शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
5
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
6
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
7
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
8
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
9
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
10
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
11
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
12
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
13
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
14
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
15
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
16
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
17
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
18
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
19
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
20
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले

उमेदवारांचे मतदारांशी ‘नो अटॅचमेंट’

By admin | Updated: October 9, 2014 01:26 IST

प्रत्यक्ष भेटीऐवजी प्रचार सभांवर भर.

डॉ. किरण वाघमारे / अकोलानिवडणूक म्हटली की मतदार हा सर्वात महत्त्वाचा. मतदारांशी थेट संपर्क साधून त्यांना आपल्या बाजूने वळविण्याकडे उमेदवारांचा कल असतो; परंतु आता मतदारांशी थेट भेट घेण्याऐवजी मोठ-मोठय़ा प्रचार सभांवरच उमेदवार अधिक भर देत असल्याचे चित्र आहे. मतदारांशी अटॅचमेंट नसल्यामुळे उमेदवारांप्रति मतदारांच्या मनात फारसी आपुलकी पहावयास मिळत नाही. पूर्वी निवडणूक म्हटली की, प्रत्येक उमेदवाराचा भर रहायचा तो अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्याचा. जितक्या जास्त मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क करता येईल, तेवढी आपली बाजू मजबूत होऊ शकते, याचा उमेदवारांना विश्‍वास होता. यासाठी उमेदवार पदयात्रा काढत असत. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत ते प्रत्येक मतदारांच्या घरापर्यंत पोहचण्याचा त्यांचा प्रयत्न असे. प्रत्येक गल्ली, मोहल्ला अथवा कॉलनीमध्ये छोटेखानी सभा ठरलेलीच असे. चहा-पाणी आणि पान-सुपारीच्या कार्यक्रमासोबत उमेदवार मतदारांशी संपर्क साधत असे. घरातील प्रत्येक व्यक्तीची उमेदवार आस्थेने चौकशी करीत असे. मतदारांनादेखील उमेदवार आपल्या घरी आला की चांगले वाटत असे. उमेदवाराचे ते चांगल्याप्रकारे स्वागत करीत असत. उमेदवाराशी थेट बोलता येत असल्यामुळे मतदारांनादेखील उमेदवाराबद्दल सहानुभूती वाटत असे. याचा परिणाम अनेकवेळा मतपेटीमध्ये दिसून येत असे. आताच्या निवडणुकीत उमेदवार प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहचण्यापेक्षा मोठय़ा जाहीर सभांवरच अधिक भर देत आहेत. आपल्या पक्षाच्या मोठय़ा नेत्यांची सभा आयोजित करण्यातच या उमेदवारांमध्ये चढाओढ आहे. काही उमेदवार रॅली काढतात; परंतु ती रॅली नुसतीच रस्त्यांवरून फिरते. त्याचा मतदारांवर कितपत प्रभाव पडतो, हा संशोधनाचा विषय आहे. काही उमेदवार पदयात्रा काढतात; परंतु ते नुसतेच हात जोडून किंवा हात हलवित रस्त्यावरून धावत असतात. प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहचण्याच्या भानगडीत ते पडत नाहीत. उमदेवार आपल्या घरापर्यंत येऊन आपली दखल घेण्यास फारसा उत्सुक नाही, हे माहीत असल्यामुळे मतदारदेखील उमेदवाराप्रति फारशी सहानुभूती बाळगत नाही.आता मोबाईल, इंटरनेट आणि व्हॉटस अँपचा जमाना आहे. काही उमेदवार आणि पक्ष या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मतदारांशी संपर्क करीत आहेत. या साधनांच्या माध्यमातून मतदारांची मते कदाचित मिळविता येतील; परंतु मतदारांचे मन कसे जिंकणार? सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवार आणि मतदारांमध्ये वाढलेले अंतर प्रकर्षाने जाणवत आहे.