे जाहीर करण्यात आले होते ; मात्र शेतकरी नवीन वीज जोडणीपासून वंचित आहे.

-----------------------------------------

रेती मिळत नसल्याने सर्वसामान्य हैराण

बाळापूर : तालुक्यात रेतीघाटांचा लिलाव झाला नसल्याने सर्वसामान्य हैराण झाले आहे. तालुक्यात सध्या रेतीअभावी नव्या बांधकामावर मोठ्या प्रमाणात गदा आली आहे. बांधकाम करायचे कसे, असा प्रश्न उभा ठाकला आहे. व्यावसायिकांना ही रेतीघाट लिलावांची प्रतीक्षा लागली आहे.

---------------------------

पाणीपातळी खोल, तरीही बोअरचा सपाटा !

बाळापूर : जिल्हाधिकाऱ्यांनी बोअर करणाऱ्या रिंग माउंटेड मशीनवर बंदी घातली असताना त्या मशीन येऊन बोअर करून जातात. तालुक्यात कोरोना वेगाने फैलावत असताना अधिकारी व्यस्त असल्याचा गैरफायदा घेऊन काही दलाल अधिक रक्कम घेऊन अवैध बोअर करून देत आहेत. काही भागात भर दिवसा बोअर केली जात आहेत.

------------------------------------------------------

कंचनपूर-बादलापूर मार्ग खड्डेमय

हातरूण : येथून जवळच असलेला कंचनपूर-बादलापूर मार्ग वर्दळीचा आहे. या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असून, किरकोळ अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

------------------------------------

ग्रामीण भागात संचारबंदीचा बोजवारा !

बार्शीटाकळी : ग्रामीण विभागात प्रशासन पोहोचत नसल्यामुळे स्थानिक प्रशासनाला नागरिकांनी हूल दिल्याचे चित्र येथे दिसत आहे. काम नसताना व्यर्थ घराबाहेर पडणे, मास्क न घालणे, १४४ जमावबंदी कलम लागू असूनही अनावश्यक गर्दी करणे, सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळणे, असले प्रकार येथे रोजच पहायला मिळत आहे.

-------------------------------------------

कोरोना लॉकडाऊनमुळे लग्न प्रसंगावर मर्यादा

तेल्हारा : राज्यात संचारबंदी व जमावबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी जाहीर झाल्याने सर्व लग्न सोहळ्यात अडचणी आल्या आहेत. ग्रामीणमध्ये काही ठिकाणी कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. केवळ २५ जणांनाच परवानगी व त्यात २ तासात लग्न आटपणे बंधनकारक असल्याने अनेक लग्न पुढे ढकलण्यात आले आहे.

----------------------------------------------

वादळ वाऱ्याने आंबा पिकाचे नुकसान

माझोड : शनिवार व रविवारी काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात झाडावरील कैऱ्यांचेच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शनिवारी रात्रीच्या सुमारास ग्रामीण भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. दोन दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण होते. मोठ्या प्रमाणात वादळ वारा सुटला होता.

----------------------------------------------

नेटवर्क अभावी नागरिक झाले त्रस्त

पिंजर : विविध शासकीय कार्यालयातील कामकाजासह खासगी कंपनी कार्यालयातील कामे ऑनलाईन सुरू झाली आहेत. त्यामुळे मोबाईलचा वापरही वाढला आहे ; मात्र आता पिंजर परिसरातील निहिदा, पिंजर, महान आदी भागातील नागरिक नेटवर्क अभावी त्रस्त झाले आहेत.

-------------------------------------------

‘त्या’ योजनेमुळे शेतकऱ्यांना दिलासा

अकोट : आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात किसान सन्मान योजनेचा हप्ता जमा झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रूपये तीन टप्प्यात दिले जात आहे.

-------------------------------------

गावागावातील हातपंप नादुरुस्त

बाळापूर : गावागावात असलेले बहुतांश हातपंप नादुरुस्त असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाईत आणखी भर पडत आहे. पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून अनेक ठिकाणी हातपंप बसविण्यात आले आहेत ; मात्र ते नादुरुस्त असल्याने अडचणी वाढल्या आहेत.

-------------------------------------------