शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
5
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
6
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
7
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
8
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
9
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
10
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
11
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
12
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
13
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
14
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
15
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
16
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
17
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
18
उत्तर बार्शी भागातून वाहणाऱ्या चांदनी नदीला महापूर, नरसिंह मंदिर पाण्याखाली!
19
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
20
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर

जात, धर्म, पैसा व दारू हाच निवडणुकीचा आधार - डॉ. विठ्ठल वाघ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 14:16 IST

अकोला :  योग्य, अभ्यासू व्यक्ती निवडणुक जिंकत नाही. जात, धर्म, पैसा व दारूच निवडणुकीचा आधार आहे, असे मत प्रसिद्ध वºहाडी कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी लोकमत शी बोलताना व्यक्त केले. 

- नितीन गव्हाळे

अकोला :  योग्य, अभ्यासू व्यक्ती निवडणुक जिंकत नाही. जात, धर्म, पैसा व दारूच निवडणुकीचा आधार आहे, असे मत प्रसिद्ध वºहाडी कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी लोकमत शी बोलताना व्यक्त केले.  निवडणुकीत अनेक मुद्दे, समस्या चर्चिल्या जातात. आपल्या मतदारसंघातील प्रतिष्ठित, नावाजलेले कलावंत, या लोकसभा निवडणुकीकडे कशा पद्धतीने पाहतात, त्यांना कोणते महत्त्वाचे मुद्दे चर्चिले जायला हवे, याचा प्रातिनिधीक आढावा. एक कलावंत म्हणून तुम्ही सध्याच्या निवडणूक वातावरणाकडे कसे पाहता?लोकशाही पद्धतीने होत नाही. प्रादेशिक, राष्ट्रीय समस्या, प्रश्न, गरजा समोर ठेऊन निवडणुक लढविली पाहिजे. र्दुदैवाने तसे होताना दिसत नाही. खासदारांना गरजा, प्रश्न कसे सोडवाव्या, हे सांगता येत नाही आणि मतदारही विचारत नाहीत. विकासाचे ध्येय असल्याचे उमेदवार सांगतात. परंतु विकासाचे मार्ग, उपाययोजना कोणते आहेत. हे कोणी सांगत नाही. निवडणुक ही एक फास आहे. असे मी समजतो. योग्य, अभ्यासू व्यक्ती निवडणुक जिंकत नाही. जात, धर्म, पैसा व दारूच निवडणुकीचा आधार आहे.लोकसभा निवडणुकीत कोणते मुद्दे असायला हवेत?शेतकरी आत्महत्या, शेतीला पाणी, शेत मालावर प्रक्रिया करणारे उद्योग हे मुद्दे हवेत. परंतु त्याकडे जाणीवपुर्वक र्दुलक्ष केल्या जातात.नेरधामणा, जिगाव प्रकल्प रखडलेले आहेत. शहरात उड्डाणपुलांची गरज आहे. परंतु त्याकडे राजकीय पक्ष, उमेदवार प्राधान्य देत नाही. सुतगिरणी, साखर कारखाने सुरू झाले होते. ते टिकविता आले नाहीत. नेतृत्वाकडे जनतेविषयी आपुलकी, तळमळ, जाणीव नाही. अभ्यास नाही. केवळ विकासाच्या गप्पा केल्या जातात.तुमच्या क्षेत्राशी निगडित मुद्यांना राजकीय पक्ष किती महत्त्व देतात?अजिबात महत्व देत नाहीत. ज्यांच्यापासून फायदा होतो. भिती वाटते. अशांना महत्व दिल्या जाते. राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या १२ जागा असतात. त्यावर कला, साहित्य क्षेत्रातील कलावंतांना नियुक्त केले जात नाही. राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या नियुक्त्या केल्या जात. राजकीय पक्षांना कला, साहित्य, सांस्कृतिक, नाट्य क्षेत्राशी काहीही देणेघेणे नाही. त्यांच्या फायद्याच्या लोकांनाच महत्व दिल्या जाते.नवीन मतदारांना काय आवाहन कराल?लोकशाही बळकटीकरणासाठी मतदान करा. परंतु मतदान कोणाला करावे. हा प्रश्न आहे. लोकशाही अनुवांशिक ठरत आहे. एकही पक्ष त्या अपवाद नाही. बाप-लेक गाजतात..माय-लेक गाजोतात..आमच्याच कातड्याचे..सारे ढोल वाजोतात..अशी कविता म्हणत, त्यांनी विचारांपेक्षा भावनेच्या आहारी जाऊन मतदान करू नये.

टॅग्स :AkolaअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकakola-pcअकोलाinterviewमुलाखत