शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अकोला मनपाच्या जनता दरबाराकडे नागरिकांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 10:38 IST

संपूर्ण शहरातून केवळ आठ तक्रारकर्त्या नागरिकांनी उपस्थिती दर्शविल्याचे यावेळी पाहावयास मिळाले.

ठळक मुद्देतक्रारींचा निपटारा करण्यासाठी मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी शुक्रवारी मुख्य सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी संपूर्ण शहरातून केवळ आठ तक्रारकर्त्यांनी मुख्य सभागृहात उपस्थिती लावली.

अकोला : जिल्हाधिकारी कार्यालयातील जनता दरबारात महापालिका प्रशासनाकडून सर्वसामान्यांच्या तक्रारी, समस्या निकाली काढल्या जात नसल्याचा ऊहापोह नागरिक करतात. अशा नागरिकांच्या समस्या, तक्रारींचा निपटारा करण्यासाठी मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी शुक्रवारी मुख्य सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला संपूर्ण शहरातून केवळ आठ तक्रारकर्त्या नागरिकांनी उपस्थिती दर्शविल्याचे यावेळी पाहावयास मिळाले. यापैकी चार तक्रारी जनता दरबारातील होत्या, हे विशेष.सर्वसामान्यांच्या तक्रारी, समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील दर पंधरा दिवसांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करतात. प्रशासनाच्या लालफीतशाही कारभारात अनेक विश्वासार्ह तक्रारींना केराची टोपली दाखविली जात असल्याचा नेहमीचा अनुभव आहे. प्रशासनाचे उंबरठे झिजविणाऱ्या अशा नागरिकांसाठी जनता दरबारामुळे आशेचा किरण निर्माण झाला आहे. शहरात शेजाºयाने अतिरिक्त बांधकाम केल्यामुळे होणारा त्रास, सर्व्हिस लाइनमधील अतिक्रमण, रस्त्यांवरची अतिक्रमित बांधकामे, नाल्यांची समस्या आदी विविध तक्रारी मनपाच्या स्तरावर निकाली काढल्या जात नसल्याचा आक्षेप नोंदवत नागरिक जनता दरबारात कल्लोळ करतात. अशा विविध प्रकारच्या तक्रारी व नागरिकांना भेडसावणाºया समस्या निकाली काढण्यासाठी महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी शुक्रवारी मनपाच्या मुख्य सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी संपूर्ण शहरातून केवळ आठ तक्रारकर्त्यांनी मुख्य सभागृहात उपस्थिती लावली. यापैकी चार तक्रारकर्त्यांनी यापूर्वी जनता दरबारात हजेरी लावली होती. उपायुक्त सुमंत मोरे, सहायक आयुक्त पूनम कळंबे, नगर सचिव अनिल बिडवे यांच्यासह झोन अधिकारी, विभाग प्रमुखांनी तक्रारींचे निरसन केले.मनपाच्या आवाहनाकडे पाठएरव्ही महापालिका प्रशासन सर्वसामान्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष क रते, असा पाढा वाचला जातो. जनता दरबारात काही विशिष्ट तक्रारकर्ते याचा चांगलाच ऊहापोह करतात. त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींसमोर मोठा गहजब निर्माण करणाºयांनी मनपाच्या आवाहनाकडे पाठ फिरविल्याने तक्रारींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची वेळ आली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका