शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
2
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
3
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
4
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
5
Stock Market: ३ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २४५ अंकांनी वधारला; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
6
टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! स्टार क्रिकेटर म्हणाला, 'ही' आमच्यासाठी विन-विन सिच्युएशन ठरेल!
7
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
8
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
9
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
10
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
11
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
12
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
13
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
14
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
15
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
16
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
17
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
18
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
19
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
20
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बीटी बियाणे तपासणीचा अहवाल गुलदस्त्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 13:37 IST

कंपन्यांच्या सदोष बियाण्यांची विक्री होईपर्यंत तपासणी अहवाल न येणे, आल्यास त्यानुसार कारवाई न करण्याचा प्रयत्न कृषी विभागाच्या यंत्रणेकडून सुरू आहे.

ठळक मुद्देप्रयोगशाळेचा तपासणी अहवाल दाबून ठेवून कंपन्यांचे हित साधण्यात अधिकाºयांचा सहभाग असल्याचे गेल्या काही दिवसात स्पष्ट होत आहे.अमरावती विभागासह अकोला जिल्ह्यातील कृषी विभागाची यंत्रणा माहिती देण्यास तयारच नसल्याचे दिसत आहे.

अकोला : बीटी बियाणे नमुन्याचे तपासणी अहवाल पेरणीपूर्वीच कृषी विभागाकडे येणे शेतकºयांसाठी आवश्यक आहे. त्यानुसार सदोष साठ्याला विक्रीबंद आदेश देऊन ते बियाणे शेतकºयांच्या माथी मारण्यास प्रतिबंध होऊ शकतो; मात्र त्याऐवजी कंपन्यांच्या सदोष बियाण्यांची विक्री होईपर्यंत तपासणी अहवाल न येणे, आल्यास त्यानुसार कारवाई न करण्याचा प्रयत्न कृषी विभागाच्या यंत्रणेकडून सुरू आहे. विशेष म्हणजे, प्रयोगशाळेचा तपासणी अहवाल दाबून ठेवून कंपन्यांचे हित साधण्यात अधिकाºयांचा सहभाग असल्याचे गेल्या काही दिवसात स्पष्ट होत आहे. अमरावती विभागासह अकोला जिल्ह्यातील कृषी विभागाची यंत्रणा माहिती देण्यास तयारच नसल्याचे दिसत आहे.गेल्यावर्षी बीटी कापूस पिकाला गुलाबी बोंडअळीने पोखरले. त्यातून शेतकºयांचे ९० टक्क्यांपेक्षाही अधिक नुकसान झाले. त्याचा फटका बसलेल्या शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या. गुलाबी बोंडअळीने कापूस पीक फस्त केल्याच्या जिल्ह्यातील १९३२४ शेतकºयांनी तक्रारी केल्या होत्या. त्यामध्ये २९१०३ हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले. त्याची धास्ती घेत शासनाने बोंडअळीला रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे कृषी विभागाला बजावले. त्याचा एक भाग म्हणून चालू वर्षात गुलाबी बोंडअळीचा हल्ला रोखण्यासाठी कृषी विभागाने बियाणे नमुने तपासणीची धडक मोहीम सुरू केली. अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील गुणवत्ता नियंत्रक, विभागीय गुणवत्ता नियंत्रक, जिल्हा परिषदेतील कृषी विभागाच्या अधिकाºयांच्या पथकाने बियाण्यांचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले.

एप्रिल, मे पासून घेतले नमुनेकृषी विभागाने कापूस बियाण्यांच्या साठ्यातील नमुने एप्रिल, मे, जूनच्या सुुरुवातीला घेतले. त्या नमुन्यांचे अहवाल बाजारात बियाण्यांची विक्री होण्यापूर्वी यंत्रणेकडे येणे आवश्यक आहे, तसेच झाल्यास सदोष बियाणे साठ्याची विक्री बंद करणे शक्य आहे; मात्र अकोला जिल्ह्यात तपासणी करून आलेल्या नमुन्यांचा साठा आधीच विक्री झाला. आता त्यावर बोंडअळी आल्यास कारवाई कोणावर करणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

आठवडाभरापासून टाळाटाळ!अमरावती विभाग, अकोला जिल्ह्यातील बियाण्यांच्या तपासणीचे अहवाल संबंधित गुणवत्ता नियंत्रकांना गेल्या आठवड्यापासून मागवले; मात्र दोन्ही कार्यालयातील संबंधितांनी तपासणीची माहिती देण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. या प्रकाराने शासकीय यंत्रणा शेतकºयांच्या हितासाठी की कंपन्यांच्या, हा गंभीर मुद्दा पुढे येत आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती