वाशिम : पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस शिपाईपासून सहायक पोलीस उपनिरीक्षकांच्या दर दोन वर्षांनी बदल्या करण्याचे धोरण राज्य शासनाने अवलंबले होते. मात्र, यामध्ये सुधारणा केली आहे. यामुळे किमान सहा वर्षे तरी एकाच ठिकाणी राहता येणार असल्याने पोलीस कर्मचार्यांबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे. पोलीस दलात कार्यरत असलेले शिपाई ते सहायक उपनिरीक्षक यांना एकाच गावात जास्त दिवस न ठेवता दर दोन वर्षांला त्यांची बदली करण्याचे धोरण राज्य शासनाने अवलंबले होते. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मध्ये महाराष्ट्र पोलीस (सुधारणा) अद्यादेश २0१४ अन्वये पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यात बदल्यांबाबत सुधारणा करण्यात आली. पूर्वीप्रमाणेच सहा वर्षांतून बदली करण्याचा अध्यादेश आणि सुधारणा करण्याचा शासनाचा विचार आहे. त्यामुळे पोलीस कर्मचार्यांनी समाधान व्यक्त केले आहे. महाराष्ट्र पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षक यांच्या बदल्यांबाबत सर्वसाधारण धोरण निश्चित करण्यात आले होते. पोलीस शिपायांच्या प्रथम नेमणुकीनंतर प्रशिक्षण व मुख्यालय येथील तीन वर्षांची विहित सेवा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची मुख्यालयातून इतर ठिकाणी बदली करण्यात येईल. ज्या पोलीस कर्मचार्यांना एका पोलीस ठाण्यात दोन वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण झाला असेल तर प्रशासकीय दृष्टिकोनातून शक्य असल्यास त्यांची त्याच उपविभागातील परिमंडळातील दुसर्या पोलीस ठाण्यात बदली करण्यात येईल. उपविभाग किंवा परिमंडळात चार वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यास व सध्याच्या ठिकाणी दोन वर्षे पूर्ण होत असतील तर त्यांच्या अन्य पोलीस ठाणे, मुख्यालय, घटक शाखा या ठिकाणी बदल्या करण्यात येईल. अशा पद्धतीने शासनाने ७ एप्रिल २0१४ रोजी अध्यादेश पाठविला होता. त्यामुळे पोलीस शिपाई व अधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली होती. अशा पद्धतीने जर दोन वर्षांला पोलीस खात्यात बदली झाली असती तर मुलांचे शैक्षणिक नुकसान होत होते. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मध्ये सुधारण अद्यादेश २0१४ नुसार बदल्यांमध्ये सुधारणा केली करण्यात आलेली आहे. तसेच या अद्यादेशात काही दुरुस्ती करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. त्यामुळे या सुधारणा मिळेपयर्ंत केवळ पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या यापूर्वीच्याच धोरणानुसार अस्तित्वात असलेल्या नियमांची कार्यपद्धतीनुसार करण्यात यावी, असे आदेश पोलीस महासंचालक (आस्थापना) महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी शासनाला आदेश दिले आहेत.त्यामुळे दोन वर्षांच्या बदलीबाबत सध्यातरी स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे पोलीस कर्मचारी, कुटुंबीयांमध्ये जुन्याच पध्दतीने बदल्या होणार असल्याने व यामुळे पाल्यांचे शिक्षणाबाबत अडचणी येणार नसल्याने एकंदरीत समाधानाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे
जुन्या पध्दतीनेच होणार बदल्या; पोलिसांना मिळणार स्थिरता
By admin | Updated: May 28, 2014 23:39 IST