शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

मालवाहू व कारचा अपघात; दोन जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:23 IST

बोरगाव मंजू : अकोला ते म्हैसाग मार्गावर कट्यार बसथांब्यानजीक मालवाहू व कारची धडक झाल्याने अपघातात दोन जण ठार झाल्याची ...

बोरगाव मंजू : अकोला ते म्हैसाग मार्गावर कट्यार बसथांब्यानजीक मालवाहू व कारची धडक झाल्याने अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना शनिवार, दि. ४ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. अपघातात दोन्ही वाहनाच्या चालकांचा मृत्यू झाला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोल्याहून म्हैसागकडे सिलिंडर वाहून नेत असलेला मालवाहू क्रमांक (एमएच ३०, बीडी ०३४५) जात होता, तर दर्यापूरहून अकोल्याकडे कार क्रमांक (एमएच ३८ ५७२७) येत होती. कट्यार येथील बसथांब्यानजीक दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचा चुराडा झाला. अपघातानंतर दोन्ही वाहनांचे चालक अडकून पडले होते. या अपघातात कारचा चालक ज्ञानेश्वर रवींद्र खेळकर (२९) (रा. खामगाव) याचा मृत्यू झाला, तर कारमधील प्रवासी जागृत मोमाया, स्नेहा हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मालवाहूचा चालक अब्दुल जुबेर अब्दुल शरीफ (३२) (रा. दहीहांडा) याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील सोळंके, हेड कॉन्स्टेबल अब्दुल फईम शेख, प्रकाश कोकरे, संजय इंगळे, गिरीश वीर यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा व मृतदेहाचा पंचनामा करून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातातील जखमीवर उपचार सुरू आहेत. वृत्त लिहिस्तोवर पोलीस दफ्तरी गुन्हा दाखल केला नव्हता, पुढील तपास ठाणेदार सुनील सोळंकेसह पोलीस करीत आहेत.