शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

चाकतिर्थ प्रकल्प पडला कोरडा

By admin | Updated: March 21, 2017 14:12 IST

मालेगाव: उन्हाळ्याला सध्याच सुरुवात झाली असताना मालेगाव तालुक्यातील चाकतिर्थ हा जलप्रकल्प कोरडा पडला आहे.

पाणीटंचाईची समस्या: क्षमतेपेक्षा अधिक उपसा केल्याचा परिणाम मालेगाव: उन्हाळ्याला सध्याच सुरुवात झाली असताना मालेगाव तालुक्यातील चाकतिर्थ हा जलप्रकल्प कोरडा पडला आहे. सिंचनासाठी वारेमाप उपसा केल्यामुळे या प्रकल्पातील जलसाठा संपल्याचे दिसत आहे.मालेगाव तालुक्यात जऊळका रेल्वे यागावानजिक काटेपूर्णा नदीवर चाकतिर्थ प्रकल्प उभारण्यात आला आहे. जवळपास आठ ते दहा वर्षांपूर्वी या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. प्रकल्पाची साठवण क्षमता मोठी असून, या प्रकल्प परिसरातील नाल्यांच्या संख्येमुळे हा प्रकल्प नेहमी काठोकाठ भरतो. यंदाही हा प्रकल्प पूर्णपणे भरला होता. त्यामुळे या उन्हाळ्यात परीसरातील गावांत पाणीटंचाई जाणवणार नसल्याचा विश्वास वाटत होता; परंतु हा प्रकल्प अद्याप उन्हाळ्याला सुरुवातही झाली नसतानाच कोरडा पडला आहे. या प्रकल्पातून जऊळका रेल्वे येथील तीन गावे पाणी पुरवठा योजना राबविण्यात येते. मालेगाव तालुक्यातील महत्त्वाच्या प्रकल्पात समाविष्ट असलेला हा प्रकल्प आटल्यामुळे या पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न गंभीर झाला आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासह त्यापूर्वी आवश्यकता वाटली तेव्हा खरीपातही या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केला. त्यामुळे वेळेपूर्वीच हा प्रकल्प आटला आहे. सिंचनासाठी उपयुक्त असलेल्या या प्रकल्पातून शेकडो हेक्टर शेतीवर सिंचन होते; परंतु आता या प्रकल्पात पाणीच नसल्याने शेती सिंचनच काय, तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभी झालेला आहे.या प्रकल्पात पाण्याचे स्त्रोत मोठ्या प्रमाणात असले तरी, पाण्याचा वापर लक्षात घेता या प्रकल्पाच्या भिंतींची उंची वाढविणे आवश्यक झाले आहे.