शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

रिझर्व्ह बँकेने कॅश रोखल्याने एटीएम कॅशलेस

By admin | Updated: April 20, 2017 01:15 IST

अकोला : रिझर्व्ह बँकेकडून दिली जाणारी नियमित कॅश अचानक रोखल्याने, एटीएममध्ये ठणठणाट आहे. अकोला शहरातील ५४ पैकी केवळ १० एटीएम सुरू असल्याने जनतेतून बँकांविरुद्ध ओरड सुरू झाली आहे.

अकोला : रिझर्व्ह बँकेकडून दिली जाणारी नियमित कॅश अचानक रोखल्याने, एटीएममध्ये ठणठणाट आहे. अकोला शहरातील ५४ पैकी केवळ १० एटीएम सुरू असल्याने जनतेतून बँकांविरुद्ध ओरड सुरू झाली आहे. स्टेट बँकेचे मोजके एटीएम वगळता इतर सर्व एटीएम शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. नोव्हेंबरमध्ये नोटाबंदी झाल्यानंतर देशभरातील एटीएम बंद पडले होते. त्यानंतर अनेक दिवस ही स्थिती कायम होती. तशीच अवस्था गत काही दिवसांपासून एटीएमची झाली आहे. मोजके एटीएम सोडले, तर जिल्ह्यातील सर्व एटीएम कॅशलेस झाले आहेत. नगद रकमेसाठी अनेकांना या एटीएमवरून त्या एटीएमवर धाव घ्यावी लागत आहे. लग्नसराईचे दिवस असल्याने लोकांना विविध खर्चासाठी रोकड लागते. एटीएममध्ये रोकडचा ठणठणाट असल्याने नागरीकांची कोंडी झाली आहे. दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बँकेने नुकताच शेतकऱ्यांना २५४ कोटींचे पीक कर्ज मंजूर केले; ही रक्कम एटीएम द्वारेच काढण्याचे आदेश असल्याने शेतकऱ्यांची ससेहोलपट होत आहे. अकोला जिल्ह्यात जवळपास दोनशे एटीएम ग्राहकांना सेवा देतात. नोटाबंदीनंतर कॅशलेसला चालना देण्यासाठी जिल्ह्यात पॉस मशीनची मागणी वाढली. दोन हजार पॉस मशीन अकोल्यात आहेत, तरीही मोठ्या प्रमाणात कॅशची मागणी वाढत आहे. दररोज अकोल्यातील एटीएममध्ये पाच कोटी रुपयांची कॅश रोज भरावी लागते. या रकमेत थोडी जरी अनियमितता आली, तरी ग्राहकांकडून ओरड सुरू होते. त्याचा सर्वात जास्त परिणाम स्टेट बँकेच्या एटीएमवर पडतो. टॉवर चौकातील स्टेट बँक शहरातील सर्वात मोठी बँक असून, सर्वात जास्त ग्राहक या बँकेचे आहेत. पाच कोटींपैकी तीन कोटींची कॅश रोज स्टेट बँकेला एटीएममध्ये भरावी लागते; मात्र गत काही दिवसांपासून रिझर्व्ह बँकेने कॅश रोखल्याने एटीएमच्या बाहेर कॅश नसल्याचे फलक लागले आहेत. रिझर्व्ह बँकेकडूनच कॅश येत नसल्याने सर्वच बँकांची कोंडी झाली आहे. अनेक एटीएम तर अनेक दिवसांपासून बंद पडून आहेत. एटीएममधून रकमा निघत नसल्याने काही दिवसांत अकोल्यातील एटीएमची संख्या घटण्याचे संकेत आहेत.दैनंदिन आर्थिक व्यवहार कॅशलेस करण्यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. कॅशलेस व्यवहारास चालना देण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांची आणि शेतकऱ्यांची मानसिकता बदलली पाहिजे.पीक कर्जाची रक्कम खर्च करण्यासाठी शेतकऱ्यांनी एटीएमवर गर्दी करण्याऐवजी कृषी सेवा केंद्रावरून कॅशलेस व्यवहार करावा. नागरिकांनीदेखील डेबिट कार्डचा वापर करून व्यवहार करावेत. कॅश व्यवहार असुरक्षित आहे. जर कुणी कॅशलेसच्या व्यवहारास नकार देत असेल, तर त्यांची तक्रार जिल्हाधिकारी किंवा जिल्हा अग्रणी बँकेकडे करावी.- तुकाराम गायकवाड, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, अकोला.स्टेट बँकेच्या ३५ एटीएमवर दररोज तीन कोटींची कॅश भरावी लागते. रिझर्व्ह बँकेकडून कॅश रोखल्या गेल्याने सर्वांनाच त्रास होत आहे. कॅश व्यवहार टाळण्याचा प्रयत्न नागरिकांनी करावा. भविष्यात कॅश हाताळणे कमी होणार आहे, यासाठी जनजागृतीची जास्त गरज आहे. आता रेशन दुकानातील व्यवहारदेखील कॅशलेस होणार आहे. नागरिक आणि शेतकऱ्यांनी नवीन धोरण स्वीकारण्यासाठी मानसिक तयारी करावी, त्याशिवाय पर्याय नाही. -एस.टी. बोर्डे, मुख्य व्यवस्थापक, स्टेट बँक अकोला.