शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या पध्दतीनेच होणार बदल्या; पोलिसांना मिळणार स्थिरता

By admin | Updated: May 28, 2014 23:39 IST

किमान सहा वर्षे तरी एकाच ठिकाणी राहता येणार असल्याने पोलीस कर्मचार्‍यांबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांनीही सुटकेचा निश्‍वास सोडला आहे.

वाशिम : पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस शिपाईपासून सहायक पोलीस उपनिरीक्षकांच्या दर दोन वर्षांनी बदल्या करण्याचे धोरण राज्य शासनाने अवलंबले होते. मात्र, यामध्ये सुधारणा केली आहे. यामुळे किमान सहा वर्षे तरी एकाच ठिकाणी राहता येणार असल्याने पोलीस कर्मचार्‍यांबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांनीही सुटकेचा निश्‍वास सोडला आहे. पोलीस दलात कार्यरत असलेले शिपाई ते सहायक उपनिरीक्षक यांना एकाच गावात जास्त दिवस न ठेवता दर दोन वर्षांला त्यांची बदली करण्याचे धोरण राज्य शासनाने अवलंबले होते. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मध्ये महाराष्ट्र पोलीस (सुधारणा) अद्यादेश २0१४ अन्वये पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यात बदल्यांबाबत सुधारणा करण्यात आली. पूर्वीप्रमाणेच सहा वर्षांतून बदली करण्याचा अध्यादेश आणि सुधारणा करण्याचा शासनाचा विचार आहे. त्यामुळे पोलीस कर्मचार्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. महाराष्ट्र पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षक यांच्या बदल्यांबाबत सर्वसाधारण धोरण निश्‍चित करण्यात आले होते. पोलीस शिपायांच्या प्रथम नेमणुकीनंतर प्रशिक्षण व मुख्यालय येथील तीन वर्षांची विहित सेवा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची मुख्यालयातून इतर ठिकाणी बदली करण्यात येईल. ज्या पोलीस कर्मचार्‍यांना एका पोलीस ठाण्यात दोन वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण झाला असेल तर प्रशासकीय दृष्टिकोनातून शक्य असल्यास त्यांची त्याच उपविभागातील परिमंडळातील दुसर्‍या पोलीस ठाण्यात बदली करण्यात येईल. उपविभाग किंवा परिमंडळात चार वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यास व सध्याच्या ठिकाणी दोन वर्षे पूर्ण होत असतील तर त्यांच्या अन्य पोलीस ठाणे, मुख्यालय, घटक शाखा या ठिकाणी बदल्या करण्यात येईल. अशा पद्धतीने शासनाने ७ एप्रिल २0१४ रोजी अध्यादेश पाठविला होता. त्यामुळे पोलीस शिपाई व अधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली होती. अशा पद्धतीने जर दोन वर्षांला पोलीस खात्यात बदली झाली असती तर मुलांचे शैक्षणिक नुकसान होत होते. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मध्ये सुधारण अद्यादेश २0१४ नुसार बदल्यांमध्ये सुधारणा केली करण्यात आलेली आहे. तसेच या अद्यादेशात काही दुरुस्ती करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. त्यामुळे या सुधारणा मिळेपयर्ंत केवळ पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या यापूर्वीच्याच धोरणानुसार अस्तित्वात असलेल्या नियमांची कार्यपद्धतीनुसार करण्यात यावी, असे आदेश पोलीस महासंचालक (आस्थापना) महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी शासनाला आदेश दिले आहेत.त्यामुळे दोन वर्षांच्या बदलीबाबत सध्यातरी स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे पोलीस कर्मचारी, कुटुंबीयांमध्ये जुन्याच पध्दतीने बदल्या होणार असल्याने व यामुळे पाल्यांचे शिक्षणाबाबत अडचणी येणार नसल्याने एकंदरीत समाधानाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे