शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

बांधकाम व्यवसाय येतोय रुळावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 01:52 IST

अकोला : तीन वर्षांपासून ठप्प पडलेला अकोल्यातील बांधकाम व्यवसाय पूर्ववत रुळावर येत आहे. कृत्रिम दरवाढीमुळे अकोल्यातील पाचशे बिल्डर्स मंडळी बँक आणि खासगी कर्जाच्या चक्रात अडकली होती; मात्र सणासुदीच्या निमित्ताने बाजारपेठेत पुन्हा उभारी येत असून, बांधकाम व्यवसाय तेजीत येत आहे.

ठळक मुद्देदलालांच्या कृत्रिम दरवाढीतून सुटका अकोल्यात ३८00 फ्लॅट तयार!

संजय खांडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : तीन वर्षांपासून ठप्प पडलेला अकोल्यातील बांधकाम व्यवसाय पूर्ववत रुळावर येत आहे. कृत्रिम दरवाढीमुळे अकोल्यातील पाचशे बिल्डर्स मंडळी बँक आणि खासगी कर्जाच्या चक्रात अडकली होती; मात्र सणासुदीच्या निमित्ताने बाजारपेठेत पुन्हा उभारी येत असून, बांधकाम व्यवसाय तेजीत येत आहे.ब्रोकर आणि बिल्डसर्ंकडून  झालेली दरवाढ अंगलट आल्याने बांधकाम व्यवसाय ठप्प पडला होता. महापालिकेने लावलेला कारवाईचा अंकुश आणि जीएसटीमुळे बिल्डरांसह बांधकाम व्यावसायिकांवर अवकळा आली होती;  मात्र सणासुदीच्या निमित्ताने बाजारात नवचैतन्य आले असून, फ्लॅट खरेदीसाठी अकोलेकर पुन्हा सरसावू लागले आहेत. मागणी वाढल्याने कर्जात सापडलेले बिल्डर्संना दिलासा मिळाला आहे. काही जुने आणि नवीन मिळून जवळपास ३८00 फ्लॅट ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत.  १९८0 च्या डीसीआरनुसारच अकोल्यात बांधकाम व्यावसायिकांचे कामकाज सुरू होते. महापालिका झाली; पण बांधकाम विकास नियंत्रण नियमावलीचा पत्ता नव्हता. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी तत्कालीन मनपा आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी शहरातील १८६ इमारतींना नोटीस बजावून, अवैध बांधकाम थांबविले. तेव्हापासून या इमारतींचे बांधकाम रखडले असून, नवीन बांधकामाला मनपाकडून परवानगी नाकारली जात होती. त्यामुळे अकोल्यातील बांधकाम व्यवसाय ठप्प पडला. दरम्यान, क्रेडाईच्या पुढाकारानंतर ‘ड’ वर्गीय महापालिकांना एक ‘एफएसआय’ वाढवून देण्यात आला. दरम्यान, नवीन ‘ऑटो डीसीआर’च्या मंजुरीनंतर आणि १ एप्रिल १७ पासूनच्या नवीन ‘रेडिरेकनर’च्या बाजार मूल्यभावाने अकोल्यातील फ्लॅटच्या किमती अधिक वाढल्या. अवैध बांधकामाची धास्ती आणि पूर्वीपेक्षाही घर महागणार असल्याने बांधकाम व्यावसायिक चिंतातूर झाले होते; मात्र दलालांनी   फुगविलेली कृत्रिम दरवाढ आता थांबल्याने ग्राहक आणि बिल्डर्स सावरले आहेत.  

अकोल्यातील बिल्डर्संची स्थिती राज्यातील उद्ध्वस्त शेतकर्‍यांसारखी झाली होती . नोटाबंदी, रेरा कायद्याच्या अंमलबजावणीनंतर मोठा परिणाम दिसून आला; मात्र आता पुन्हा बाजारपेठेत चांगली स्थिती निर्माण होत आहे. -दिलीप चौधरी, अकोला जिल्हाध्यक्ष, क्रेडाई.-