शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

गव्हाच्या काड्या पेटविणे ठरू शकते धोकादायक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:17 IST

वणवा पेटण्याची शक्यता: कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची गरज लोकमत न्यूज नेटवर्क संतोषकुमार गवई पातूर : गव्हाची काढणी केल्यानंतर शिल्लक राहिलेल्या ...

वणवा पेटण्याची शक्यता: कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क

संतोषकुमार गवई

पातूर : गव्हाची काढणी केल्यानंतर शिल्लक राहिलेल्या काड्या शेतकरी पेटवून देतात. अशा प्रकारे गव्हाचे शेत पेटविणे धोकादायक ठरू शकते. एखाद्या वेळी जंगलात वणवा पेटण्याची शक्यता असते. त्यामुळे गव्हाच्या काड्यांची विल्हेवाट कशी लावावी, याबाबत शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकरी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात गहू पिकाची लागवड करतात. यावर्षी परतीचा पाऊस चांगला झाल्याने सिंचनाची उत्तम व्यवस्था होती. यामुळे गव्हाच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली. सध्या बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतातील गव्हाची काढणी झाली आहे. यामुळे काढणीनंतर शिल्लक राहिलेल्या काड्या शेतकऱ्यांकडून पेटवून देण्यात येतात. या काड्यांमध्ये सिलीकॉन, नत्र, स्फुरद, पालाश हे जमिनीसाठी लाभदायी असलेले घटक असतात. यामुळे जमिनीचा पोत सुधारून शेतीची उत्पादकता वाढण्यास मदत होते.

मात्र याबाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून योग्य ते मार्गदर्शन करण्यात येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडून या काड्या जाळण्यात येत असल्याने शेतजमिनीचा दर्जा खालावतो. त्यामुळे उत्पादकतेवर परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांनी गव्हाच्या काड्या न जाळता त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. काड्या न जाळता तशीच नांगरणी केल्यास काड्या सडून त्यामध्ये असलेले खताचे घटक जमिनीत मिसळून जमिनीचे पोषण होईल. या पद्धतीचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांना याचा सकारात्मक परिणाम यानंतरच्या पिकाच्या उत्पादनातून दिसून येईल, यात शंका नाही.

----------------------------------

तालुक्यात आगीच्या घटना वाढल्या!

तालुक्यात जंगलातील आगीच्या घटना वाढल्या आहेत. गत महिनाभरात तीन ते चार आगीच्या घटना घडल्या आहेत. गव्हाच्या कांड्या पेटविल्याने आग वाढल्यास जंगलात वणवा पेटू शकतो. त्यामुळे कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे.

-------------------------------------

काड्यांमधील घटकांमुळे सुधारतो पोत

गव्हाची काढणी झाल्यानंतर गव्हाच्या काड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी ‘एस-९ कल्चर’ची फवारणी करावी. यामुळे गव्हाच्या काड्या लवकर कुजून त्यातील महत्त्वपूर्ण घटक जमिनीला मिळण्यास मदत होते. यामुळे शेतकऱ्यांनी या पद्धतीचा अवलंब केल्यास जमिनीचा पोत निश्चितपणे सुधारेल.

----------------------------

कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना सातत्याने मार्गदर्शन करण्यात येते. कृषी साहाय्यकांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. गव्हाच्या काड्या न जाळता त्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्यास सांगण्यात येते.

- धनंजय शेटे, तालुका कृषी अधिकारी, पातूर.