शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

बीटी बियाणे तपासणीचा अहवाल गुलदस्त्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 13:37 IST

कंपन्यांच्या सदोष बियाण्यांची विक्री होईपर्यंत तपासणी अहवाल न येणे, आल्यास त्यानुसार कारवाई न करण्याचा प्रयत्न कृषी विभागाच्या यंत्रणेकडून सुरू आहे.

ठळक मुद्देप्रयोगशाळेचा तपासणी अहवाल दाबून ठेवून कंपन्यांचे हित साधण्यात अधिकाºयांचा सहभाग असल्याचे गेल्या काही दिवसात स्पष्ट होत आहे.अमरावती विभागासह अकोला जिल्ह्यातील कृषी विभागाची यंत्रणा माहिती देण्यास तयारच नसल्याचे दिसत आहे.

अकोला : बीटी बियाणे नमुन्याचे तपासणी अहवाल पेरणीपूर्वीच कृषी विभागाकडे येणे शेतकºयांसाठी आवश्यक आहे. त्यानुसार सदोष साठ्याला विक्रीबंद आदेश देऊन ते बियाणे शेतकºयांच्या माथी मारण्यास प्रतिबंध होऊ शकतो; मात्र त्याऐवजी कंपन्यांच्या सदोष बियाण्यांची विक्री होईपर्यंत तपासणी अहवाल न येणे, आल्यास त्यानुसार कारवाई न करण्याचा प्रयत्न कृषी विभागाच्या यंत्रणेकडून सुरू आहे. विशेष म्हणजे, प्रयोगशाळेचा तपासणी अहवाल दाबून ठेवून कंपन्यांचे हित साधण्यात अधिकाºयांचा सहभाग असल्याचे गेल्या काही दिवसात स्पष्ट होत आहे. अमरावती विभागासह अकोला जिल्ह्यातील कृषी विभागाची यंत्रणा माहिती देण्यास तयारच नसल्याचे दिसत आहे.गेल्यावर्षी बीटी कापूस पिकाला गुलाबी बोंडअळीने पोखरले. त्यातून शेतकºयांचे ९० टक्क्यांपेक्षाही अधिक नुकसान झाले. त्याचा फटका बसलेल्या शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या. गुलाबी बोंडअळीने कापूस पीक फस्त केल्याच्या जिल्ह्यातील १९३२४ शेतकºयांनी तक्रारी केल्या होत्या. त्यामध्ये २९१०३ हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले. त्याची धास्ती घेत शासनाने बोंडअळीला रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे कृषी विभागाला बजावले. त्याचा एक भाग म्हणून चालू वर्षात गुलाबी बोंडअळीचा हल्ला रोखण्यासाठी कृषी विभागाने बियाणे नमुने तपासणीची धडक मोहीम सुरू केली. अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील गुणवत्ता नियंत्रक, विभागीय गुणवत्ता नियंत्रक, जिल्हा परिषदेतील कृषी विभागाच्या अधिकाºयांच्या पथकाने बियाण्यांचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले.

एप्रिल, मे पासून घेतले नमुनेकृषी विभागाने कापूस बियाण्यांच्या साठ्यातील नमुने एप्रिल, मे, जूनच्या सुुरुवातीला घेतले. त्या नमुन्यांचे अहवाल बाजारात बियाण्यांची विक्री होण्यापूर्वी यंत्रणेकडे येणे आवश्यक आहे, तसेच झाल्यास सदोष बियाणे साठ्याची विक्री बंद करणे शक्य आहे; मात्र अकोला जिल्ह्यात तपासणी करून आलेल्या नमुन्यांचा साठा आधीच विक्री झाला. आता त्यावर बोंडअळी आल्यास कारवाई कोणावर करणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

आठवडाभरापासून टाळाटाळ!अमरावती विभाग, अकोला जिल्ह्यातील बियाण्यांच्या तपासणीचे अहवाल संबंधित गुणवत्ता नियंत्रकांना गेल्या आठवड्यापासून मागवले; मात्र दोन्ही कार्यालयातील संबंधितांनी तपासणीची माहिती देण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. या प्रकाराने शासकीय यंत्रणा शेतकºयांच्या हितासाठी की कंपन्यांच्या, हा गंभीर मुद्दा पुढे येत आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती