शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

‘बीटी’वर बोंडअळय़ांच्या प्रतिकारक्षम पिढय़ांचा वाढला धोका!

By admin | Updated: July 14, 2014 01:23 IST

बीटी कपाशीवरील बोंडअळी प्रतिकारक्षमता वाढली असून, या कापसाच्या उत्पादनावर त्याचे प्रतिकूल परिणाम होत असल्याचे निष्कर्ष विदेशी कृषी शास्त्रज्ञांनी काढले आहेत.

अकोला : बीटी कपाशीवरील बोंडअळी प्रतिकारक्षमता वाढली असून, या कापसाच्या उत्पादनावर त्याचे प्रतिकूल परिणाम होत असल्याचे निष्कर्ष विदेशी कृषी शास्त्रज्ञांनी काढले आहेत. (रेफ्युजी) बिगर बीटीची पेरणी केल्यास मात्र या बोंडअळीला व त्यांच्या भावी पिढीला प्रतिबंध घालता येऊ शकतो, असे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे मत आहे. बीटी कापसाचे उत्पादन घ्यायचे असेल तर, त्यासोबत बिगर बीटी (रेफ्युजी) बियाणे शेताच्या बांधावर पेरणी करणे अत्यंत आवश्यक आहे. तथापि, अमेरिका, चीन या प्रगत देशातील काही भागातील शेतकर्‍यांनी बिगर बीटीचा वापरच केला नसल्यामुळे त्या भागात बोंडअळ्य़ांच्या प्रतिकारक्षम पिढय़ा निर्माण झाल्या असून, त्याचा परणिाम सरळ कापूस उत्पादनावर होत आहे. त्यामुळे या अळींच्या व्यवस्थापनासाठीचा खर्चसुद्धा वाढला आहे. विदेशी शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासातून हे निष्पन्न झाले आहे. भारतात आतापर्यंंत नैसर्गिकरित्या या अळ्य़ांचे व्यवस्थान होत आले आहे; परंतु या अळ्य़ांची वाढत चाललेली प्रतिकारक्षमता बघता भारतीय कृषी शास्त्रज्ञांपुढे हे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.सन २00२ मध्ये भारतात केवळ ५0 हजार हेक्टर क्षेत्रावर बीटी कापसाची लागवड केली जात होती. आजमितीस हे क्षेत्र ८0 ते ८५ टक्के वाढले आहे. सहा महिन्याचे हे पीक आहे. त्यामुळे या एका हंगामात कापसावर या हिरव्या बोंडअळीच्या ४ ते ६ पिढय़ा उपजीविका करतात, असा अंदाज कृषी शास्त्रज्ञांनी काढला आहे. भारतात सन २00२ पासून बीटी कापसाचा पेरा केला जात आहे. त्यामुळे या अळ्य़ांना बीटी कापसावर जगण्याची सवय होऊ लागली आहे. म्हणूनच काही विशिष्ट भागात बीटी कापसावर शेतकर्‍यांना जिवंत अळ्य़ा दिसत असून, त्यांचा काही प्रमाणात प्रादुर्भाव दिसून आला आहे. वर्षानुवर्षे ही प्रक्रिया सुरू राहिली, तर बीटी कापसामध्ये असलेल्या बोंडअळीला प्रतिबंधक विष पचविण्याची शक्ती येण्याची शक्यता वाढली असून, बिगर बीटीऐवजी बीटी कापूस हेच या अळीचे मुख्य खाद्य होण्याची भीती निर्माण झाली आहे. म्हणूनच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी बीटी कापसासोबतच बिगर बीटीची पेरणी करण्याचे आवाहन शेतकर्‍यांना केले आहे. बांधावरील बिगर बीटीवर या बोंडअळ्य़ा उपजीविका करतील, त्यामुळे प्रतिकारक्षम बोंडअळ्य़ांचे प्रमाण ५0 टक्क्यांनी घटवता येईल. तसेच या बोंडअळ्य़ांच्या प्रतिकारक्षम पिढय़ांना काही वर्ष थोपवता येईल, असे या कापूस संशोधकांना वाटते.