शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

चुरड्याने मिरचीला मरगळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2016 02:17 IST

विदर्भात दोन हजार कोटींवर नुकसान; आता अकोला जिल्ह्यात लागण.

राजरत्न सिरसाट/अकोला देशांतर्गत उत्पादनात मोलाचा वाटा असलेल्या राज्यातील मिरची पिकावर आलेल्या चुरडा-मुरडा (लीफ कर्ल व्हायरस) रोगाने मिरचीचे यावर्षी सर्वाधिक नुकसान केले. त्यातच बोगस बियाणे शेतकर्‍यांच्या माथी मारले गेल्याने विदर्भात नुकसानाचा आकडा दोन हजार कोटींवर गेला आहे. मिरचीचा पिच्छा न सोडणार्‍या चुरड्याने आता पश्‍चिम विदर्भात आक्रमण केले आहे. अकोला जिल्ह्यात मिरचीवर या रोगाची लागण झाल्याने अगोदरच खरीप, रब्बी पिके हातची गेल्याने गलितगात्र झालेला शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे.गेल्यावर्षी पाऊस कमी झाल्याने पांढरी माशी, मावा, तुडतुडे या रस शोषण करणार्‍या किडींचा प्रादुर्भाव वाढला होता. ही रस शोषण करणारी कीड स्थलांतर करीत असल्याने मिरचीवर आलेल्या या किडीने चुरडा रोगाचा मोठय़ा प्रमाणावर प्रसार झाला. चुरडा-मुरडा रोगाला पोषक वातावरण निर्माण झाल्याने या रोगाने यावर्षी विदर्भात ७0 ते ८0 टक्के मिरचीचे नुकसान झाले आहे. मिरची हे परागीकरण होणारे पीक असून, दरवर्षी नवीन बियाणे मिळवावे लागत असल्याने विदर्भातील बहुतांश शेतकरी भिवापुरी, मलकापुरी व इलिचपुरी या पारंपरिक मिरचीसोबतच संकरित मिरचीचे उत्पादन घेण्याकडे वळला आहे. संकरित मिरचीचे उत्पादन एकरी दीडशे क्विंटलच्या वर असल्याने विदर्भात संकरित मिरचीची लागवड अलीकडे वाढली आहे.राज्यातील मिरचीचे क्षेत्र जवळपास १ लाख २५ हजार हेक्टरवर आहे. यातील सर्वाधिक ७५ हजार हेक्टर क्षेत्र हे विदर्भात आहे. पूर्व विदर्भातील नागपूर विभागात ५५ हजार, तर अमरावती विभागात २0 हजार हेक्टरच्या जवळपास हे क्षेत्र आहे. त्यानंतर नंदुरबार, कोल्हापूर, धुळे, जळगाव खान्देश, मराठवाडा व सोलापूर जिल्ह्यात मिरची पीक घेतले जाते.२ दरम्यान,शेतकर्‍यांना गेल्या वर्षीच्या कमी पावसाचा फटका तर बसलाच, शिवाय या पिकाला रोगाने ग्रासल्याने यावर्षी संकरित मिरचीपासून मिळणार्‍या एकरी दीडशे ते दोनशे क्विंटल मिळणार्‍या उत्पादनात ७0 ते ८0 टक्के घट झाली आहे. सरळ वाणापासून एकरी उत्पादन शंभर क्विंटलच्या जवळपास होते; तेही घटले आहे. आता चुरड्याचा प्रसार पश्‍चिम विदर्भात होत असून, अकोला जिल्ह्यातील दानापूर व इतर भागांमध्ये या रोगाने हातपाय पसरल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.काय आहे चुरडा? चुरडा झाडाचे रस शोषण करीत असल्याने मिरचीची पाने चुरड्यासारखी होतात. झाडाची प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया मंदावते. परिणामी, मिरचीवर निर्माण करणारा फुलोरा गळून पडतो. त्यामुळे उत्पादनात तीव्र स्वरू पाची घट येते.