शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

स्वच्छता अ‍ॅपच्या वापराकडे नागरिकांची पाठ; ‘क्यूसीआय’चा निष्कर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 12:37 IST

अकोला: स्वच्छता अ‍ॅपचा वापर कसा करायचा, याची जनजागृती करण्यात स्वायत्त संस्था कुचकामी ठरल्यामुळे सदर अ‍ॅपच्या वापराकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याचा निष्कर्ष केंद्राच्या क्यूसीआय (क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया)ने काढल्याची माहिती आहे.

अकोला: उघड्यावर पसरलेली अस्वच्छता, केरकचरा दूर करण्याच्या उद्देशातून केंद्र शासनाने ‘स्वच्छ भारत’ अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ चा प्रारंभ केला होता. यामध्ये राज्यातील महापालिका, नगर परिषद तसेच नगरपालिकांमध्ये ‘स्वच्छता अ‍ॅप’च्या माध्यमातून नागरिकांना उघड्यावर साचलेल्या अस्वच्छतेबाबत आॅनलाइन तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध होती. स्वच्छता अ‍ॅपचा वापर कसा करायचा, याची जनजागृती करण्यात स्वायत्त संस्था कुचकामी ठरल्यामुळे सदर अ‍ॅपच्या वापराकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याचा निष्कर्ष केंद्राच्या क्यूसीआय (क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया)ने काढल्याची माहिती आहे.तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानच्या माध्यमातून ग्रामीण भागात स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले होते. त्याच धर्तीवर विद्यमान युती सरकारने स्वच्छ महाराष्ट्र अभियानची सुरुवात केली. सर्वसामान्य नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासोबतच त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याची जबाबदारी नागरी स्वायत्त संस्थांवर सोपविण्यात आली. स्वायत्त संस्थांच्या कामकाजाचे मूल्यमापन करून त्याआधारे गुणांकन देण्यासाठी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१८चा प्रारंभ करण्यात आला. त्यामध्ये ‘स्वच्छता अ‍ॅप’चा वापर करून उघड्यावरील कचरा, घाण स्वच्छ करण्यासंदर्भात आॅनलाइन तक्रार करण्याचा समावेश होता. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर स्वायत्त संस्थांनी तक्रारींचा तातडीने निपटारा करून तशी नोंद स्वच्छता अ‍ॅपवर अपलोड करणे बंधनकारक होते. मनपासह नगर परिषद व नगरपालिका स्वच्छता अ‍ॅपच्या मुद्यावर जनजागृती करण्यात कुचकामी ठरल्याचा परिणाम समोर आला. सदर अ‍ॅपकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याने ‘क्युसीआय’ने केलेल्या सर्वेक्षणात स्वच्छता अ‍ॅपवर आधारित २७ महापालिकांसह नगर परिषद, नगर पालिकांचे रॅँकिंग घसरल्याचे समोर आले आहे.‘मिशन मोड’ पद्धतीने कामकाजराज्यात स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता स्वच्छ सर्वेक्षण-२०१९ अंतर्गत क्यूसीआय (क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया)मार्फत सर्वेक्षणाची अंमलबजाणी केली जात आहे. नागरी स्वायत्त संस्थांचे मूल्यमापन हे प्रत्यक्ष स्थळभेटीच्या आधारावर होत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान