शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

चुरड्याने मिरचीला मरगळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2016 02:17 IST

विदर्भात दोन हजार कोटींवर नुकसान; आता अकोला जिल्ह्यात लागण.

राजरत्न सिरसाट/अकोला देशांतर्गत उत्पादनात मोलाचा वाटा असलेल्या राज्यातील मिरची पिकावर आलेल्या चुरडा-मुरडा (लीफ कर्ल व्हायरस) रोगाने मिरचीचे यावर्षी सर्वाधिक नुकसान केले. त्यातच बोगस बियाणे शेतकर्‍यांच्या माथी मारले गेल्याने विदर्भात नुकसानाचा आकडा दोन हजार कोटींवर गेला आहे. मिरचीचा पिच्छा न सोडणार्‍या चुरड्याने आता पश्‍चिम विदर्भात आक्रमण केले आहे. अकोला जिल्ह्यात मिरचीवर या रोगाची लागण झाल्याने अगोदरच खरीप, रब्बी पिके हातची गेल्याने गलितगात्र झालेला शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे.गेल्यावर्षी पाऊस कमी झाल्याने पांढरी माशी, मावा, तुडतुडे या रस शोषण करणार्‍या किडींचा प्रादुर्भाव वाढला होता. ही रस शोषण करणारी कीड स्थलांतर करीत असल्याने मिरचीवर आलेल्या या किडीने चुरडा रोगाचा मोठय़ा प्रमाणावर प्रसार झाला. चुरडा-मुरडा रोगाला पोषक वातावरण निर्माण झाल्याने या रोगाने यावर्षी विदर्भात ७0 ते ८0 टक्के मिरचीचे नुकसान झाले आहे. मिरची हे परागीकरण होणारे पीक असून, दरवर्षी नवीन बियाणे मिळवावे लागत असल्याने विदर्भातील बहुतांश शेतकरी भिवापुरी, मलकापुरी व इलिचपुरी या पारंपरिक मिरचीसोबतच संकरित मिरचीचे उत्पादन घेण्याकडे वळला आहे. संकरित मिरचीचे उत्पादन एकरी दीडशे क्विंटलच्या वर असल्याने विदर्भात संकरित मिरचीची लागवड अलीकडे वाढली आहे.राज्यातील मिरचीचे क्षेत्र जवळपास १ लाख २५ हजार हेक्टरवर आहे. यातील सर्वाधिक ७५ हजार हेक्टर क्षेत्र हे विदर्भात आहे. पूर्व विदर्भातील नागपूर विभागात ५५ हजार, तर अमरावती विभागात २0 हजार हेक्टरच्या जवळपास हे क्षेत्र आहे. त्यानंतर नंदुरबार, कोल्हापूर, धुळे, जळगाव खान्देश, मराठवाडा व सोलापूर जिल्ह्यात मिरची पीक घेतले जाते.२ दरम्यान,शेतकर्‍यांना गेल्या वर्षीच्या कमी पावसाचा फटका तर बसलाच, शिवाय या पिकाला रोगाने ग्रासल्याने यावर्षी संकरित मिरचीपासून मिळणार्‍या एकरी दीडशे ते दोनशे क्विंटल मिळणार्‍या उत्पादनात ७0 ते ८0 टक्के घट झाली आहे. सरळ वाणापासून एकरी उत्पादन शंभर क्विंटलच्या जवळपास होते; तेही घटले आहे. आता चुरड्याचा प्रसार पश्‍चिम विदर्भात होत असून, अकोला जिल्ह्यातील दानापूर व इतर भागांमध्ये या रोगाने हातपाय पसरल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.काय आहे चुरडा? चुरडा झाडाचे रस शोषण करीत असल्याने मिरचीची पाने चुरड्यासारखी होतात. झाडाची प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया मंदावते. परिणामी, मिरचीवर निर्माण करणारा फुलोरा गळून पडतो. त्यामुळे उत्पादनात तीव्र स्वरू पाची घट येते.