शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अकोला मनपाच्या जनता दरबाराकडे नागरिकांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 10:38 IST

संपूर्ण शहरातून केवळ आठ तक्रारकर्त्या नागरिकांनी उपस्थिती दर्शविल्याचे यावेळी पाहावयास मिळाले.

ठळक मुद्देतक्रारींचा निपटारा करण्यासाठी मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी शुक्रवारी मुख्य सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी संपूर्ण शहरातून केवळ आठ तक्रारकर्त्यांनी मुख्य सभागृहात उपस्थिती लावली.

अकोला : जिल्हाधिकारी कार्यालयातील जनता दरबारात महापालिका प्रशासनाकडून सर्वसामान्यांच्या तक्रारी, समस्या निकाली काढल्या जात नसल्याचा ऊहापोह नागरिक करतात. अशा नागरिकांच्या समस्या, तक्रारींचा निपटारा करण्यासाठी मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी शुक्रवारी मुख्य सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला संपूर्ण शहरातून केवळ आठ तक्रारकर्त्या नागरिकांनी उपस्थिती दर्शविल्याचे यावेळी पाहावयास मिळाले. यापैकी चार तक्रारी जनता दरबारातील होत्या, हे विशेष.सर्वसामान्यांच्या तक्रारी, समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील दर पंधरा दिवसांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करतात. प्रशासनाच्या लालफीतशाही कारभारात अनेक विश्वासार्ह तक्रारींना केराची टोपली दाखविली जात असल्याचा नेहमीचा अनुभव आहे. प्रशासनाचे उंबरठे झिजविणाऱ्या अशा नागरिकांसाठी जनता दरबारामुळे आशेचा किरण निर्माण झाला आहे. शहरात शेजाºयाने अतिरिक्त बांधकाम केल्यामुळे होणारा त्रास, सर्व्हिस लाइनमधील अतिक्रमण, रस्त्यांवरची अतिक्रमित बांधकामे, नाल्यांची समस्या आदी विविध तक्रारी मनपाच्या स्तरावर निकाली काढल्या जात नसल्याचा आक्षेप नोंदवत नागरिक जनता दरबारात कल्लोळ करतात. अशा विविध प्रकारच्या तक्रारी व नागरिकांना भेडसावणाºया समस्या निकाली काढण्यासाठी महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी शुक्रवारी मनपाच्या मुख्य सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी संपूर्ण शहरातून केवळ आठ तक्रारकर्त्यांनी मुख्य सभागृहात उपस्थिती लावली. यापैकी चार तक्रारकर्त्यांनी यापूर्वी जनता दरबारात हजेरी लावली होती. उपायुक्त सुमंत मोरे, सहायक आयुक्त पूनम कळंबे, नगर सचिव अनिल बिडवे यांच्यासह झोन अधिकारी, विभाग प्रमुखांनी तक्रारींचे निरसन केले.मनपाच्या आवाहनाकडे पाठएरव्ही महापालिका प्रशासन सर्वसामान्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष क रते, असा पाढा वाचला जातो. जनता दरबारात काही विशिष्ट तक्रारकर्ते याचा चांगलाच ऊहापोह करतात. त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींसमोर मोठा गहजब निर्माण करणाºयांनी मनपाच्या आवाहनाकडे पाठ फिरविल्याने तक्रारींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची वेळ आली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका