शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

खरीप हंगामाच्या तोंडावर बैल बाजार बंद; शेतकरी हैराण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:29 IST

रवी दामोदर अकोलाः खरीप हंगाम तोंडावर आला असून, मशागतीच्या कामांना वेग आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे गुरांचे बाजार बंद ...

रवी दामोदर

अकोलाः खरीप हंगाम तोंडावर आला असून, मशागतीच्या कामांना वेग आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे गुरांचे बाजार बंद असल्याने शेतकऱ्याच्या ‘सर्जा-राजा’ची खरेदी-विक्री बंद आहे. परिणामी बैलाद्वारे केली जाणारी मशागतीची कामे अडचणीत आली आहेत. तसेच लॉकडाऊनमुळे बैलांचे भाव दुपटीने वाढल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

खरीप हंगाम तोंडावर आला असून, शेतात मशागतीची कामे सुरू आहेत. सद्यस्थितीत ट्रॅक्टरद्वारे नांगरणीच्या कामांना वेग आला आहे. दरम्यान, वाढत्या महागाईमुळे शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करण्यावर भर देत असल्याचे दिसून येत आहे. डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टर मालकांनी मशागतीचे दर वाढविले आहेत. त्यामुळे शेतकरी बैलांच्या साहाय्याने मशागतीची कामे करीत असल्याचे चित्र आहे. एप्रिल व मे महिन्यात बैल जोड्या खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैल बाजार बंद असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. मशागतीसाठी बैलांची आवश्‍यकता असल्याने काही शेतकरी बाजार बंद असल्याने वैयक्तिक स्तरावर बैलांचा शोध घेत आहेत. त्यामुळे बैलांचे दरही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे खरीप हंगामाची कामे लक्षात घेत बैल बाजार सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

---------------------------------------------

एप्रिल-मे महिन्यात बैल जोड्यांच्या खरेदी-विक्रीला येतो वेग !

खरीप हंगामात साधारणत: जून, जुलै महिन्यात पेरणी केल्या जाते. त्यापूर्वी मशागतीची कामे पूर्ण करणे गरजेचे असते. त्या अनुषंगाने एप्रिल-मे महिन्यात बैल जोड्यांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरेदी-विक्री बंद असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. बाजार बंद असल्याचा फायदा घेत काही व्यापाऱ्यांनी बैलांचे दर वाढविल्याचे चित्र आहे. गतवर्षी ५० हजार रुपयात मिळणारी जोडी यंदा ६० ते ७० हजार रुपयांत मिळत असल्याचे चित्र आहे.

---------------------------------------------

गुरांच्या बाजारावर अवलंबून असणारे व्यावसायिक अडचणीत

बाजार बंद असल्याने बैल जोड्यांचे दर वाढले आहेत. तसेच चांगले व जातीवंत बैल मिळणे कठीण झाले आहे. खरीप हंगाम तोंडावर असल्याने बैलाच्या शोधात शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे. तसेच गुरांच्या बाजारावर अवलंबून असणारे व्यावसायिकही अडचणीत सापडले असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

-------------------------------------

मशागतीसाठी बैलजोडीची गरज आहे. ट्रॅक्टर मालकांनी मशागतीचे दर वाढविल्याने बैलांद्वारे मशागत परवडणारी आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन बैल बाजार सुरू करण्याची गरज आहे.

-धीरज सिरसाट, शेतकरी, सांगळूद.