शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ सर्वेक्षण’चा बोजवारा; 'क्यूसीआय'ची विश्वासहर्ता धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:19 IST

शहरांकडे नागरिकांचा वाढता ओढा, औद्याेगिकरण आदी बाबींमुळे शहरांमधील मूलभूत साेयी सुविधांवर ताण निर्माण झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने लाेकसंख्येच्या तुलनेत ...

शहरांकडे नागरिकांचा वाढता ओढा, औद्याेगिकरण आदी बाबींमुळे शहरांमधील मूलभूत साेयी सुविधांवर ताण निर्माण झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने लाेकसंख्येच्या तुलनेत स्वच्छतागृहांची अपुरी संख्या असल्यामुळे नागरिकांना नाईलाजाने उघड्यावर शाैचास जावे लागत आहे. यामुळे पावसाळ्यात विविध प्रकारची राेगराइ पसरून नागरिकांचे आराेग्य धाेक्यात येत असल्याची बाब समाेर आली आहे. अर्थात आराेग्य जपण्याच्या उद्देशातून सर्वप्रथम नागरिकांना वैयक्तिक शाैचालय बांधून देण्याचे उद्दिष्ट समाेर ठेवत केंद्र शासनाने ‘स्वच्छ भारत’अभियानला प्रारंभ केला. २०१६ मध्ये देशभरातील शहरांना हगणदरीमुक्तीसाठी प्राेत्साहित करण्याच्या उद्देशातून ‘स्वच्छ सर्वेक्षण’माेहिमेला सुरूवात करण्यात आली. शहरांमध्ये निकाेप स्पर्धा व्हावी,यासाठी केंद्र शासनाच्या 'क्यूसीआय'ने शहरांमध्ये जाउन प्रत्यक्ष पाहणी व सर्वेक्षणाची प्रक्रिया राबवली. २०१७ मध्ये राज्यातील अनेक शहरांना हगणदरीमुक्त केल्यानंतर शहरांमधील स्वच्छतेची समस्या निकाली निघणे अपेक्षित हाेते. पंरतु तसे न झाल्यामुळे ‘स्वच्छ भारत’अभियानला तडा गेल्याचे चित्र दिसून येत आहे.

निकषांची पूर्तता नाही तरीही...

शहरांना हगणदरीमुक्त करणे, कचरामुक्त करणे, नागरिकांच्या सहभागास उत्तेजन देणे, कचरामुक्त आणि शौचमुक्त शहरांमध्ये दैनंदिन स्वच्छता कायम ठेवणे, ती असल्यास रेटींग देणे,नागरिकांमध्ये जनजागृती करून स्पर्धा निर्माण करणे आदी ‘स्वच्छ सर्वेक्षण’चे निकष आहेत. सर्वेक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या 'क्यूसीआय'ने आजवर दिलेले अहवाल पाहता व प्रत्यक्षात शहरांमध्ये असलेली घाण,अस्वच्छता लक्षात घेता 'क्यूसीआय' च्या पारदर्शी कामकाजावर प्रश्नचिन्हं निर्माण झाले आहेत.