शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानभूमी, तीर्थक्षेत्र निधी खर्च वांध्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2017 05:07 IST

५९ कामांचे २.२५ कोटी रुपये जाणार परत

सदानंद सिरसाट अकोला : जिल्हा परिषद, नियोजन समितीच्या मंजुरी प्रक्रियेत अडकलेली जिल्ह्यातील स्मशानभूमी आणि तीर्थक्षेत्र विकासाची ५९ कामे आता थांबणार आहेत. दोन वर्षांच्या मुदतीत निधी खर्च न झाल्याने २ कोटी २२ लाख रुपये निधी शासनजमा करण्याची वेळ जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागावर आली आहे. विशेष म्हणजे, हा निधी खर्च करण्यासाठी २० फेब्रुवारी २०१७ रोजी देण्यात आला होता. जिल्ह्यात जनसुविधा आणि तीर्थक्षेत्र विकासाच्या कामांसाठी २०१५-१६ मध्ये निधी देण्यात आला होता. त्यामध्ये लहान ग्रामपंचायतींना जनसुविधेसाठी विशेष अनुदान, मोठ्या ग्रामपंचायतींना विशेष अनुदानाच्या निधीसह तीर्थक्षेत्राचा विकास कामांसाठी निधीचा समावेश आहे. हा निधी खर्च करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नियोजन ठेवण्यात आले; मात्र जुलै २०१६ नंतर थेट २ जानेवारी २०१७ रोजीच्या नियोजन समितीच्या बैठकीतच गावांची निवड आणि कामांना निधी खर्चाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हा निधी खर्च करण्यासाठी २० फेब्रुवारी २०१७ रोजी प्रशासकीय मंजुरी देत निधी वाटप केला. त्यामध्ये १६ लहान ग्रामपंचायतींना जनसुविधांतर्गत स्मशानभूमी विकासासाठी शेड बांधकाम, सिमेंट रस्ता कामासाठी ५० लाख रुपये देण्यात आले. त्यासोबतच २३ मोठ्या ग्रामपंचायतींना जनसुविधेंतर्गत त्याच कामांसाठी ७९ लाख ६६ हजार रुपये देण्यात आले, तसेच यात्रा स्थळांच्या विकास कार्यक्रमासाठी २० कामांना ९२ लाख ४० हजार रुपये वाटप करण्यात आले. हा निधी देतानाच संबंधित गटविकास अधिकाऱ्यांना ३१ मार्च २०१७ अखेरपर्यंत खर्च करण्याची अट टाकण्यात आली. निधी खर्च करण्याची दोन वर्षांची मुदत संपल्याने हा निधी शासनजमा करावाच लागणार आहे. पालकमंत्र्यांनी मंजुरी दिलेली कामेअनेक गावांमध्ये पावसाळ्यात स्मशानभूमीची समस्या बिकट आहे. ती मार्गी लागणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील स्मशानभूमी आणि तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील अध्यक्ष असलेल्या जिल्हा नियोजन व विकास समितीने मान्यता दिली आहे. शासनाकडे त्यांनी पाठपुरावा केल्यास जिल्हा विकासासाठी असलेला हा निधी खर्च करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. स्मशानभूमीची कामे रखडणाऱ्या ग्रामपंचायतीजनसुविधेंतर्गत लहान आणि मोठ्या ग्रामपंचायतींना निधी देण्यात आला आहे. दोन्ही मिळून १ कोटी २९ लाख ६६ हजार रुपये एवढा निधी खर्च वांध्यात आला आहे. त्यामुळे ३९ गावांतील स्मशानभूमी विकासाची कामे रखडणार आहेत. त्यामध्ये पळसो बढे, कासमपूर (पळसो बढे), कुरणखेड-२, दहिगाव गावंडे, कौलखेड जहॉ., कानशिवणी, चिखलगाव, बाभूळगाव जहॉ., कुंभारी, उगवा, आपातापा, निंभोरा, मुंडगाव, रिधोरा, जामवसू, महान, कुरूम, हातगाव, पाथर्डी, हिवरखेड-३ कामे, पैलपाडा, पिंप्री खुर्द, चांदुर, खापरवाडी, अंबाडी, वडाळी सटवाई, वडगाव मेंढे, लामकाणी, बोराडा बोरवाकडी, घोटा, साहित, रामखेड, अंबाशी, पाचरण, दिग्रस खुर्द, वारखेड या गावांचा समावेश आहे. तीर्थक्षेत्र विकासाची २० कामे बाधितजिल्हा वार्षिक योजनेतून यात्रा स्थळ विकास कार्यक्रमांतर्गत २० कामांसाठी ९२ लाख ४० हजार रुपये देण्यात आले. त्या कामांसाठी पळसो बढे, कौलखेड जहॉ, हिंगणी बुद्रूक, पातूर नंदापूर, येवता, गोरेगाव बुद्रूक, वाकी, पातोंडा, ढगा, जनुना, शिंदखेड, दोनद खुर्द, मधापुरी, नेर, तळेगाव खुर्द, तळेगाव बुद्रूक, पंचगव्हाण, विवरा, आलेगाव, पास्टुल या गावांतील विविध संस्थान, आश्रम, मंदिर, विहारांची निवड करण्यात आली होती.