शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

अकोट-शेगाव मार्गावरील ब्रिटिशकालीन पूल बनला धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 14:28 IST

सध्या पाणीसाठा या पुलाला टेकला असून, अथांग पाणीसाठ्यामुळे व पुलाला कठडे नसल्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलोहारा : येथील मन नदीवरील ब्रिटिशकालीन पूल धोकादायक ठरत आहे. कवठा बॅरेजचा पाणीसाठा या पुलाला टेकला आहे. या पुलाला कठडे नसल्याने तसेच पुलावरील खड्डे, साइड खचल्यामुळे २ जानेवारी रोजी शेगाव ते अकोट मार्गावरील वाहतूक एक तास बंद करण्यात आली होती. या पुलापर्यंत पाणी असल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. कठडे नसल्याने या पुलावर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.मन नदीवर पाटबंधारे विभागाच्यावतीने कवठा येथे बॅरेजचे काम पूर्ण झाले आहे. या बॅरेजच्या पाणीसाठ्यामुळे लोहारा येथील पूल पाण्याखाली जात आहे. या पुलाची उंची वाढवून नवीन पूल निर्मिती करणे गरजेची आहे; मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्याांच्या दुर्लक्षामुळे पूल निर्मितीचे काम रखडले आहे. सध्या पाणीसाठा या पुलाला टेकला असून, अथांग पाणीसाठ्यामुळे व पुलाला कठडे नसल्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. या पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात कठडे नसलेल्या या पुलावर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या पुलाची उंची वाढविण्याची तसेच कठडे बसविण्याची मागणी तंटामुक्ती अध्यक्ष महादेव तायडे, ग्रामपंचायत सदस्य जुनेद कुरेशी, प्रवीण मोरे, मुस्तफा देशमुख, अरुण बघे, आंबेद पटेल व ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)

 

टॅग्स :Akolaअकोला