शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
3
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
4
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
5
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
6
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
7
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
8
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
9
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
10
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
11
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
12
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
13
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
14
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
15
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
16
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
17
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
18
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
19
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
20
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?

जात, धर्माच्या नावावर हल्ले थांबवा!

By admin | Updated: July 8, 2017 02:18 IST

नागरिकांनी दिले ‘मूक धरणे’ : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जात आणि धार्मिक उन्मादातून करण्यात येणारे हल्ले आणि हत्यांचा निषेध करीत जात, धर्म व पंथाच्या नावार होणारे हल्ले तातडीने थांबविण्यात यावे, या मागणीसाठी अकोल्यातील नागरिकांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘मूक धरणे’ दिले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.देशात जात, धर्म उन्मादातून दररोज होणारे हल्ले आणि हत्याकांडात निरपराध नागरिकांच्या हत्या, जाळपोळ व मारहाणीच्याविरोधात ‘माझ्या नावावर अत्याचार नको’ (नॉट इन माय नेम) मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत देशात जात, धर्म, पंथाच्या नावावर कोणत्याही व्यक्ती व समूहावर हल्ले करणे व जीव घेणे थांबले पाहिजे, केंद्र सरकारने याबाबत दखल घेऊन विघातक प्रवृत्तीविरुद्ध कठोर कारवाई करावी, विशिष्ट धर्म किंवा विचारधारेचा प्रसार-प्रचार थांबविण्यात यावा, सामाजिक सलोखा बंधुभाव कायम राहावा, प्रत्येक नागरिकाने देशाच्या संविधानाप्रमाणे वर्तन करावे, यासाठी सरकारने पावले उचलून आतापर्यंत झालेले हल्ले व हत्या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी, दोषींविरुद्ध जलदगती न्यायालयात खटले चालवून त्यांना शिक्षा देण्यात यावी इत्यादी मागण्यांसाठी अकोल्यातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘मूक धरणे’ आंदोलन केले. मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींकडे सादर करण्यात आले. या धरणे आंदोलनात माजी राज्यमंत्री अजहर, गुलाबराव गावंडे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, उपाध्यक्ष जमीरउल्लाखा पठाण, डॉ. पुरुषोत्तम तायडे, सत्यपाल महाराज, राजेंद्र पातोडे, काझी नाझीमोद्दीन, मुफ्ती अशफाक कासमी, भन्ते श्रीलाभ, डॉ. सुभाष तिवारी, मजहर खान, पंकज जायले, भन्ते पूजानंद थेरो, साजीदखान पठाण, शहजाद अन्वर, धनंजय मिश्रा, डॉ. जिशान हुसेन, डॉ. नीलेश पाटील, अशोक पटोकार, मार्तंडराव माळी, प्रा. राजाभाऊ देशमुख, अजय तापडिया, श्रीकांत पिसे, सै. अलीमोद्दीन हाजी तौफीक अली, हामीद हुसेन, अविनाश नाकट, वली मोहम्मद, प्रा. सरफराज खान, पुरुषोत्तम आवारे, श्याम अवस्थी, मनोहर पाटील, प्रभजितसिंह बछेर, सुरेश पाटील, सरदारखा महेमुदखा, अविनाश देशमुख, पी.जे. वानखडे, मो. अतिकुर रहेमान, जावेद जकारिया, अन्वर शेरा, आसीफ अहमद खान, कपिल रावदेव, अ‍ॅड. प्रवीण तायडे, प्रतिभा अवचार, प्रा. मधू जाधव, गौरव कोहचडे, शाहीद खान, शरद वानखडे, नितीन सपकाळ, निर्भय पोहरे, दीपकराज डोंगरे, सैयद नासीर यांच्यासह विविध सामाजिक संस्था व संघटनांचे पदाधिकारी-कार्यकर्ते सहभागी झाले होते.