शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अकोट-शेगाव मार्गावरील ब्रिटिशकालीन पूल बनला धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 14:28 IST

सध्या पाणीसाठा या पुलाला टेकला असून, अथांग पाणीसाठ्यामुळे व पुलाला कठडे नसल्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलोहारा : येथील मन नदीवरील ब्रिटिशकालीन पूल धोकादायक ठरत आहे. कवठा बॅरेजचा पाणीसाठा या पुलाला टेकला आहे. या पुलाला कठडे नसल्याने तसेच पुलावरील खड्डे, साइड खचल्यामुळे २ जानेवारी रोजी शेगाव ते अकोट मार्गावरील वाहतूक एक तास बंद करण्यात आली होती. या पुलापर्यंत पाणी असल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. कठडे नसल्याने या पुलावर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.मन नदीवर पाटबंधारे विभागाच्यावतीने कवठा येथे बॅरेजचे काम पूर्ण झाले आहे. या बॅरेजच्या पाणीसाठ्यामुळे लोहारा येथील पूल पाण्याखाली जात आहे. या पुलाची उंची वाढवून नवीन पूल निर्मिती करणे गरजेची आहे; मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्याांच्या दुर्लक्षामुळे पूल निर्मितीचे काम रखडले आहे. सध्या पाणीसाठा या पुलाला टेकला असून, अथांग पाणीसाठ्यामुळे व पुलाला कठडे नसल्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. या पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात कठडे नसलेल्या या पुलावर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या पुलाची उंची वाढविण्याची तसेच कठडे बसविण्याची मागणी तंटामुक्ती अध्यक्ष महादेव तायडे, ग्रामपंचायत सदस्य जुनेद कुरेशी, प्रवीण मोरे, मुस्तफा देशमुख, अरुण बघे, आंबेद पटेल व ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)

 

टॅग्स :Akolaअकोला