शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

जिल्हाधिकाऱ्यांच्या जागा हस्तांतरणाला आव्हान; महसूल मंत्र्यांची स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:17 IST

आशिष गावंडे/ अकोला शहरातील जनता भाजी बाजार व जुन्या बसस्थानकाच्या जागेवर वाणिज्य संकुल उभारण्याच्या महापालिकेच्या प्रयत्नांना सुरुंग लागला आहे. ...

आशिष गावंडे/ अकोला

शहरातील जनता भाजी बाजार व जुन्या बसस्थानकाच्या जागेवर वाणिज्य संकुल उभारण्याच्या महापालिकेच्या प्रयत्नांना सुरुंग लागला आहे. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही जागेचा महापालिकेला आगाऊ ताबा दिल्याप्रकरणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे स्वतंत्र स्थगिती अर्ज दाखल केला असता महसूलमंत्र्यांनी या संपूर्ण प्रक्रियेला सुनावणी होईपर्यंत स्थगिती देण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.

शहराच्या मध्य भागातील जनता भाजी बाजारच्या जागेवर वाणिज्य संकुल, तसेच भाजी बाजाराचे आरक्षण आहे. जुन्या बसस्थानकाच्या जागेवर वाणिज्य संकुल व सिटी बसस्थानकाचे आरक्षण असून, बाजोरिया क्रीडांगणाच्या जागेवर प्रेक्षागृहाचे आरक्षण आहे. दरम्यान, या तीनही जागा विकसित करण्याच्या उद्देशातून मनपा प्रशासनाने तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे जागेचा ताबा देण्याची विनंती केली होती. या तीनही जागांच्या बदल्यात महापालिकेला ३० कोटी रुपयांचे शुल्क जिल्हा प्रशासनाकडे जमा करणे भाग होते. तत्कालीन मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी जिल्हा प्रशासनाकडे जनता भाजी बाजार व जुन्या बसस्थानकाच्या जागेच्या मोबदल्यात २६ कोटी रुपयांचा भरणा केला. दरम्यान, या दोन्ही जागा हस्तांतरित करताना तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी निकषानुसार जागा हस्तांतरित केली नसल्याचा मुद्दा मेहबूब खान यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे स्वतंत्र स्थगिती अर्जाद्वारे उपस्थित केला. अर्जातील नमूद विविध तांत्रिक मुद्दे लक्षात घेता महसूलमंत्र्यांनी याप्रकरणी सुनावणी होईपर्यंत पुढील सर्व प्रक्रियेला स्थगिती देण्याचा आदेश २१ मे रोजी जारी केला आहे.

मनपाच्या भूमिकेकडे लक्ष

मनपा आयुक्त निमा अरोरा यांच्या आदेशानुसार जनता भाजी बाजारातील व्यावसायिकांना दुकाने हटविण्याच्या उद्देशातून नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. संबंधित व्यावसायिकांना सुनावणीसाठी २४ व २५ मे रोजी मनपात उपस्थित राहण्याचे निर्देश आहेत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आदेशामुळे मनपा प्रशासनाच्या वेगवान घडामोडींना ‘ब्रेक’ लागला असून, याप्रकरणी आयुक्त निमा अरोरा कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शासनाचे आर्थिक नुकसान

तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी जागा हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेत जागेच्या मूल्यांकनाचा दिनांक निश्चित केला. त्यानुसार मूल्यांकनाची रक्कम निश्चित करण्यात आली. यामुळे शासनाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा तांत्रिक मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.