शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जिल्हाधिकाऱ्यांच्या जागा हस्तांतरणाला आव्हान; महसूल मंत्र्यांची स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:17 IST

आशिष गावंडे/ अकोला शहरातील जनता भाजी बाजार व जुन्या बसस्थानकाच्या जागेवर वाणिज्य संकुल उभारण्याच्या महापालिकेच्या प्रयत्नांना सुरुंग लागला आहे. ...

आशिष गावंडे/ अकोला

शहरातील जनता भाजी बाजार व जुन्या बसस्थानकाच्या जागेवर वाणिज्य संकुल उभारण्याच्या महापालिकेच्या प्रयत्नांना सुरुंग लागला आहे. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही जागेचा महापालिकेला आगाऊ ताबा दिल्याप्रकरणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे स्वतंत्र स्थगिती अर्ज दाखल केला असता महसूलमंत्र्यांनी या संपूर्ण प्रक्रियेला सुनावणी होईपर्यंत स्थगिती देण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.

शहराच्या मध्य भागातील जनता भाजी बाजारच्या जागेवर वाणिज्य संकुल, तसेच भाजी बाजाराचे आरक्षण आहे. जुन्या बसस्थानकाच्या जागेवर वाणिज्य संकुल व सिटी बसस्थानकाचे आरक्षण असून, बाजोरिया क्रीडांगणाच्या जागेवर प्रेक्षागृहाचे आरक्षण आहे. दरम्यान, या तीनही जागा विकसित करण्याच्या उद्देशातून मनपा प्रशासनाने तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे जागेचा ताबा देण्याची विनंती केली होती. या तीनही जागांच्या बदल्यात महापालिकेला ३० कोटी रुपयांचे शुल्क जिल्हा प्रशासनाकडे जमा करणे भाग होते. तत्कालीन मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी जिल्हा प्रशासनाकडे जनता भाजी बाजार व जुन्या बसस्थानकाच्या जागेच्या मोबदल्यात २६ कोटी रुपयांचा भरणा केला. दरम्यान, या दोन्ही जागा हस्तांतरित करताना तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी निकषानुसार जागा हस्तांतरित केली नसल्याचा मुद्दा मेहबूब खान यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे स्वतंत्र स्थगिती अर्जाद्वारे उपस्थित केला. अर्जातील नमूद विविध तांत्रिक मुद्दे लक्षात घेता महसूलमंत्र्यांनी याप्रकरणी सुनावणी होईपर्यंत पुढील सर्व प्रक्रियेला स्थगिती देण्याचा आदेश २१ मे रोजी जारी केला आहे.

मनपाच्या भूमिकेकडे लक्ष

मनपा आयुक्त निमा अरोरा यांच्या आदेशानुसार जनता भाजी बाजारातील व्यावसायिकांना दुकाने हटविण्याच्या उद्देशातून नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. संबंधित व्यावसायिकांना सुनावणीसाठी २४ व २५ मे रोजी मनपात उपस्थित राहण्याचे निर्देश आहेत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आदेशामुळे मनपा प्रशासनाच्या वेगवान घडामोडींना ‘ब्रेक’ लागला असून, याप्रकरणी आयुक्त निमा अरोरा कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शासनाचे आर्थिक नुकसान

तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी जागा हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेत जागेच्या मूल्यांकनाचा दिनांक निश्चित केला. त्यानुसार मूल्यांकनाची रक्कम निश्चित करण्यात आली. यामुळे शासनाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा तांत्रिक मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.