शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

जिल्ह्यातील ९०० वस्त्यांमध्ये कामांची मागविली अंदाजपत्रके!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:12 IST

अकोला: अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींचा विकास ( दलित वस्ती) योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३५० गावांत ९०० वस्त्यांमध्ये विकासकामे करण्यासाठी ...

अकोला: अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींचा विकास ( दलित वस्ती) योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३५० गावांत ९०० वस्त्यांमध्ये विकासकामे करण्यासाठी मंजूर ५० कोटी रुपयांच्या निधीपैकी २५ कोटी रुपयांचा निधी २४ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला प्राप्त झाला आहे. त्यानुषंगाने ९०० वस्त्यांमध्ये कामांची अंदाजपत्रके जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून (बीडीओ) मागविण्यात आली आहेत.

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींचा विकास करणे ( दलित वस्ती) योजनेंतर्गत चालू् आर्थिक वर्षात जिल्ह्यातील ३५० गावांमध्ये ९०० वस्त्यांमध्ये सामाजिक सभागृह, रस्ते, नाल्या, गटारे, पाणीपुरवठा आदी विकासकामे करण्यासाठी शासनामार्फत ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुषंगाने योजनेंतर्गत जिल्हयातील ९०० वस्त्यांमध्ये विकासकामांचे नियोजन जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत करण्यात आले असून, या कामांसाठी मंजूर निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार योजनेंतर्गत कामांसाठी २५ कोटी रुपयांचा निधी २४ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला प्राप्त झाला. त्यानुषंगाने जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून दलित वस्तीच्या कामांची अंदाजपत्रके मागविण्यात आली आहेत. मंगळवार,३० मार्चपर्यंत दलित वस्तीच्या कामांची अंदाजपत्रके सादर करण्याचे निर्देश पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे ( दलित वस्ती) योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३५० गावांमधील ९०० वस्त्यांमध्ये विकासकामे करण्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर असून, त्यापैकी आतापर्यंत २५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. मंजूर निधीतून विकासकामे करण्यासाठी जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून कामांची अंदाजपत्रके मागविण्यात आली आहेत.

आकाश शिरसाट

सभापती, समाजकल्याण, जिल्हा परिषद.

मागणी ५० कोटींची

मिळाले २५ कोटी!

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींचा विकास करणे ( दलित वस्ती) योजनेंतर्गत जिल्ह्यातील ९०० वस्त्यांमध्ये विकासकामे करण्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. त्यानुषंगाने ५० कोटी रुपयांच्या निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला; मात्र मागणीच्या तुलनेत २५ कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला प्राप्त झाला असून, उर्वरित २५ कोटी रुपयांच्या निधीची प्रतीक्षा केली जात आहे.