शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

जिल्ह्याच्या ठिकाणी जात पडताळणी समिती स्थापन होणार

By admin | Updated: March 3, 2015 23:43 IST

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा निर्णय.

बुलडाणा : जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी राज्यातील मागासवर्गीयांची कित्येक किलोमीटर होणारी पायपीट आता थांबणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला जात पडताळणी कार्यालयाचा निर्णय २ मार्च रोजी घेतला आहे. अनुसुचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसचे इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्गातील व्यक्तींसाठी सध्या विभागीयस्तरीय जात पडताळणी समिती आहेत. नागरिकांना जात पडताळणी करताना होणारा त्रास कमी करण्यासाठी राज्यात जिल्हानिहाय जात पडताळणी समिती स्थापन करण्याचा निर्णय शासनाने सोमवारी घेतला आहे. यापूर्वी २२ नोव्हेंबर २0१३ च्या आदेशान्वये राज्यातील ३५ जिल्ह्यांसाठी केवळ १५ विभागीय जात पडताळणी समिती स्थापन करण्यात आल्या होत्या. त्यामुळे दोन-तीन जिल्ह्यांसाठी एकच समिती कार्यरत होती. परिणामी मागासवगीर्यांना प्रमाणपत्रासाठी पायपीट करावी लागत होती. एकाच वेळी मोठय़ा संख्येने पडताळणी अर्ज दाखल झाल्यास समितीपुढे अडचणी निर्माण होत. यातच काही समित्यांना सदस्य सचिव नाहीत, अध्यक्ष नाहीत, अशी कारणे पुढे येत होती.

*अध्यक्ष व सदस्य सचिवाच्या नियुक्ती

   प्रत्येक जिल्ह्यातील अतिरिक्त जिल्हाधिकारी, समकक्ष अधिकारी, सामाजिक न्याय विभाग समितीचे पदसिद्ध अध्यक्ष राहणार आहेत. समाजकल्याण उपायुक्त सदस्य आणि सहाय्यक आयुक्त हे सदस्य सचिव व संशोधन अधिकारी म्हणून नियुक्त राहणार असल्याचे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

*नवी जात पडताळणी कार्यालये

         मुंबई शहर, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर, सातारा, सांगली, नगर, जळगाव, नंदुरबार, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांत नव्याने जात पडताळणी समिती निर्माण होणार आहे. *जुन्या समिती कायम राहणार यापूर्वी १५ जिल्ह्यात विभागीय समिती स्थापन करण्यात आल्या आहे. सोमवारी नव्याने दिलेल्या आदेशानुसार उर्वरित २१ जिल्ह्यात समिती स्थापन होणार आहेत. राज्यात ज्या पंधरा समित्या कार्यरत आहेत, त्या तशाच सुरू राहणार आहेत. नव्याने नेमलेल्या २१ समित्यांसाठीचे अध्यक्ष, सदस्य सचिव आणि सदस्य यांच्या नियुक्ती करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. *आठ महिन्यानंतर निर्णय ९ जून २0१४ च्या शासन निर्णयानुसार शासनाने जिल्हास्तरावर जात पडताळणी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयास समाज कल्याण विभागातील अधिकर्‍यांनी विरोध केल्याने तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्यास स्थगिती दिली होती. त्यावर निर्णय घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून एक महिन्याच्या आत निर्णय घेणे सूचित केले होते. मात्र ८ महिन्यानंतर या नव्याने समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला गेला.