शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

चाकतिर्थ प्रकल्प पडला कोरडा

By admin | Updated: March 21, 2017 14:12 IST

मालेगाव: उन्हाळ्याला सध्याच सुरुवात झाली असताना मालेगाव तालुक्यातील चाकतिर्थ हा जलप्रकल्प कोरडा पडला आहे.

पाणीटंचाईची समस्या: क्षमतेपेक्षा अधिक उपसा केल्याचा परिणाम मालेगाव: उन्हाळ्याला सध्याच सुरुवात झाली असताना मालेगाव तालुक्यातील चाकतिर्थ हा जलप्रकल्प कोरडा पडला आहे. सिंचनासाठी वारेमाप उपसा केल्यामुळे या प्रकल्पातील जलसाठा संपल्याचे दिसत आहे.मालेगाव तालुक्यात जऊळका रेल्वे यागावानजिक काटेपूर्णा नदीवर चाकतिर्थ प्रकल्प उभारण्यात आला आहे. जवळपास आठ ते दहा वर्षांपूर्वी या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. प्रकल्पाची साठवण क्षमता मोठी असून, या प्रकल्प परिसरातील नाल्यांच्या संख्येमुळे हा प्रकल्प नेहमी काठोकाठ भरतो. यंदाही हा प्रकल्प पूर्णपणे भरला होता. त्यामुळे या उन्हाळ्यात परीसरातील गावांत पाणीटंचाई जाणवणार नसल्याचा विश्वास वाटत होता; परंतु हा प्रकल्प अद्याप उन्हाळ्याला सुरुवातही झाली नसतानाच कोरडा पडला आहे. या प्रकल्पातून जऊळका रेल्वे येथील तीन गावे पाणी पुरवठा योजना राबविण्यात येते. मालेगाव तालुक्यातील महत्त्वाच्या प्रकल्पात समाविष्ट असलेला हा प्रकल्प आटल्यामुळे या पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न गंभीर झाला आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासह त्यापूर्वी आवश्यकता वाटली तेव्हा खरीपातही या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केला. त्यामुळे वेळेपूर्वीच हा प्रकल्प आटला आहे. सिंचनासाठी उपयुक्त असलेल्या या प्रकल्पातून शेकडो हेक्टर शेतीवर सिंचन होते; परंतु आता या प्रकल्पात पाणीच नसल्याने शेती सिंचनच काय, तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभी झालेला आहे.या प्रकल्पात पाण्याचे स्त्रोत मोठ्या प्रमाणात असले तरी, पाण्याचा वापर लक्षात घेता या प्रकल्पाच्या भिंतींची उंची वाढविणे आवश्यक झाले आहे.