शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द

By admin | Updated: April 20, 2017 01:38 IST

अकोला : पातूर तालुक्यातील दिग्रस बु. येथील स्वस्त धान्य दुकानातील धान्य वाटपाबाबतच्या नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या.

अकोला : पातूर तालुक्यातील दिग्रस बु. येथील स्वस्त धान्य दुकानातील धान्य वाटपाबाबतच्या नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारीची दखल घेऊन केलेल्या चौकशीअंती जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांनी सदर दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द करण्याचा आदेश पातूरच्या तहसीलदारांना दिला आहे, तसेच सदर दुकानदाराकडून एक लाख एक हजार ९३० रुपये शिधापत्रिकाधारकांना कमी वाटप केलेल्या धान्याच्या बाजारभावातील फरकाची रक्कम वसूल करण्याचेही आदेशित केले आहे.पातूर तालुक्यातील दिग्रस बु. येथील सरकारी स्वस्त धान्य दुकानातील आॅक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर २०१६ या तीन महिन्यांत धान्य वाटप केले नसल्याची तक्रार भारिपचे तालुका सचिव जीवन उपर्वट व मंगेश इंगळे यांनी तहसीलदार यांच्याकडे दिली होती. त्यानंतर त्यांनी चौकशी करून या स्वस्त धान्य दुकानात वाटप केले नसल्याचे दिसून आले, तसेच तेथील वजन-मापेसुद्धा प्रमाणित केली नसल्याचे आढळून आले. गावातील शिधापत्रिकाधारकांनी दिलेल्या बयाणानुसार रास्त भाव दुकानदार महिन्यातून दोन ते तीन दिवसच धान्य वाटप करतात व दोन-तीन महिन्यांतून एकदाच वाटप करतात, असे नमूद केले. या तक्रारीसंदर्भात दिग्रस बु. येथील उपसरपंच भारती सुदर्शन गवई, पोलीस पाटील, गट ग्रामपंचायत दिग्रस खुर्द हिंगणा येथील सरपंच सुमेध प्रमोद इंगळे यांनीसुद्धा तहसील कार्यालयात जाऊन या प्रकारचे लेखी जबाब सादर करून कारवाई करण्याची मागणी केली होती. यानंतर गावातील सामाजिक कार्यकर्ते माणिक गवई, तोताराम गवई, सुदर्शन गवई, मंगेश इंगळे व जीवन उपर्वट यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी रास्त भाव दुकानावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आपण आत्मदहन करू, असा इशारा दिला होता. या निवेदनाची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली. गावातील शेकडो शिधापत्रिकाधारकांचे जबाब घेऊन चौकशीअंती रास्त भाव दुकानदार हे दोषी आढळले. त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांनी दिग्रस बु. येथील सदर रास्त भाव दुकानाच्या प्राधिकारपत्राची जमा असलेली १०० टक्के अनामत रक्कम शासनजमा करण्याचेही आदेशित केले. सदर रास्त भाव दुकानदाराने शिधापत्रिकाधारकांना कमी वाटप केल्याचे आढळलेल्या २१.९१ क्विंटल गहू , १५.०७ क्विंटल तांदूळ, २५ किलो ४०० ग्रॅम साखर या मालाच्या बाजारभावाने होणाऱ्या किमतीच्या फरकाची एक लाख एक हजार ९३० रुपयांची रक्कम सदर रास्त भाव दुकानदाराकडून वसूल करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे व रास्त भाव दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द करण्यात येत असल्याचा आदेश दिला आहे. तसेच दिग्रस खुर्द येथील शिधापत्रिकाधारकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सदर दुकान नजीकच्या दुकानास जोडण्याचाही आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी टाकसाळे यांनी पातूरच्या तहसीलदारांना दिला आहे.