शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

भारनियमनाने घेतला चिमुकलीचा जीव

By admin | Updated: May 27, 2014 20:30 IST

भारनियमनामुळे चार वर्षीय चिमुलीला आपले प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना उरळ येथे घडली आहे.

उरळ: भारनियमनामुळे चार वर्षीय चिमुलीला आपले प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना उरळ येथे घडली आहे. सलोनी विनोद वानखडे असे या चार वर्षीय चिमुकलीचे नाव आहे. उरळ येथे कारंजा रमजानपूर उपकेंद्रातून विद्युत पुरवठा होतो. येथे दररोज आठ तास भारनियमन असते. दि.२४ मे २०१४ रोजी रात्री ८ वाजता गावात अंधार असल्यामुळे विनोद वानखडे यांच्या घरात पाटलीवर दिवा लावून ठेवण्यात आला होता. यावेळेस त्यांची चार वर्षीय मुलगी सलोनी विनोद वानखडे ही जेवण करीत होती. वानखडे यांचे घर कुडाचे असल्यामुळे हवा घरात सहज शिरते. हवा घरात शिरल्यामुळेच घरात लावण्यात आलेला दिवा सलोनीच्या अंगावर पडला व ती भाजली. तिला उपचारासाठी अकोला येथे दाखल करण्यात आले. तेथून तिला नागपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले; परंतु उपचारादरम्यान २६ मे रोजी सलोनीचा मृत्यू झाला. चिमुकल्या सलोनीच्या निधनामुळे उरळ गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, वीज वितरणकडून करण्यात येत असलेले रात्रीचे भारनियमनच तिच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.