शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

कारागृहात सीसी कॅमेरे, परंतु डिस्प्ले नाही!

By admin | Updated: April 8, 2015 01:47 IST

जामर असूनही लागतात मोबाइल.

नितीन गव्हाळे / अकोला: नागपूर कारागृहातून पाच कैदी पळून गेल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. यावरून राज्यातील कारागृहांच्या सुरक्षेविषयक उपाययोजना किती कुचकामी आहेत, हेदेखील स्पष्ट झाले आहे. या पृष्ठभूमीवर अकोला जिल्हा कारागृहातील सुरक्षाविषयक उपाययोजनांचा आढावा घेतला असता, काही बाबी गंभीर असल्याचे निदर्शनास आले. जिल्हा कारागृहामध्ये सीसी कॅमेरे बसविले आहेत, परंतु काही कॅमेर्‍यांचे नियंत्रण करण्यासाठी डिस्प्ले नाही. मोबाइल जामर लागले असतानाही कॉल बिनदिक्कतपणे लावता येतात. नागपूर कारागृहातून पाच कुख्यात कैदी २५ फुटांची भिंत ओलांडून पसार झाल्याची घटना ३१ मार्च रोजी घडली. या घटनेमुळे कारागृहांतील सुरक्षा व्यवस्था किती कुचकामी आहे, हे समोर आले. यानिमित्ताने मंगळवारी ह्यलोकमतह्णने अकोला जिल्हा कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेची माहिती जाणून घेतली. जिल्हा कारागृह परिसरामध्ये दोन वर्षांपूर्वी १ लाख ९९ हजार रुपयांच्या निधीतून २३ सीसी कॅमेरे लावण्यात आले. यातील मोजक्याच कॅमेर्‍यांना डिस्प्ले आहेत आणि इतर कॅमेरे डिस्प्लेशिवाय आहेत. त्यामुळे कॅमेर्‍यांनी टिपलेले चित्रणाचा संग्रह करता येत नाही. कारागृहातील कैद्यांच्या, कर्मचार्‍यांच्या हालचाली टिपण्यासाठी डिस्प्ले (टीव्ही) असणे गरजेचे आहे; परंतु निधीअभावी कारागृह प्रशासनाला डिस्प्ले खरेदी आले नाहीत. त्यामुळे कारागृहात सीसी कॅमेरे असूनही कोणताच उपयोग होत नसल्याने कारागृहातील सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.