शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

लसीकरण केंद्रांमध्ये नागरिकांचा गाेंधळ; पाेलिसांना धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:18 IST

जीवघेण्या काेराेनाला आळा घालण्यासाठी मार्च महिन्यापासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात आले. ज्या नागरिकांना लसीचा ...

जीवघेण्या काेराेनाला आळा घालण्यासाठी मार्च महिन्यापासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात आले. ज्या नागरिकांना लसीचा पहिला डाेस देण्यात आला, त्यांच्या दुसरा डाेस घेण्याची मुदत संपुष्टात आली आहे. यादरम्यान, केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्य शासनाने १ मेपासून १८ ते ४४ वयाेगटातील नागरिकांच्या लसीकरणाला प्रारंभ केला असून, यामुळे वैद्यकीय आराेग्य यंत्रणांची तारांबळ उडत आहे. यात भरीस भर लसीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे लसीकरण केंद्रांमध्ये गर्दी करणाऱ्या नागरिकांना माघारी परत जावे लागत आहे. यामुळे सर्वसामान्यांमध्ये यंत्रणांप्रति राेष निर्माण हाेत आहे. मंगळवारी जिल्हा स्त्री रुग्णालयात लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना अचानक अकाेटफैलस्थित मनपाच्या रुग्णालयात जाण्याची सूचना करण्यात आली. प्रशासकीय यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी, बुधवारी कस्तुरबा गांधी, किसनीबाई भरतिया, हरिहरपेठ येथील लसीकरण केंद्रांत पहाटे ४ वाजतापासून गर्दी करणाऱ्या नागरिकांनी चांगलाच गाेंधळ घातला.

भर उन्हात नागरिकांच्या रांगा

बुधवारी शहरातील सर्वच लसीकरण केंद्रांमध्ये सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत लस देण्याचा अवधी हाेता. मागील काही दिवसांपासून सूर्य आग ओकत असला तरीही लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. पहाटेपासून रांगेत उभे राहणाऱ्या नागरिकांना लसीच्या उपलब्धतेनुसार कुपनवाटप केले जात आहे. गर्दीमुळे कुपन प्राप्त हाेत नसल्याने या ठिकाणी नागरिकांनी मनपा कर्मचाऱ्यांवर ताेंडसुख घेतले.

आजपासून सकाळी ८ वाजता लसीकरण

ज्येष्ठ नागरिकांना जीवाची लाहीलाही करणाऱ्या उन्हात तासन् तास उभे राहावे लागत आहे. ही बाब लक्षात घेता उद्या गुरुवारपासून सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंतच्या कालावधीत लसीकरण माेहीम राबविली जाणार आहे.

तरुणांनाे, गर्दी करू नका!

गुरुवारपासून ज्येष्ठ नागरिकांना दुसऱ्या डाेससाठी प्राधान्य दिले जाणार आहे. लसींची उपलब्धता लक्षात घेऊन ४५ वर्षांवरील नागरिकांनाही लस दिली जाणार आहे. उदा. लसीचे २०० डाेस असतील तर ज्येष्ठ नागरिकांसाठी १४० व पहिला डाेस घेणाऱ्यांसाठी ६० डाेस उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यादरम्यान तरुणांचे लसीकरण बंद असल्याने त्यांनी गर्दी टाळण्याची गरज आहे.