शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

‘सीएए’ मोदींनी नाही, तर गांधींनी सर्वप्रथम मांडले - शिवराय कुळकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 14:31 IST

राष्ट्रीय सुरक्षा मंच अकोलाच्यावतीने गुरुवारी विराट हुंकार सभेचे आयोजन केले होते.

अकोला: धर्माच्या नावाखाली ज्यांना प्रताडित केले आहे, त्यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी नागरिकता संशोधन विधेयक आहे. हे विधेयक नरेंद्र मोदींनी नाही, तर अहिंसेचे पुजारी महात्मा गांधींनी दिले आहे. असे मत वक्ते शिवराय कुळकर्णी यांनी मांडले.राष्ट्रीय सुरक्षा मंच अकोलाच्यावतीने गुरुवारी विराट हुंकार सभेचे आयोजन केले होते. प्रमुख वक्ते म्हणून शिवराय कुळकर्णी सभेत बोलत होते. देशाची फाळणी झाल्यानंतर जे अल्पसंख्याक पाकिस्तानात राहतील, अशांना उद्या जर त्यांच्यावर धर्माच्या आधारावर अत्याचार होत असतील, तर भारताचे दरवाजे त्यांच्यासाठी कायम खुले करण्यात येतील, असे महात्मा गांधींनी म्हटले होते. याची आठवण कुळकर्णी यांनी करून दिली. ते म्हणाले की, पाकिस्तानातून प्रताडित होऊन आलेल्या अल्पसंख्याकांना भारतात नोकरीसह अन्य सुविधादेखील उपलब्ध करण्यात येतील, असे विचार महात्मा गांधींचे होते; पंडित नेहरू यांनीदेखील प्रधानमंत्री आकस्मिक निधीचा उपयोग पाकिस्तानातून आलेल्या अल्पसंख्याकांकरिता करायला पाहिजे. असे स्पष्ट केले होते त्यामुळे गांधी नेहरूच्या विचारांचा वारसा सांगणारेच आज फक्त नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे नाव घेऊन नागरिकता संशोधन विधेयकाला विरोधक विरोध करीत आहेत असा आरोप त्यांनी केला.१९४७ मधील फाळणी वेळी पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची संख्या २४ टक्के एवढी होती. आज मात्र १.३ टक्क्यावर आली आहे. भारतात फाळणी वेळी अल्पसंख्याक २ टक्के होते. आता ३० टक्के आहे. याबाबतचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक असल्याचे कुळकर्णी म्हणाले. जगाच्या पाठीवर मुस्लीम क ोठेच सुरक्षित नाहीत, जेवढे भारतात ते सुरक्षित आहेत. चित्रपटसृष्टीतील ‘खानावळी’लासुद्धा भारत असुरक्षित वाटत असल्याचे विधान करतात, तर प्रसंगी ‘भारत आमचे घर आहे’, असे म्हणण्यासही ही खानावळ विसरत नाहीत, असा टोला कुळकर्णी यांनी मारला. देशात एनआरसी येऊ नये, यासाठी सीएएला विरोध सुरू आहे. हा विरोध केवळ सीएएला नाही, तर हे एक षड्यंत्र आहे. देश महाशक्ती होण्याच्या वाटेवर आहे. या वाटेला अडथळा आणण्यासाठी हा विरोध सुरू असल्याचा आरोप कुळकर्णी यांनी केला. कार्यक्रमाला आमदार रणधीर सावरकर, महापौर अर्चना मसने, हरीश आलिमचंदानी, नरेंद्र देशपांडे, गोपाल खंडेलवाल, रमेश गोतमारे, डॉ. गजानन कºहे, अंबरीश पारेख, रमेश चौधरी, अनिल शिंदे, हरीश पारवानी, अ‍ॅड़ सत्यनारायण जोशी, अ‍ॅड़ मोतीसिंह मोहता, अ‍ॅड़ सुनीता कपिले, डॉ. रणजित सपकाळ, अ‍ॅड़ विजय मुरई, रामाभाऊ उंबरकर, दीपेन शाह, शैलेंद्र कागलीवाल, अशोक डालमिया, निकेश गुप्ता, अ‍ॅड. मनीषा कुळकर्णी व रमेश कोठारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विवेक बिडवई यांनी केले. संचालन स्वानंद गीताश्री यांनी केले.राष्ट्रगानाने वातावरण भारावले!‘हम करे राष्ट्र आराधन’,‘जयस्तुते-जयस्तुते’, अशा राष्ट्रभक्तीगीत गाऊन वातावरण भारावून गेले होते. आनंद जहागीरदार, कविता वरघट यांच्या सुरेल आवाजाला विवेक देशपांडे, गजानन रत्नपारखी यांची साथसंगत लाभली. महेश जोशी यांनी ‘केसरी बाणा सजाये’ हे गीत सादर केले.

टॅग्स :Akolaअकोलाcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक