शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

रिझर्व्ह बँकेने कॅश रोखल्याने एटीएम कॅशलेस

By admin | Updated: April 20, 2017 01:15 IST

अकोला : रिझर्व्ह बँकेकडून दिली जाणारी नियमित कॅश अचानक रोखल्याने, एटीएममध्ये ठणठणाट आहे. अकोला शहरातील ५४ पैकी केवळ १० एटीएम सुरू असल्याने जनतेतून बँकांविरुद्ध ओरड सुरू झाली आहे.

अकोला : रिझर्व्ह बँकेकडून दिली जाणारी नियमित कॅश अचानक रोखल्याने, एटीएममध्ये ठणठणाट आहे. अकोला शहरातील ५४ पैकी केवळ १० एटीएम सुरू असल्याने जनतेतून बँकांविरुद्ध ओरड सुरू झाली आहे. स्टेट बँकेचे मोजके एटीएम वगळता इतर सर्व एटीएम शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. नोव्हेंबरमध्ये नोटाबंदी झाल्यानंतर देशभरातील एटीएम बंद पडले होते. त्यानंतर अनेक दिवस ही स्थिती कायम होती. तशीच अवस्था गत काही दिवसांपासून एटीएमची झाली आहे. मोजके एटीएम सोडले, तर जिल्ह्यातील सर्व एटीएम कॅशलेस झाले आहेत. नगद रकमेसाठी अनेकांना या एटीएमवरून त्या एटीएमवर धाव घ्यावी लागत आहे. लग्नसराईचे दिवस असल्याने लोकांना विविध खर्चासाठी रोकड लागते. एटीएममध्ये रोकडचा ठणठणाट असल्याने नागरीकांची कोंडी झाली आहे. दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बँकेने नुकताच शेतकऱ्यांना २५४ कोटींचे पीक कर्ज मंजूर केले; ही रक्कम एटीएम द्वारेच काढण्याचे आदेश असल्याने शेतकऱ्यांची ससेहोलपट होत आहे. अकोला जिल्ह्यात जवळपास दोनशे एटीएम ग्राहकांना सेवा देतात. नोटाबंदीनंतर कॅशलेसला चालना देण्यासाठी जिल्ह्यात पॉस मशीनची मागणी वाढली. दोन हजार पॉस मशीन अकोल्यात आहेत, तरीही मोठ्या प्रमाणात कॅशची मागणी वाढत आहे. दररोज अकोल्यातील एटीएममध्ये पाच कोटी रुपयांची कॅश रोज भरावी लागते. या रकमेत थोडी जरी अनियमितता आली, तरी ग्राहकांकडून ओरड सुरू होते. त्याचा सर्वात जास्त परिणाम स्टेट बँकेच्या एटीएमवर पडतो. टॉवर चौकातील स्टेट बँक शहरातील सर्वात मोठी बँक असून, सर्वात जास्त ग्राहक या बँकेचे आहेत. पाच कोटींपैकी तीन कोटींची कॅश रोज स्टेट बँकेला एटीएममध्ये भरावी लागते; मात्र गत काही दिवसांपासून रिझर्व्ह बँकेने कॅश रोखल्याने एटीएमच्या बाहेर कॅश नसल्याचे फलक लागले आहेत. रिझर्व्ह बँकेकडूनच कॅश येत नसल्याने सर्वच बँकांची कोंडी झाली आहे. अनेक एटीएम तर अनेक दिवसांपासून बंद पडून आहेत. एटीएममधून रकमा निघत नसल्याने काही दिवसांत अकोल्यातील एटीएमची संख्या घटण्याचे संकेत आहेत.दैनंदिन आर्थिक व्यवहार कॅशलेस करण्यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. कॅशलेस व्यवहारास चालना देण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांची आणि शेतकऱ्यांची मानसिकता बदलली पाहिजे.पीक कर्जाची रक्कम खर्च करण्यासाठी शेतकऱ्यांनी एटीएमवर गर्दी करण्याऐवजी कृषी सेवा केंद्रावरून कॅशलेस व्यवहार करावा. नागरिकांनीदेखील डेबिट कार्डचा वापर करून व्यवहार करावेत. कॅश व्यवहार असुरक्षित आहे. जर कुणी कॅशलेसच्या व्यवहारास नकार देत असेल, तर त्यांची तक्रार जिल्हाधिकारी किंवा जिल्हा अग्रणी बँकेकडे करावी.- तुकाराम गायकवाड, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, अकोला.स्टेट बँकेच्या ३५ एटीएमवर दररोज तीन कोटींची कॅश भरावी लागते. रिझर्व्ह बँकेकडून कॅश रोखल्या गेल्याने सर्वांनाच त्रास होत आहे. कॅश व्यवहार टाळण्याचा प्रयत्न नागरिकांनी करावा. भविष्यात कॅश हाताळणे कमी होणार आहे, यासाठी जनजागृतीची जास्त गरज आहे. आता रेशन दुकानातील व्यवहारदेखील कॅशलेस होणार आहे. नागरिक आणि शेतकऱ्यांनी नवीन धोरण स्वीकारण्यासाठी मानसिक तयारी करावी, त्याशिवाय पर्याय नाही. -एस.टी. बोर्डे, मुख्य व्यवस्थापक, स्टेट बँक अकोला.