शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ सर्वेक्षण’चा बोजवारा; 'क्यूसीआय'ची विश्वासहर्ता धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:19 IST

शहरांकडे नागरिकांचा वाढता ओढा, औद्याेगिकरण आदी बाबींमुळे शहरांमधील मूलभूत साेयी सुविधांवर ताण निर्माण झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने लाेकसंख्येच्या तुलनेत ...

शहरांकडे नागरिकांचा वाढता ओढा, औद्याेगिकरण आदी बाबींमुळे शहरांमधील मूलभूत साेयी सुविधांवर ताण निर्माण झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने लाेकसंख्येच्या तुलनेत स्वच्छतागृहांची अपुरी संख्या असल्यामुळे नागरिकांना नाईलाजाने उघड्यावर शाैचास जावे लागत आहे. यामुळे पावसाळ्यात विविध प्रकारची राेगराइ पसरून नागरिकांचे आराेग्य धाेक्यात येत असल्याची बाब समाेर आली आहे. अर्थात आराेग्य जपण्याच्या उद्देशातून सर्वप्रथम नागरिकांना वैयक्तिक शाैचालय बांधून देण्याचे उद्दिष्ट समाेर ठेवत केंद्र शासनाने ‘स्वच्छ भारत’अभियानला प्रारंभ केला. २०१६ मध्ये देशभरातील शहरांना हगणदरीमुक्तीसाठी प्राेत्साहित करण्याच्या उद्देशातून ‘स्वच्छ सर्वेक्षण’माेहिमेला सुरूवात करण्यात आली. शहरांमध्ये निकाेप स्पर्धा व्हावी,यासाठी केंद्र शासनाच्या 'क्यूसीआय'ने शहरांमध्ये जाउन प्रत्यक्ष पाहणी व सर्वेक्षणाची प्रक्रिया राबवली. २०१७ मध्ये राज्यातील अनेक शहरांना हगणदरीमुक्त केल्यानंतर शहरांमधील स्वच्छतेची समस्या निकाली निघणे अपेक्षित हाेते. पंरतु तसे न झाल्यामुळे ‘स्वच्छ भारत’अभियानला तडा गेल्याचे चित्र दिसून येत आहे.

निकषांची पूर्तता नाही तरीही...

शहरांना हगणदरीमुक्त करणे, कचरामुक्त करणे, नागरिकांच्या सहभागास उत्तेजन देणे, कचरामुक्त आणि शौचमुक्त शहरांमध्ये दैनंदिन स्वच्छता कायम ठेवणे, ती असल्यास रेटींग देणे,नागरिकांमध्ये जनजागृती करून स्पर्धा निर्माण करणे आदी ‘स्वच्छ सर्वेक्षण’चे निकष आहेत. सर्वेक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या 'क्यूसीआय'ने आजवर दिलेले अहवाल पाहता व प्रत्यक्षात शहरांमध्ये असलेली घाण,अस्वच्छता लक्षात घेता 'क्यूसीआय' च्या पारदर्शी कामकाजावर प्रश्नचिन्हं निर्माण झाले आहेत.