शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

जुन्या पध्दतीनेच होणार बदल्या; पोलिसांना मिळणार स्थिरता

By admin | Updated: May 28, 2014 23:39 IST

किमान सहा वर्षे तरी एकाच ठिकाणी राहता येणार असल्याने पोलीस कर्मचार्‍यांबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांनीही सुटकेचा निश्‍वास सोडला आहे.

वाशिम : पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस शिपाईपासून सहायक पोलीस उपनिरीक्षकांच्या दर दोन वर्षांनी बदल्या करण्याचे धोरण राज्य शासनाने अवलंबले होते. मात्र, यामध्ये सुधारणा केली आहे. यामुळे किमान सहा वर्षे तरी एकाच ठिकाणी राहता येणार असल्याने पोलीस कर्मचार्‍यांबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांनीही सुटकेचा निश्‍वास सोडला आहे. पोलीस दलात कार्यरत असलेले शिपाई ते सहायक उपनिरीक्षक यांना एकाच गावात जास्त दिवस न ठेवता दर दोन वर्षांला त्यांची बदली करण्याचे धोरण राज्य शासनाने अवलंबले होते. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मध्ये महाराष्ट्र पोलीस (सुधारणा) अद्यादेश २0१४ अन्वये पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यात बदल्यांबाबत सुधारणा करण्यात आली. पूर्वीप्रमाणेच सहा वर्षांतून बदली करण्याचा अध्यादेश आणि सुधारणा करण्याचा शासनाचा विचार आहे. त्यामुळे पोलीस कर्मचार्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. महाराष्ट्र पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षक यांच्या बदल्यांबाबत सर्वसाधारण धोरण निश्‍चित करण्यात आले होते. पोलीस शिपायांच्या प्रथम नेमणुकीनंतर प्रशिक्षण व मुख्यालय येथील तीन वर्षांची विहित सेवा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची मुख्यालयातून इतर ठिकाणी बदली करण्यात येईल. ज्या पोलीस कर्मचार्‍यांना एका पोलीस ठाण्यात दोन वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण झाला असेल तर प्रशासकीय दृष्टिकोनातून शक्य असल्यास त्यांची त्याच उपविभागातील परिमंडळातील दुसर्‍या पोलीस ठाण्यात बदली करण्यात येईल. उपविभाग किंवा परिमंडळात चार वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यास व सध्याच्या ठिकाणी दोन वर्षे पूर्ण होत असतील तर त्यांच्या अन्य पोलीस ठाणे, मुख्यालय, घटक शाखा या ठिकाणी बदल्या करण्यात येईल. अशा पद्धतीने शासनाने ७ एप्रिल २0१४ रोजी अध्यादेश पाठविला होता. त्यामुळे पोलीस शिपाई व अधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली होती. अशा पद्धतीने जर दोन वर्षांला पोलीस खात्यात बदली झाली असती तर मुलांचे शैक्षणिक नुकसान होत होते. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मध्ये सुधारण अद्यादेश २0१४ नुसार बदल्यांमध्ये सुधारणा केली करण्यात आलेली आहे. तसेच या अद्यादेशात काही दुरुस्ती करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. त्यामुळे या सुधारणा मिळेपयर्ंत केवळ पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या यापूर्वीच्याच धोरणानुसार अस्तित्वात असलेल्या नियमांची कार्यपद्धतीनुसार करण्यात यावी, असे आदेश पोलीस महासंचालक (आस्थापना) महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी शासनाला आदेश दिले आहेत.त्यामुळे दोन वर्षांच्या बदलीबाबत सध्यातरी स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे पोलीस कर्मचारी, कुटुंबीयांमध्ये जुन्याच पध्दतीने बदल्या होणार असल्याने व यामुळे पाल्यांचे शिक्षणाबाबत अडचणी येणार नसल्याने एकंदरीत समाधानाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे