शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

ओढून ताणून कविता करता येत नाही - विठ्ठल वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 14:25 IST

ओढून ताणून कविता कधीच करता येत नाही. जगत असताना अनेक अनुभव येतात. ते अनुभव कवी मनात साठवून घेतात.

- नीलिमा शिंगणे-जगडअकोला: ‘रवी ताकात फिरावी, यावे काठावर लोणी, उरी घुसळलो असा, आली ओठावर गाणी’, या ओळींनी सुरुवात करू न लोककवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी सांगितले की, ओढून ताणून कविता कधीच करता येत नाही. जगत असताना अनेक अनुभव येतात. ते अनुभव कवी मनात साठवून घेतात. अनुभवांचा पाऊस काळजाच्या मातीत मुरणं महत्त्वाचे असते. यावर नंतर कधीतरी कवितांच्या ओळी कारंज्यासारख्या उसळून येतात.लोककवी डॉ. विठ्ठल वाघ यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यात दुपारच्या सत्रात रविवारी कविसंमेलनाचे आयोजन केले होते. याप्रसंगी विठ्ठल वाघ बोलत होते. कविसंमेलनामध्ये कविताप्रेमी आणि कवींच्या आग्रहास्तव विठ्ठल वाघ यांनी आपल्या अजरामर रचना सादर केल्या. यावेळी त्यांनी आजची शिक्षण व्यवस्था आणि शिक्षक-प्राध्यापक यांना कानपिचक्या दिल्या. शिक्षक प्राध्यापकांना बोली भाषेचा अभ्यास असायला पाहिजे. कवितेमध्ये अर्थ गहन असतो. तो समजून घेतला तर कवितांचा आनंद घेता येतो, असे सोदाहरणासह वाघ यांनी सांगितले. यावेळी वाघ यांनी ‘लवंग’ ही कविता सादर केली.‘आलं दणक्यात पाणी अन् नाही त्याले आराधुरा...अशा पाण्या-पावसात पोरी नको मारू येरझारा...’ या कवितेतून गजानन मते यांनी शृंगार मांडतानाच आजच्या स्त्रियांची समाजात कशी परिस्थिती आहे, यावर प्रकाशझोत टाकला. नीलेश लोंढे यांनी ‘कविता जगवते’ ही कविता सादर करू न जाती, धर्म आणि सभोवतालचे वास्तव मांडले. ममता इंगोले यांनी आज स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारावर कवितेतून भाष्य केले. दिनकर दाभाडे यांनी राजकारणावर सडेतोड टीका ‘तुमच्याविषयी दोन शब्द’ या कवितेतून केली. विजय सोसे यांनी ‘पाऊस’ ही आशयघन कविता सादर करू न रसिकांना स्तब्ध करू न टाकले. रवींद्र महल्ले यांनी ‘उमराचं फूल’ ही अंतर्मुख करणारी रचना सादर केली. मीरा ठाकरे यांनी आपल्या गोड आवाजात अस्सल वºहाडी भाषेतील कविता सादर केली. किशोर बळी यांनी ‘ती लगबग भल्या पहाटे, ते सडासारवण नाही. देखणी इमारत आहे, किलबिलते अंगण नाही’, ही मराठी गजल सादर करू न रसिकांची वाहवाह मिळविली. संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विठ्ठल कुलट यांनी लग्नाचा आनंद आपल्या कवितेतून मांडला. याप्रसंगी शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद आणि माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्या हस्ते कवींचा सत्कार करण्यात आला. 

 

टॅग्स :Akolaअकोलाliteratureसाहित्य