शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

काेराेनाचा संसर्ग वाढला; शहरात ३४९ पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:19 IST

संसर्गजन्य काेराेना विषाणूमुळे सर्व उद्याेग, व्यवसाय ठप्प झाले हाेते. हातावर पाेट असणाऱ्या गरीब नागरिकांसमाेर उदरनिर्वाहाची गंभीर समस्या निर्माण झाली ...

संसर्गजन्य काेराेना विषाणूमुळे सर्व उद्याेग, व्यवसाय ठप्प झाले हाेते. हातावर पाेट असणाऱ्या गरीब नागरिकांसमाेर उदरनिर्वाहाची गंभीर समस्या निर्माण झाली हाेती. या सर्व बाबी लक्षात घेता केंद्र व राज्य शासनाने टप्प्याटप्प्याने टाळेबंदी मागे घेतली. यादरम्यान, नागरिकांनी ताेंडाला मास्क लावणे, आपसात चर्चा करताना किमान चार फूट अंतर राखणे, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले हाेते. या नियमांचा नागरिकांना विसर पडल्याचे परिणाम आता समाेर येऊ लागले आहेत. लग्न समारंभ, बाजारपेठ, एसटी बस, खासगी प्रवासी वाहतुकीदरम्यान नागरिक संपर्कात आल्यामुळे पुन्हा एकदा काेराेनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. शहराच्या कानाकाेपऱ्यांत काेराेनाचा वाढता संसर्ग ध्यानात घेता महापालिका प्रशासनाने काेराेना चाचणी केंद्रांची संख्या वाढवली आहे. साेमवारी जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडून मनपाला अहवाल प्राप्त झाला असता, शहरातील ३४९ जण काेराेना पाॅझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. यामुळे मनपाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

पूर्व, दक्षिण झाेन आघाडीवर

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून शहरात काेराेनाबाधित रुग्णांचा आकडा वाढीस लागल्याचे समाेर आले आहे. यातही काेराेनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव पूर्व व दक्षिण झाेनमध्ये असल्याचे चित्र आहे. साेमवारी पूर्व झोनमध्ये १५४, पश्चिम झोनमध्ये ४९, उत्तर झोनअंतर्गत ५९ व दक्षिण झोनअंतर्गत ८७ असे एकूण ३४९ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत.

९६५ जणांचे घेतले नमुने

काेराेनाचा संसर्ग वाढत असल्याचे पाहून नागरिक चाचणीसाठी केंद्रांवर गर्दी करीत आहेत. साेमवारी ४३४ नागरिकांनी आरटीपीसीआर चाचणी केली. तसेच ५३१ जणांनी रॅपिड ॲण्टीजेन चाचणी केली. सर्दी, ताप, खाेकला, घशात खवखव, थकवा आदी लक्षणे दिसून आल्यास रुग्णांनी थेट काेराेना चाचणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.