शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

जात, धर्म, पैसा व दारू हाच निवडणुकीचा आधार - डॉ. विठ्ठल वाघ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 14:16 IST

अकोला :  योग्य, अभ्यासू व्यक्ती निवडणुक जिंकत नाही. जात, धर्म, पैसा व दारूच निवडणुकीचा आधार आहे, असे मत प्रसिद्ध वºहाडी कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी लोकमत शी बोलताना व्यक्त केले. 

- नितीन गव्हाळे

अकोला :  योग्य, अभ्यासू व्यक्ती निवडणुक जिंकत नाही. जात, धर्म, पैसा व दारूच निवडणुकीचा आधार आहे, असे मत प्रसिद्ध वºहाडी कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी लोकमत शी बोलताना व्यक्त केले.  निवडणुकीत अनेक मुद्दे, समस्या चर्चिल्या जातात. आपल्या मतदारसंघातील प्रतिष्ठित, नावाजलेले कलावंत, या लोकसभा निवडणुकीकडे कशा पद्धतीने पाहतात, त्यांना कोणते महत्त्वाचे मुद्दे चर्चिले जायला हवे, याचा प्रातिनिधीक आढावा. एक कलावंत म्हणून तुम्ही सध्याच्या निवडणूक वातावरणाकडे कसे पाहता?लोकशाही पद्धतीने होत नाही. प्रादेशिक, राष्ट्रीय समस्या, प्रश्न, गरजा समोर ठेऊन निवडणुक लढविली पाहिजे. र्दुदैवाने तसे होताना दिसत नाही. खासदारांना गरजा, प्रश्न कसे सोडवाव्या, हे सांगता येत नाही आणि मतदारही विचारत नाहीत. विकासाचे ध्येय असल्याचे उमेदवार सांगतात. परंतु विकासाचे मार्ग, उपाययोजना कोणते आहेत. हे कोणी सांगत नाही. निवडणुक ही एक फास आहे. असे मी समजतो. योग्य, अभ्यासू व्यक्ती निवडणुक जिंकत नाही. जात, धर्म, पैसा व दारूच निवडणुकीचा आधार आहे.लोकसभा निवडणुकीत कोणते मुद्दे असायला हवेत?शेतकरी आत्महत्या, शेतीला पाणी, शेत मालावर प्रक्रिया करणारे उद्योग हे मुद्दे हवेत. परंतु त्याकडे जाणीवपुर्वक र्दुलक्ष केल्या जातात.नेरधामणा, जिगाव प्रकल्प रखडलेले आहेत. शहरात उड्डाणपुलांची गरज आहे. परंतु त्याकडे राजकीय पक्ष, उमेदवार प्राधान्य देत नाही. सुतगिरणी, साखर कारखाने सुरू झाले होते. ते टिकविता आले नाहीत. नेतृत्वाकडे जनतेविषयी आपुलकी, तळमळ, जाणीव नाही. अभ्यास नाही. केवळ विकासाच्या गप्पा केल्या जातात.तुमच्या क्षेत्राशी निगडित मुद्यांना राजकीय पक्ष किती महत्त्व देतात?अजिबात महत्व देत नाहीत. ज्यांच्यापासून फायदा होतो. भिती वाटते. अशांना महत्व दिल्या जाते. राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या १२ जागा असतात. त्यावर कला, साहित्य क्षेत्रातील कलावंतांना नियुक्त केले जात नाही. राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या नियुक्त्या केल्या जात. राजकीय पक्षांना कला, साहित्य, सांस्कृतिक, नाट्य क्षेत्राशी काहीही देणेघेणे नाही. त्यांच्या फायद्याच्या लोकांनाच महत्व दिल्या जाते.नवीन मतदारांना काय आवाहन कराल?लोकशाही बळकटीकरणासाठी मतदान करा. परंतु मतदान कोणाला करावे. हा प्रश्न आहे. लोकशाही अनुवांशिक ठरत आहे. एकही पक्ष त्या अपवाद नाही. बाप-लेक गाजतात..माय-लेक गाजोतात..आमच्याच कातड्याचे..सारे ढोल वाजोतात..अशी कविता म्हणत, त्यांनी विचारांपेक्षा भावनेच्या आहारी जाऊन मतदान करू नये.

टॅग्स :AkolaअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकakola-pcअकोलाinterviewमुलाखत