शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

‘प्रज्ञाशोध’साठी १५ विद्यार्थ्यांंची निवड

By admin | Updated: March 6, 2017 02:10 IST

अकोल्यातील विद्यार्थी सर्वाधिक, राज्यात ३६६ विद्यार्थ्यांंची निवड.

अकोला, दि. ५- राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी अकोला जिल्हय़ातील १५ विद्यार्थ्यांंंची निवड करण्यात आली. पश्‍चिम विदर्भातून अकोल्यातील सर्वाधिक विद्यार्थ्यांंची निवड झाली. ही भूषणावह बाब आहे. यातील तीन विद्यार्थी एकट्या शिवाजी माध्यमिक शाळेचे आहेत. राज्य स्तरावर प्रज्ञाशोध परीक्षेला इयत्ता दहावीतून राज्यभरातून ७९ हजार ४८७ विद्यार्थी बसले होते. अकोला जिल्हय़ातूनसुद्धा चार हजारांवर विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या परीक्षेत राज्यभरातून केवळ ३६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांंंची राष्ट्रीय स्तरावरील शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर प्रज्ञाशोध परीक्षेत उत्तीर्ण होणार्‍या एक हजार विद्यार्थ्यांंंना शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांंंमध्ये सर्वसाधारण गटातून २८४ विद्यार्थी, अनुसूचित जाती गटातून ५५ विद्यार्थी आणि अनुसूचित जमाती गटातुन २७ विद्यार्थ्यांंंचा समावेश आहे. अकोला जिल्हय़ातून १५ विद्यार्थ्यांंंची निवड झाली आहे. पश्‍चिम विदर्भात ही संख्या सर्वाधिक आहे. अमरावती जिल्हय़ातून सहा विद्यार्थी, बुलडाणा जिल्हय़ातून सात, वाशिम जिल्हय़ातून चार, यवतमाळ जिल्हय़ातून तीन विद्यार्थ्यांंंची निवड झाली. राष्ट्रीय स्तरावरील प्रज्ञाशोध परीक्षा १४ मे २0१७ रोजी होणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांंंची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांंंना त्यांच्या घरच्या पत्त्यावर एनसीईआरटी दिल्लीमार्फत राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेचे प्रवेशपत्र मार्च महिन्यातील अखेरच्या आठवड्यात पाठविण्यात येणार आहे. महाराष्ट्रात अकोल्याचे विद्यार्थी पाचव्या क्रमांकावर *राष्ट्रीय स्तरावरील प्रज्ञाशोध परीक्षेसाठी निवड झालेल्या अकोल्यातील विद्यार्थ्यांंंनी महाराष्ट्रात पाचवे स्थान पटकावले आहे. विदर्भात अकोला जिल्हय़ाने अव्वल स्थान पटकावले आहे. *औरंगाबादच्या ५८ विद्यार्थ्यांंंची प्रज्ञाशोध परीक्षेसाठी निवड झाली असून, ठाणे जिल्हय़ातील ३५, मुंबईतील ३२, पुणे २१, बीड जिल्हय़ातून २0, अकोला जिल्हय़ातून १५ आणि जळगाव जिल्हय़ातून १४ विद्यार्थ्यांंंंची निवड झाली.