शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

नागरिकांनो सावधान : मुदतबाह्य शीतपेयांची बाजारात धूम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2016 01:27 IST

मागणी वाढल्याचा परिणाम : गतवर्षीच्या मालाची यंदा विक्री.

अकोला: उन्हाळा सुरू होताच उष्णतेपासून बचाव करण्यासाठी शहरी व ग्रामीण भागात नागरिक मोठय़ा प्रमाणावर शीतपेयांची (कोल्ड्रिंक्स) खरेदी करतात. त्यामुळे ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणावर मुदतबाह्य शीतपेये विकली जात असल्याचा धक्कादायक प्रकार अकोला शहरासोबतच परिसरातील गावांमध्ये सुरू असल्याचे रविवारी 'लोकमत'ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उजेडात आले आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच, शहरात व ग्रामीण भागात शीतपेयांची मागणी प्रचंड वाढली आहे. उन्हाळय़ाच्या दिवसांमध्ये किराणा दुकान, पानटपरीपासून ते हॉटेल, रेस्टॉरंटपर्यंत शीतपेयांची विक्री होते. उन्हाच्या वाढत्या प्रकोपापासून बचाव करण्यासाठी नागरिक शीतपेये, लिंबू सरबत, उसाचा रस, विविध प्रकारचे ज्यूस, नारळ पाणी यांचा आधार घेतात. हे हेरून ग्रामीण व शहरी भागात शीतपेयांची नवीन दुकाने थाटली जात आहेत. तथापि, नागरिकांकडून मागणी वाढली असल्यामुळे अनेक दुकानदारांनी मुदतबाह्य शीतपेयांची सर्रास विक्री चालविली आहे. यामध्ये अनेक देशी-विदेशी कंपन्यांची शीतपेये बाजारात उपलब्ध आहेत. अकोला शहरासह जठारपेठ, रतनलाल प्लॉट, राऊतवाडी आणि शिवणी, मलकापूर परिसरात लोकमत चमूने शीतपेयाच्या बाटल्या खरेदी केल्या आणि त्यावरील माहिती तपासून पाहिली असता, काही नामांकित कंपन्यांच्या बाटल्यांवर ऑगस्ट, एप्रिल २0१५ ही पॅकिंग केल्याची तारीख दिसून आली, तर काही शीतपेयाच्या बाटल्यांवरील वैधता दिनांक काळ्या शाईने मिटवून ग्राहकांना विक्री केली जात असल्याचे दिसून आले. काही बाटल्यांवर तर छापील तारीखेमध्ये खाडाखोड केल्याचे दिसून आले. यासंदर्भात एका विक्रेत्याला विचारणा केली असता, आम्हाला व्यापार्‍यांकडून ज्या मालाचा पुरवठा झाला, तोच आम्ही विकतो, असे त्याने सांगितले. यादरम्यान अनेक ग्राहक शीतपेयांच्या बाटल्यांवरील छापील माहिती जाणून न घेता थेट मुदतबाहय़ शीतपेय पीत असल्याचे दिसून आले.