शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पैशांसाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी निवडला सायकलचोरीचा मार्ग!

By admin | Updated: January 19, 2015 02:37 IST

अकोला पोलिसांनी सहा जणांच्या टोळीजवळून जप्त केल्या तीन सायकली.

अकोला: चित्रपट, नाटकांमधील बालगुन्हेगारांची कृत्ये पाहून शालेय विद्यार्थ्यांचीही पावले गुन्हेगारीकडे वळत आहेत. गरीब परिस्थितीमुळे आलिशान राहायला आणि जगायला न मिळणारी मुले नकळत गुन्हेगारीकडे ओढली जात आहेत. यासारखेच एक उदाहरण रविवारी सायंकाळी समोर आले. तुकाराम चौक परिसरात सायकल चोरताना एका इसमाने तब्बल सहा शालेय विद्यार्थ्यांना पकडून खदान पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी या विद्यार्थ्यांची चौकशी केली असता, त्यांनी पैशांसाठी सायकल चोरीचा मार्ग निवडल्याचे पोलिसांना सांगितले. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास मलकापूर परिसरातील एका शाळेतील इयत्ता ४ थी व ५ व्या वर्गातील सहा विद्यार्थ्यांना एका इसमाने तुकाराम चौकामध्ये सायकल चोरताना रंगेहात पकडले. ही मुले गयावया करू लागली; परंतु त्या इसमाने कोणतीही दयामाया न दाखवता सहा जणांना खदान पोलीस ठाण्यात आणले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. चिमुकली मुले पाहून पोलिसांनाही आश्‍चर्याचा धक्का बसला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन तुरुंगात बंद करण्याची भीती दाखवली. चिमुकली मुले, पुन्हा अशी चूक होणार नसल्याचे खात्री देत, पोलिसांनी सोडून देण्यासाठी गयावया करू लागली. पोलिसांच्या पाया पडू लागली. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता, त्या सहाही विद्यार्थ्यांनी मलकापूर परिसरातून तीन सायकली चोरल्या असल्याची कबुली दिली. तीन सायकलींपैकी एक सायकल भंगारात विकल्याचेही पोलिसांना त्यांनी सांगितले; परंतु या सहाही विद्यार्थ्यांंची वयोगट पाहून पोलिसांना त्यांची दया आली. गुन्हे दाखल केले तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला धक्का पोहोचेल आणि ते पुन्हा गुन्हेगारीकडे वळतील, या उदात्त हेतूने पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करणे टाळले आणि त्यांच्या आई-वडिलांना बोलावून, मुलांकडे लक्ष देण्यास सांगितले. एवढेच नाहीतर खदानचे ठाणेदार छगनराव इंगळे आणि पोलीस उपनिरीक्षक टिकाराम थाटकर यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या कक्षामध्ये बोलावून, त्यांची कडक शब्दात कानउघाडणी केली आणि पुन्हा सायकल चोरीचे कृत्य केल्यास तुरुंगात टाकण्याची भीती दाखवली. विद्यार्थ्यांंनीही पुन्हा असे कृत्य करणार नसल्याचे आश्‍वासन त्यांना दिले. त्यानंतर पोलिसांनी या सहाही विद्यार्थ्यांंवर कोणतीही कारवाई न करता सोडून दिले. शालेय विद्यार्थ्यांंनी केलेले कृत्य गंभीर आहे. त्यांनी चोरलेल्या सायकली जप्त केल्या असून, सायकलमालकांना त्या सायकली देण्यात आल्या. विद्यार्थ्यांंचे वय आणि त्यांनी नकळत केलेले पाहून, त्यांना आम्ही सोडून दिले. त्यांचेवर गुन्हे दाखल केले असते तर, ते बालगुन्हेगार बनले असते. त्यांना सुधारण्याची संधी दिली पाहिजे, असे खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार छगनराव इंगळे यांनी सांगीतले.