शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

रुंद सरी वरंबा पद्धती यंत्रात करणार बदल!

By admin | Updated: November 24, 2015 01:14 IST

पावसाच्या अनिश्‍चिततेमुळे पीकपेरणीत बदल करणे आवश्यक, राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने बीबीएफ यंत्रात बदल करण्याचे संशोधन हाती घेतले आहे.

अकोला : पावसाच्या पाण्याचे शेतात संधारण होण्यासाठी रुंद सरी वरंबा टोकण व आंतरमशागत पद्धतीने (बीबीएफ प्लांटर ) पेरणी करण्यासाठी प्रचार कृषी विभागाने राज्यभर केला आहे; परंतु पावसाच्या अनिश्‍चिततेमुळे पीकपेरणीत बदल करणे आवश्यक असल्याने राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने बीबीएफ यंत्रात बदल करण्याचे संशोधन हाती घेतले आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या बीबीएफ यंत्राने मूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी, कपाशी, मका, भुईमूग, हरभरा आदी पिकांची पेरणी करता येते. पारंपरिक पद्धतीपेक्षा या सुधारित यंत्राने पेरणी केल्यास हवा आणि जमिनीतील ओलाव्याचे संतुलन योग्यप्रकारे राखता येत असल्याने पिकांना फायदा होतो. या यंत्रामुळे पांरपरिक पद्धतीच्या तुलनेत खर्च कमी लागत असून, ऊर्जाही कमी लागते. राज्यातील सिंचनाखालील क्षेत्र अवघे १७ टक्के आहे. त्यामुळे जिरायती शेतीसाठी मूलस्थानी जलसंधारण ही काळाची गरज असल्याने या यंत्रपद्धतीने पेरणी केल्यास पावसाचे पाणी वाया जाऊ न देता शेतात मुरवले जाते. ट्रॅक्टरचलित असलेल्या या यंत्राद्वारे एकाच वेळी रुंद सरी व वरंबा पाडून त्यावर पेरणी करणे शक्य असून, एकाच वेळी खते देणे शक्य असल्याने कृषी विभागाने या यंत्राचा मोठय़ा प्रमाणात प्रचार केला आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश शेतकर्‍यांनी या पेरणी पद्धतीचा वापर करू न पिके घेणे सुरू केले आहे. दरम्यान, अलीकडे पावसाची अनिश्‍चितता वाढली असल्याने त्यानुसार पीकपेरणी पद्धतीत बदल करणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे या यंत्राला नव्याने तयार करण्याची गरज कृषी शास्त्रज्ञांना वाटत आहे. आंतरपीक पेरणीमध्ये अनेक ठिकाणी सोयाबीन पीक वाढते, पण तूर वाढत नसल्याचे दिसून आले आहे. यासाठीच महात्मा ज्योतिबा फुले कृषी विद्यापीठाने बीबीएफ यंत्रात सुधार करण्याचे ठरवले आहे. एक ओळ तूर आणि दोन ओळी सोयाबीन पेरता यावे अशी सोय नवीन बीबीएफ यंत्रात करण्याची गरज असल्याने फुले कृषी विद्यापीठाने त्यावर संशोधन हाती घेतले आहे.