शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

गुरांचे बाजार बंदच; शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:14 IST

---------------------- नागरिकांची नाडी बोगस डाॅक्टरांच्या हाती बार्शीटाकळी : ग्रामीण भागात आता कोरोना महामारीच्या संकटात बोगस डाॅक्टर सक्रिय झाले आहेत. ...

----------------------

नागरिकांची नाडी बोगस डाॅक्टरांच्या हाती

बार्शीटाकळी : ग्रामीण भागात आता कोरोना महामारीच्या संकटात बोगस डाॅक्टर सक्रिय झाले आहेत. शहरातील महागडा उपचार गरीब रुग्णांना झेपणारा नाही. त्यामुळे पर्याय नसल्याने ते बोगस डाॅक्टरांकडे जात आहेत. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

--------------------------

खताची दरवाढ; शेतकऱ्यांना आर्थिक फटका

तेल्हारा : शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या तयारीला सुरुवात केली आहे. अशातच रासायनिक खताचे भाव वधारले असून, त्यामुळे लागवड खर्च दुपटीवर जाण्याची शक्यता आहे. या समस्येवर शासनाकडून मात्र कोणताच निर्णय घेताना दिसत नाही. खताचे दर कमी करण्याची मागणी होत आहे.

-----------------------

बाळापूर तालुक्यातील स्मशानभूमींची दैना

बाळापूर : तालुक्यातील ग्रामीण भागातील स्मशानभूमींची दैनावस्था झाली आहे. विशेष म्हणजे, पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात अंत्यसंस्कार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे स्मशानभूमींची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

------------------------------

अकोट तालुक्यात अवैध वृक्षतोडीला जोर

अकोट : तालुक्यातील जंगलात अवैध वृक्षतोडीला जोर आला आहे. सागवान तस्कर सक्रिय झाले आहे. रात्री जंगलातील लाकूड तोडले जात आहे. अंधाराचा लाभ उचलून त्याची वाहतूक केली जात आहे. वन विभागाच्या गस्तीची गरज आहे.

------------------

अकोला तालुक्यात वन्यप्राण्यांची गावाकडे धाव

अकोला : तालुक्यातील जंगलांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेत आहे. यातून मानव आणि प्राणी असा संघर्ष निर्माण झाला आहे. वनविभागाने जंगलातच पाण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे.

------------------------

दिग्रस परिसरात भुरट्या चोऱ्या वाढल्याने चिंतेत भर

दिग्रस बु. : परिसरातील गावांमध्ये भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. घराच्या परिसरातील दैनंदिन उपयोगाच्या वस्तू लंपास केल्या जात आहेत. माेठी वस्तू जात नसल्याने नागरिकही तक्रारी देण्यास पुढे येत नाहीत. गत दोन-तीन महिन्यांत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

-----------------------

विविध योजनेतील घरकूल रखडले

अकोला : जिल्ह्यातील अनेक लाभार्थींना विविध योजनांतून घरकूल मंजूर झाले. सुरुवातीला रेतीअभावी बांधकामे रखडली. आता बांधकामाला लाॅकडाऊनचा फटका बसत आहे. मजूर मिळत नसल्याने लाभार्थींची परवड होत आहे.

----------------------

निराधार, शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावा

अकोला : जिल्ह्यातील निराधार आणि शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावा, अशी मागणी होत आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याची मदत त्वरित देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. याकडे संबंधित विभागाने दखल घेऊन शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

----------------------

ग्रामीण भागातील रस्ते डांबरीकरणाविना

अकोला : जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागात रस्ते बांधकाम केले जाते; मात्र अनेक गावांना जोडणारे रस्ते डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत असल्याचे समोर आले आहे. यावर्षीच्या पावसाने तर शहरी तसेच ग्रामीण रस्त्यांची वाट लागली आहे. रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी अनेकदा करण्यात आली आहे.