शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
3
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
4
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
5
"माझा नवरा पाकिस्तानचा हेर नाही, तो तर..."; आयएसआय एजंटना मदत करणाऱ्या शाहजादची पत्नी काय म्हणाली?
6
Shahana Fatima : नागपूरच्या लेकीची शिकागोत नेत्रदिपक कामगिरी; शहाना फातिमाने केली कमाल, मिळवलं मोठं यश
7
ज्योती मल्होत्रा प्रकरणानं चर्चा, एका गुप्तहेराला किती पैसे देतं पाकिस्तान?; डिटेल रिपोर्ट
8
दरमहा १० हजारांची बचत? म्युच्युअल फंडात कुठे आणि कशी करावी गुंतवणूक? फक्त 'ही' चूक करू नका
9
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
10
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
11
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
12
तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं
13
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
14
भयंकर! सुनेने रील बनवताच सासरच्या मंडळींना राग अनावर; संतापलेल्या सासऱ्याने फोडलं डोकं
15
मराठी गायकाने नाकारली तुर्कीतील कॉन्सर्टची ऑफर; म्हणाला, "५० लाख देत होते पण..."
16
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?
17
ज्योतीची साथीदार, एकत्रच करत होत्या पाकिस्तान वाऱ्या; कोण आहे प्रियंका सेनापती?
18
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
19
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
20
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."

पैशांसाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी निवडला सायकलचोरीचा मार्ग!

By admin | Updated: January 19, 2015 02:37 IST

अकोला पोलिसांनी सहा जणांच्या टोळीजवळून जप्त केल्या तीन सायकली.

अकोला: चित्रपट, नाटकांमधील बालगुन्हेगारांची कृत्ये पाहून शालेय विद्यार्थ्यांचीही पावले गुन्हेगारीकडे वळत आहेत. गरीब परिस्थितीमुळे आलिशान राहायला आणि जगायला न मिळणारी मुले नकळत गुन्हेगारीकडे ओढली जात आहेत. यासारखेच एक उदाहरण रविवारी सायंकाळी समोर आले. तुकाराम चौक परिसरात सायकल चोरताना एका इसमाने तब्बल सहा शालेय विद्यार्थ्यांना पकडून खदान पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी या विद्यार्थ्यांची चौकशी केली असता, त्यांनी पैशांसाठी सायकल चोरीचा मार्ग निवडल्याचे पोलिसांना सांगितले. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास मलकापूर परिसरातील एका शाळेतील इयत्ता ४ थी व ५ व्या वर्गातील सहा विद्यार्थ्यांना एका इसमाने तुकाराम चौकामध्ये सायकल चोरताना रंगेहात पकडले. ही मुले गयावया करू लागली; परंतु त्या इसमाने कोणतीही दयामाया न दाखवता सहा जणांना खदान पोलीस ठाण्यात आणले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. चिमुकली मुले पाहून पोलिसांनाही आश्‍चर्याचा धक्का बसला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन तुरुंगात बंद करण्याची भीती दाखवली. चिमुकली मुले, पुन्हा अशी चूक होणार नसल्याचे खात्री देत, पोलिसांनी सोडून देण्यासाठी गयावया करू लागली. पोलिसांच्या पाया पडू लागली. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता, त्या सहाही विद्यार्थ्यांनी मलकापूर परिसरातून तीन सायकली चोरल्या असल्याची कबुली दिली. तीन सायकलींपैकी एक सायकल भंगारात विकल्याचेही पोलिसांना त्यांनी सांगितले; परंतु या सहाही विद्यार्थ्यांंची वयोगट पाहून पोलिसांना त्यांची दया आली. गुन्हे दाखल केले तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला धक्का पोहोचेल आणि ते पुन्हा गुन्हेगारीकडे वळतील, या उदात्त हेतूने पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करणे टाळले आणि त्यांच्या आई-वडिलांना बोलावून, मुलांकडे लक्ष देण्यास सांगितले. एवढेच नाहीतर खदानचे ठाणेदार छगनराव इंगळे आणि पोलीस उपनिरीक्षक टिकाराम थाटकर यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या कक्षामध्ये बोलावून, त्यांची कडक शब्दात कानउघाडणी केली आणि पुन्हा सायकल चोरीचे कृत्य केल्यास तुरुंगात टाकण्याची भीती दाखवली. विद्यार्थ्यांंनीही पुन्हा असे कृत्य करणार नसल्याचे आश्‍वासन त्यांना दिले. त्यानंतर पोलिसांनी या सहाही विद्यार्थ्यांंवर कोणतीही कारवाई न करता सोडून दिले. शालेय विद्यार्थ्यांंनी केलेले कृत्य गंभीर आहे. त्यांनी चोरलेल्या सायकली जप्त केल्या असून, सायकलमालकांना त्या सायकली देण्यात आल्या. विद्यार्थ्यांंचे वय आणि त्यांनी नकळत केलेले पाहून, त्यांना आम्ही सोडून दिले. त्यांचेवर गुन्हे दाखल केले असते तर, ते बालगुन्हेगार बनले असते. त्यांना सुधारण्याची संधी दिली पाहिजे, असे खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार छगनराव इंगळे यांनी सांगीतले.