शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

उमेदवारांचे मतदारांशी ‘नो अटॅचमेंट’

By admin | Updated: October 9, 2014 01:26 IST

प्रत्यक्ष भेटीऐवजी प्रचार सभांवर भर.

डॉ. किरण वाघमारे / अकोलानिवडणूक म्हटली की मतदार हा सर्वात महत्त्वाचा. मतदारांशी थेट संपर्क साधून त्यांना आपल्या बाजूने वळविण्याकडे उमेदवारांचा कल असतो; परंतु आता मतदारांशी थेट भेट घेण्याऐवजी मोठ-मोठय़ा प्रचार सभांवरच उमेदवार अधिक भर देत असल्याचे चित्र आहे. मतदारांशी अटॅचमेंट नसल्यामुळे उमेदवारांप्रति मतदारांच्या मनात फारसी आपुलकी पहावयास मिळत नाही. पूर्वी निवडणूक म्हटली की, प्रत्येक उमेदवाराचा भर रहायचा तो अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्याचा. जितक्या जास्त मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क करता येईल, तेवढी आपली बाजू मजबूत होऊ शकते, याचा उमेदवारांना विश्‍वास होता. यासाठी उमेदवार पदयात्रा काढत असत. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत ते प्रत्येक मतदारांच्या घरापर्यंत पोहचण्याचा त्यांचा प्रयत्न असे. प्रत्येक गल्ली, मोहल्ला अथवा कॉलनीमध्ये छोटेखानी सभा ठरलेलीच असे. चहा-पाणी आणि पान-सुपारीच्या कार्यक्रमासोबत उमेदवार मतदारांशी संपर्क साधत असे. घरातील प्रत्येक व्यक्तीची उमेदवार आस्थेने चौकशी करीत असे. मतदारांनादेखील उमेदवार आपल्या घरी आला की चांगले वाटत असे. उमेदवाराचे ते चांगल्याप्रकारे स्वागत करीत असत. उमेदवाराशी थेट बोलता येत असल्यामुळे मतदारांनादेखील उमेदवाराबद्दल सहानुभूती वाटत असे. याचा परिणाम अनेकवेळा मतपेटीमध्ये दिसून येत असे. आताच्या निवडणुकीत उमेदवार प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहचण्यापेक्षा मोठय़ा जाहीर सभांवरच अधिक भर देत आहेत. आपल्या पक्षाच्या मोठय़ा नेत्यांची सभा आयोजित करण्यातच या उमेदवारांमध्ये चढाओढ आहे. काही उमेदवार रॅली काढतात; परंतु ती रॅली नुसतीच रस्त्यांवरून फिरते. त्याचा मतदारांवर कितपत प्रभाव पडतो, हा संशोधनाचा विषय आहे. काही उमेदवार पदयात्रा काढतात; परंतु ते नुसतेच हात जोडून किंवा हात हलवित रस्त्यावरून धावत असतात. प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहचण्याच्या भानगडीत ते पडत नाहीत. उमदेवार आपल्या घरापर्यंत येऊन आपली दखल घेण्यास फारसा उत्सुक नाही, हे माहीत असल्यामुळे मतदारदेखील उमेदवाराप्रति फारशी सहानुभूती बाळगत नाही.आता मोबाईल, इंटरनेट आणि व्हॉटस अँपचा जमाना आहे. काही उमेदवार आणि पक्ष या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मतदारांशी संपर्क करीत आहेत. या साधनांच्या माध्यमातून मतदारांची मते कदाचित मिळविता येतील; परंतु मतदारांचे मन कसे जिंकणार? सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवार आणि मतदारांमध्ये वाढलेले अंतर प्रकर्षाने जाणवत आहे.