शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
3
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
4
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
5
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
6
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
7
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
8
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
9
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
10
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
11
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
12
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
13
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
14
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
15
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
16
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
17
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
18
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
19
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
20
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
Daily Top 2Weekly Top 5

बोगस केळी रोपेप्रकरणी एजंटविरुद्धही गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 01:25 IST

अकोला : अकोट तालुक्यातील केळी उत्पादक शेतकर्‍यांना बोगस रोपे देऊन फसवणूक केल्याप्रकरणी नुकसानभरपाई म्हणून इंद्रायणी अँग्रोटेकचे संचालक रमेश रामचंद्र अकोटकर यांना दोषी ठरवत शेतकर्‍यांना प्रत्येकी ३0 हजार रुपये नुकसानभरपाई आणि तीन हजार रुपयांचा न्यायिक खर्च द्यावा, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने दिला.

ठळक मुद्देराज्य ग्राहक मंचात अपिल दाखल करणार!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोट तालुक्यातील केळी उत्पादक शेतकर्‍यांना बोगस रोपे देऊन फसवणूक केल्याप्रकरणी नुकसानभरपाई म्हणून इंद्रायणी अँग्रोटेकचे संचालक रमेश रामचंद्र अकोटकर यांना दोषी ठरवत शेतकर्‍यांना प्रत्येकी ३0 हजार रुपये नुकसानभरपाई आणि तीन हजार रुपयांचा न्यायिक खर्च द्यावा, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने दिला. जिल्हा ग्राहक मंचाने दिलेल्या आदेशावर शेतकर्‍यांच्यावतीने राज्य ग्राहक मंचात अपील दाखल केले जाणार असल्याची माहिती अँड. रवींद्र पोटे यांनी दिली. दरम्यान, शेतकर्‍यांनी बोगस केळी रोपेप्रकरणी अनधिकृत एजंट म्हणून आरोप केलेल्या चंद्रकांत श्रीराम पालखडेविरुद्ध अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. बोगस केळी रोपे देऊन फसवणूक झाल्याची तक्रार शेतकर्‍यांनी कृषी विभागाकडे केली होती. कृषी विभागाने याप्रकरणी चौकशी करून व पाच कृषी तज्ज्ञ सदस्यांची तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती नियुक्त केली होती. सदर समितीने प्रत्यक्ष शेतात जाऊन मोका पाहणी केली आणि शेतकर्‍यांचे ७0 टक्के केळी पिकाचे नुकसान झाले आहे, असा स्वयंस्पष्ट अहवाल दिला. सदर अहवालाची आकडेवारी केळी संशोधन केंद्र महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या शिफारशीनुसार देण्यात आली होती. त्यानुसार शेतकर्‍यांनी अकोला जिल्हा ग्राहक मंचात नुकसानभरपाईकरिता तक्रार दाखल केली होती. शेतकर्‍यांच्या तक्रारीवरून सदर प्रकरणी अकोला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाच्या त्रिसदस्यीय पीठाने मे इंद्रायणी अँग्रोटेकचे संचालक रमेश रामचंद्र अकोटकर यांना जबाबदार धरून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई म्हणून प्रत्येकी ३0 हजार रुपये द्यावेत आणि न्यायिक खर्च म्हणून प्रत्येकी तीन हजार रुपये द्यावे, असे एकूण प्रत्येकी ३३ हजार रुपये निकालाची प्रत मिळाल्यापासून १५ दिवसांपर्यंत अदा करावेत, अन्यथा तक्रारकर्त्यास दरसाल दरशेकडा आठ टक्के दराने व्याज द्यावे, असा निकाल विद्यमान मंचाने दिला आहे; परंतु सदर नुकसानभरपाई कमी प्रमाणात आहे. ग्राहक मंचात दाखल केलेल्या दाव्यानुसार नुकसानभरपाईची ही रक्कम खूपच कमी असल्याने जिल्हा ग्राहक मंचाच्या आदेशाचा सन्मान करीत राज्य ग्राहक मंचात अपील दाखल केले जाणार असल्याचे शेतकर्‍यांचे वकील अँड. रवींद्र पोटे यांनी कळविले आहे. दरम्यान, याप्रकरणी शेतकर्‍यांना बोगस केळी रोपे फसवणूक केल्याच्या आरोपाखाली कृषी विभागाने अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत शासनाच्या तक्रार निवारण समितीच्या अहवालानुसार रमेश रामचंद्र अकोटकरसह कंपनीविरुद्ध तसेच याप्रकरणी दिलीप अकोटकर यांच्याविरुद्धसुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पोलीस तपासातसुद्धा याप्रकरणी एजंट असल्याचा शेतकर्‍यांनी आरोप केलेल्या चंद्रकांत श्रीराम पालखडे रा. वणी वारुळा याच्याविरुद्धसुद्धा भादंविच्या कलम ४२0, ३४ तसेच बियाणे नियंत्रण आदेश ३, ९, १८ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची माहिती जिल्हा ग्राहक मंचाचा निकाल लागल्यानंतर समोर आली आहे.