शहरं
Join us  
Trending Stories
1
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
2
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
3
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
4
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
5
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
6
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
7
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
8
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
9
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
10
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
11
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
12
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
13
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
14
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
15
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
16
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
17
'लग्न टिकवायचं असेल तर स्त्रीने नेहमीच..." शर्मिला टागोर यांनी लेक सोहाला दिला होता 'हा' सल्ला
18
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
19
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
20
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!

गव्हाच्या काड्या पेटविणे ठरू शकते धोकादायक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:17 IST

वणवा पेटण्याची शक्यता: कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची गरज लोकमत न्यूज नेटवर्क संतोषकुमार गवई पातूर : गव्हाची काढणी केल्यानंतर शिल्लक राहिलेल्या ...

वणवा पेटण्याची शक्यता: कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क

संतोषकुमार गवई

पातूर : गव्हाची काढणी केल्यानंतर शिल्लक राहिलेल्या काड्या शेतकरी पेटवून देतात. अशा प्रकारे गव्हाचे शेत पेटविणे धोकादायक ठरू शकते. एखाद्या वेळी जंगलात वणवा पेटण्याची शक्यता असते. त्यामुळे गव्हाच्या काड्यांची विल्हेवाट कशी लावावी, याबाबत शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकरी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात गहू पिकाची लागवड करतात. यावर्षी परतीचा पाऊस चांगला झाल्याने सिंचनाची उत्तम व्यवस्था होती. यामुळे गव्हाच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली. सध्या बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतातील गव्हाची काढणी झाली आहे. यामुळे काढणीनंतर शिल्लक राहिलेल्या काड्या शेतकऱ्यांकडून पेटवून देण्यात येतात. या काड्यांमध्ये सिलीकॉन, नत्र, स्फुरद, पालाश हे जमिनीसाठी लाभदायी असलेले घटक असतात. यामुळे जमिनीचा पोत सुधारून शेतीची उत्पादकता वाढण्यास मदत होते.

मात्र याबाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून योग्य ते मार्गदर्शन करण्यात येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडून या काड्या जाळण्यात येत असल्याने शेतजमिनीचा दर्जा खालावतो. त्यामुळे उत्पादकतेवर परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांनी गव्हाच्या काड्या न जाळता त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. काड्या न जाळता तशीच नांगरणी केल्यास काड्या सडून त्यामध्ये असलेले खताचे घटक जमिनीत मिसळून जमिनीचे पोषण होईल. या पद्धतीचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांना याचा सकारात्मक परिणाम यानंतरच्या पिकाच्या उत्पादनातून दिसून येईल, यात शंका नाही.

----------------------------------

तालुक्यात आगीच्या घटना वाढल्या!

तालुक्यात जंगलातील आगीच्या घटना वाढल्या आहेत. गत महिनाभरात तीन ते चार आगीच्या घटना घडल्या आहेत. गव्हाच्या कांड्या पेटविल्याने आग वाढल्यास जंगलात वणवा पेटू शकतो. त्यामुळे कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे.

-------------------------------------

काड्यांमधील घटकांमुळे सुधारतो पोत

गव्हाची काढणी झाल्यानंतर गव्हाच्या काड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी ‘एस-९ कल्चर’ची फवारणी करावी. यामुळे गव्हाच्या काड्या लवकर कुजून त्यातील महत्त्वपूर्ण घटक जमिनीला मिळण्यास मदत होते. यामुळे शेतकऱ्यांनी या पद्धतीचा अवलंब केल्यास जमिनीचा पोत निश्चितपणे सुधारेल.

----------------------------

कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना सातत्याने मार्गदर्शन करण्यात येते. कृषी साहाय्यकांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. गव्हाच्या काड्या न जाळता त्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्यास सांगण्यात येते.

- धनंजय शेटे, तालुका कृषी अधिकारी, पातूर.