शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
5
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
6
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
7
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
8
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
9
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
10
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
11
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
12
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
13
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
14
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
15
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
16
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
17
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
18
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
19
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
20
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी

मूर्तिजापूर आगारात बस, कर्मचार्‍यांची वानवा

By admin | Updated: May 20, 2014 19:24 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला विभागांतर्गत मूर्तिजापूर आगारात बस गाड्या आणि कर्मचार्‍यांची वानवा असल्यामुळे आगाराच्या उत्पन्नात घट

मूर्तिजापूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला विभागांतर्गत मूर्तिजापूर आगारात बस गाड्या आणि कर्मचार्‍यांची वानवा असल्यामुळे आगाराच्या उत्पन्नात घट होत असून, प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे. मूर्तिजापूर आगाराची स्थापना साधारण ११ वर्षांपूर्वी झाली होती. या आगाराचे लोकार्पण ५ मे २०१३ रोजी झाले. तेव्हापासून या आगाराचे उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक सामाजिक संघटनांनी प्रयत्न केले; परंतु आजपर्यंत त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले नाही. मोजक्याच संख्येतील चालक, वाहक आणि बस गाड्यांच्या भरवशावर आगाराचे काम सुरू आहे. मूर्तिजापूर शहराला रेल्वे जंक्शनचा दर्जा प्राप्त झाला असून, मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ हासुद्धा या शहरातून जातो; परंतु त्याचा काहीच फायदा या आगाराला होत असल्याचे दिसत नाही. येथे आगार व्यवस्थापक म्हणून काम केलेल्या अनेकांनी या आगाराचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध प्रयत्न केले; परंतु बस गाड्या आणि चालक-वाहकांच्या अपुर्‍या संख्येमुळे त्यांचे प्रयत्नही फलद्रूप झाले नाहीत. मूर्तिजापूर आगारातून लोणार, पांढरकवडा, नागपूर, औरंगाबाद, शिर्डी, नाशिक , पुणे, हिंगोली, नांदेड, परभणी, रामटेक, निजामाबाद, औंढा नागनाथ, माहूर, धुळे, इंदूर आदी ठिकाणांसाठी लांब पल्ल्याच्या बस गाड्या सुरू करणे आवश्यक झाले आहे; मात्र यासाठी राज्य परिवहन महामंडळाचे सहकार्यही तेवढेच गरजेचे आहे. वरील लांब पल्ल्याच्या बसगाड्या सुरू केल्यास मूर्तिजापूर आगाराचे उत्पन्न निश्चितच वाढू शकते. त्यामुळे अमरावती प्रादेशिक व्यवस्थापक आणि विभाग नियंत्रक अकोला यांनी काळजीपूर्वक विचार करून मूर्तिजापूर आगाराला चालक-वाहकांसह पुरेशा प्रमाणात नवीन बसगाड्या उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी जनतेकडून करण्यात येत आहे.