शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

खून प्रकरणात दोघांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 01:57 IST

जुन्या वितुष्टावरून वाद होऊन कुर्‍हाडीने कुटासा येथे विलास बाबुसा गावंडे यांची हत्या केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने अकोट येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांनी  १४ सप्टेंबर रोजी दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जन्मठेप झालेल्या आरोपीचे नाव पुरण बागडे व मनोज बागडे असे आहे. 

ठळक मुद्देकुटासा येथील घटना अकोट न्यायालयाचा निकाल

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : जुन्या वितुष्टावरून वाद होऊन कुर्‍हाडीने कुटासा येथे विलास बाबुसा गावंडे यांची हत्या केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने अकोट येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांनी  १४ सप्टेंबर रोजी दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जन्मठेप झालेल्या आरोपीचे नाव पुरण बागडे व मनोज बागडे असे आहे. दहीहांडा पोलीस स्टेशन अंतर्गत कुटासा येथे आरोपी सोबत मृतक विलास गावंडे यांचा जुना वाद होता. तसेच मृतकाच्या पत्नीला गाणे वाजविणे यावरुन सुध्दा वाद झाले होते. ३ नोव्हेंबर २0१५ रोजी  विलास गावंडे पहाटे शौचास जाण्याकरिता गेला होता. दरम्यान, विलास याने आरडाओरड केली, त्यामुळे त्याची पत्नी अनिता गावंडे ही धावत आली असता, तिने पतीला मनोज व पुरण हे दोघेजण कुर्‍हाडीने वार करीत असल्याचे पाहिले. त्यामुळे आरडाओरड करुन तिने शेजारच्या लोकांना उठविले. कुर्‍हाडीच्या घावाने  गंभीर जखमी झालेल्या विलासला रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी अनिता गावंडे हिच्या फिर्यादीवरुन दहीहांडा पोलिसांनी आरोपी मनोज पुरण बागडे, पुरण सखाराम बागडे, संजय पुरण बागडे, राजरत्न ऊर्फ नंदू पुरण बागडे यांच्या विरुद्ध भादंवि ३0२, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या  प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस.आर. दोनकलवार यांनी दोषारोपपत्र दाखल केले. अकोट येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांच्या समोर या हत्याकांडाची सुनावणी घेण्यात आली. त्यामध्ये १0 साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकील व आरोपींच्या वकिलांचा युक्तिवादानंतर  न्यायमूर्ती सुब्रमण्यम यांनी हत्येचा गुन्हा सिद्ध झाल्याने पुरण बागडे, मनोज बागडे यांना जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी २५ हजार रुपये दंड ठोठावला. तसेच संजय बागडे व राजरत्न बागडे यांच्या विरुद्ध आरोप सिध्द न झाल्यामुळे त्यांची निर्दोष सुटका केली. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अँड. श्याम खोटरे यांनी काम पाहिले.