शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
4
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
5
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
6
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
7
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
8
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
9
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
11
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
12
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
13
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
14
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
15
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
16
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
17
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
18
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
19
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
20
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया

‘सीएए’ मोदींनी नाही, तर गांधींनी सर्वप्रथम मांडले - शिवराय कुळकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 14:31 IST

राष्ट्रीय सुरक्षा मंच अकोलाच्यावतीने गुरुवारी विराट हुंकार सभेचे आयोजन केले होते.

अकोला: धर्माच्या नावाखाली ज्यांना प्रताडित केले आहे, त्यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी नागरिकता संशोधन विधेयक आहे. हे विधेयक नरेंद्र मोदींनी नाही, तर अहिंसेचे पुजारी महात्मा गांधींनी दिले आहे. असे मत वक्ते शिवराय कुळकर्णी यांनी मांडले.राष्ट्रीय सुरक्षा मंच अकोलाच्यावतीने गुरुवारी विराट हुंकार सभेचे आयोजन केले होते. प्रमुख वक्ते म्हणून शिवराय कुळकर्णी सभेत बोलत होते. देशाची फाळणी झाल्यानंतर जे अल्पसंख्याक पाकिस्तानात राहतील, अशांना उद्या जर त्यांच्यावर धर्माच्या आधारावर अत्याचार होत असतील, तर भारताचे दरवाजे त्यांच्यासाठी कायम खुले करण्यात येतील, असे महात्मा गांधींनी म्हटले होते. याची आठवण कुळकर्णी यांनी करून दिली. ते म्हणाले की, पाकिस्तानातून प्रताडित होऊन आलेल्या अल्पसंख्याकांना भारतात नोकरीसह अन्य सुविधादेखील उपलब्ध करण्यात येतील, असे विचार महात्मा गांधींचे होते; पंडित नेहरू यांनीदेखील प्रधानमंत्री आकस्मिक निधीचा उपयोग पाकिस्तानातून आलेल्या अल्पसंख्याकांकरिता करायला पाहिजे. असे स्पष्ट केले होते त्यामुळे गांधी नेहरूच्या विचारांचा वारसा सांगणारेच आज फक्त नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे नाव घेऊन नागरिकता संशोधन विधेयकाला विरोधक विरोध करीत आहेत असा आरोप त्यांनी केला.१९४७ मधील फाळणी वेळी पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची संख्या २४ टक्के एवढी होती. आज मात्र १.३ टक्क्यावर आली आहे. भारतात फाळणी वेळी अल्पसंख्याक २ टक्के होते. आता ३० टक्के आहे. याबाबतचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक असल्याचे कुळकर्णी म्हणाले. जगाच्या पाठीवर मुस्लीम क ोठेच सुरक्षित नाहीत, जेवढे भारतात ते सुरक्षित आहेत. चित्रपटसृष्टीतील ‘खानावळी’लासुद्धा भारत असुरक्षित वाटत असल्याचे विधान करतात, तर प्रसंगी ‘भारत आमचे घर आहे’, असे म्हणण्यासही ही खानावळ विसरत नाहीत, असा टोला कुळकर्णी यांनी मारला. देशात एनआरसी येऊ नये, यासाठी सीएएला विरोध सुरू आहे. हा विरोध केवळ सीएएला नाही, तर हे एक षड्यंत्र आहे. देश महाशक्ती होण्याच्या वाटेवर आहे. या वाटेला अडथळा आणण्यासाठी हा विरोध सुरू असल्याचा आरोप कुळकर्णी यांनी केला. कार्यक्रमाला आमदार रणधीर सावरकर, महापौर अर्चना मसने, हरीश आलिमचंदानी, नरेंद्र देशपांडे, गोपाल खंडेलवाल, रमेश गोतमारे, डॉ. गजानन कºहे, अंबरीश पारेख, रमेश चौधरी, अनिल शिंदे, हरीश पारवानी, अ‍ॅड़ सत्यनारायण जोशी, अ‍ॅड़ मोतीसिंह मोहता, अ‍ॅड़ सुनीता कपिले, डॉ. रणजित सपकाळ, अ‍ॅड़ विजय मुरई, रामाभाऊ उंबरकर, दीपेन शाह, शैलेंद्र कागलीवाल, अशोक डालमिया, निकेश गुप्ता, अ‍ॅड. मनीषा कुळकर्णी व रमेश कोठारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विवेक बिडवई यांनी केले. संचालन स्वानंद गीताश्री यांनी केले.राष्ट्रगानाने वातावरण भारावले!‘हम करे राष्ट्र आराधन’,‘जयस्तुते-जयस्तुते’, अशा राष्ट्रभक्तीगीत गाऊन वातावरण भारावून गेले होते. आनंद जहागीरदार, कविता वरघट यांच्या सुरेल आवाजाला विवेक देशपांडे, गजानन रत्नपारखी यांची साथसंगत लाभली. महेश जोशी यांनी ‘केसरी बाणा सजाये’ हे गीत सादर केले.

टॅग्स :Akolaअकोलाcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक