शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

रुंद सरी वरंबा पद्धती यंत्रात करणार बदल!

By admin | Updated: November 24, 2015 01:14 IST

पावसाच्या अनिश्‍चिततेमुळे पीकपेरणीत बदल करणे आवश्यक, राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने बीबीएफ यंत्रात बदल करण्याचे संशोधन हाती घेतले आहे.

अकोला : पावसाच्या पाण्याचे शेतात संधारण होण्यासाठी रुंद सरी वरंबा टोकण व आंतरमशागत पद्धतीने (बीबीएफ प्लांटर ) पेरणी करण्यासाठी प्रचार कृषी विभागाने राज्यभर केला आहे; परंतु पावसाच्या अनिश्‍चिततेमुळे पीकपेरणीत बदल करणे आवश्यक असल्याने राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने बीबीएफ यंत्रात बदल करण्याचे संशोधन हाती घेतले आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या बीबीएफ यंत्राने मूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी, कपाशी, मका, भुईमूग, हरभरा आदी पिकांची पेरणी करता येते. पारंपरिक पद्धतीपेक्षा या सुधारित यंत्राने पेरणी केल्यास हवा आणि जमिनीतील ओलाव्याचे संतुलन योग्यप्रकारे राखता येत असल्याने पिकांना फायदा होतो. या यंत्रामुळे पांरपरिक पद्धतीच्या तुलनेत खर्च कमी लागत असून, ऊर्जाही कमी लागते. राज्यातील सिंचनाखालील क्षेत्र अवघे १७ टक्के आहे. त्यामुळे जिरायती शेतीसाठी मूलस्थानी जलसंधारण ही काळाची गरज असल्याने या यंत्रपद्धतीने पेरणी केल्यास पावसाचे पाणी वाया जाऊ न देता शेतात मुरवले जाते. ट्रॅक्टरचलित असलेल्या या यंत्राद्वारे एकाच वेळी रुंद सरी व वरंबा पाडून त्यावर पेरणी करणे शक्य असून, एकाच वेळी खते देणे शक्य असल्याने कृषी विभागाने या यंत्राचा मोठय़ा प्रमाणात प्रचार केला आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश शेतकर्‍यांनी या पेरणी पद्धतीचा वापर करू न पिके घेणे सुरू केले आहे. दरम्यान, अलीकडे पावसाची अनिश्‍चितता वाढली असल्याने त्यानुसार पीकपेरणी पद्धतीत बदल करणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे या यंत्राला नव्याने तयार करण्याची गरज कृषी शास्त्रज्ञांना वाटत आहे. आंतरपीक पेरणीमध्ये अनेक ठिकाणी सोयाबीन पीक वाढते, पण तूर वाढत नसल्याचे दिसून आले आहे. यासाठीच महात्मा ज्योतिबा फुले कृषी विद्यापीठाने बीबीएफ यंत्रात सुधार करण्याचे ठरवले आहे. एक ओळ तूर आणि दोन ओळी सोयाबीन पेरता यावे अशी सोय नवीन बीबीएफ यंत्रात करण्याची गरज असल्याने फुले कृषी विद्यापीठाने त्यावर संशोधन हाती घेतले आहे.