शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

कायदा मोडू ..पण जनुकीय सुधारित बियाणे वापरूच !

By राजेश शेगोकार | Updated: June 14, 2020 22:35 IST

कायदा मोडू ..पण जनुकीय सुधारित बियाणे वापरूच !

- राजेश शेगोकार

अकोला: प्रतिबंधित एचटीबीटी बियाण्यांवरून आता शेतकरी विरूद्ध शासन असा संघर्ष उभा ठाकला आहे. अकोल्यात गेल्या वर्षी २५ जून रोजी शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने शेतकºयांनी चक्क प्रतिबंधित एचटीबीटी बियाण्याची पेरणी केली होती त्यामुळे पोलिसांनी १६ शेतकºयांवर गुन्हे दाखल केले होते. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच आता ६ जून रोजी अकोल्यातील कृषी विभागाने एका शेतकºयावर सापाळा रचून शेतकºयाला अडकविण्याचा प्रयत्न केला. कृषी विभागाला संशय होता की तो शेतकरी प्रतिबंधित एचटीबीटी बियाण्यांची विक्री करत आहे मात्र हा सापळा फसला. तो शेतकरी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता निघाल्याने आता शेतकरी संघटना शासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहे. बुधवारी शेतकरी संघटनेने जाहिरपणे ३५७ शेतकºयाना एचटीबीटी बियाण्यांचे वितरण करून सरकारच्या धोरणाला आव्हान दिले आहे. या निमित्ताने एचटीबीटी बियाण्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एचटीबीटी (रासायनिक तणनाशक सहनशील) बियाण्यांवर आपल्या देशात प्रतिबंध आहे. अशा वाणांची अर्थात जनुकीय सुधारित (जेनेटिकली मॉडिफाईड म्हणजेच जीएम) पिकांची पेरणी केल्यास शेतकºयांना उत्पादन खर्च कमी येतो आणी उत्पादनही वाढते असा दावा शेतकरी संघटेनचा आहे त्यामुळेच शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते ललीत बहाळे यांच्या नेतृत्वात आता राज्यभर किसान तंत्रज्ञान स्वातंत्र्य सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आले आहे. खरे तर जनुकीय अभियांत्रिकीचा वापर करून मुळ पिकांच्या वाणामध्ये बदल करून तयार करण्यात आलेल्या वाणास जीएम वाण म्हटल्या जाते. अशा बियाण्यांमुळे पिकांवर तणनाशकासारख्या रासायनिक प्रतिबंधात्मक प्रक्रियांचा मुकाबला करण्याची क्षमता अधिक असते त्यामुळे सहाजिकच असे वाण शेतकºयांसाठी फायदेशिर ठरतात. मुळातच एचटीबीटी हा बीटी कपाशीचाच एक प्रकार आहे. आपल्या देशात बीटी कपाशी वगळता इतर कोणत्याही जीएम पिकाची पेरणी करण्यास कायद्याने मंजुरी नाही! त्यामुळे जीएम वाणांचे फायदे शेतकºयाला मिळवून देत त्याचा आर्थिकस्तर सुधारण्याचा आग्रह शेतकरी संघटनेकडून होत असल्यानेच त्यांनी आता जाहिरपणे एचटीबीटीचे समर्थनच नव्हे तर वापरही सुरू केला आहे. या जीएम तंत्रज्ञानाला विरोध करण्यामागे प्रामख्याने जी कारणे सांगीतली जातात त्यामध्ये पर्यावरणाला हानीकारण, जैवविधिता धोक्यात आणणारे अन् मानवी शरिरावर दूष्परिणाम करणारे आहे यांचा समावेश आहे. शेतकरी संघटना हे सर्व आक्षेप खोडून काढते अशा प्रकारे नुकसान होण्याचे कोणतेही पुरावे नसल्याचा दावा त्यांच्याकडून केला जातोच शिवाय जीएम पिकांची बियाणे वापरल्यास किटकनाशकांवरील खर्च कमी होतो व उत्पादनता वाढ होते आणी आजच्या परिस्थतीमध्ये शेतकºयांचे उत्पन्न वाढविण्यासाठी ते आवश्यकच आहे असा आग्रह धरल्या जात आहे. जैव तंत्रज्ञानामुळे कापूस उत्पादनात शेतकºयांनी देशाला उच्चस्थानी पोहोचवले होते; पण या तंत्रज्ञानाचे पुढील आवश्यक टप्पे अजूनही शेतकºयांपर्यंत न पोहोचल्याने गुलाबी बोंडअळीसारख्या समस्यांनी शेतकºयांना नुकसानास सामोरे जावे लागत आहे. एकीकडे उत्पादकता ही घटली आहे, तर दुसरीकडे तंत्रज्ञानाच्या अभावाने उत्पादन खर्च कमी करता येत नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी जागतिक स्पर्धेत अडचणीत सापडत नाहीत. हे वास्तवही या निमित्ताने स्विकारल्या गेले पाहिजे. बदलत्या काळात नवे तंत्रज्ञान, नवी व्यवस्था निर्माण होत असते त्याचा स्विकारही गुणदोषासहित केल्याचे अनेक उदाहरण आहेत त्यामुळे जीएम पिकांमुळे आरोग्याला धोका निर्माण होत असेल तर तशा चाचण्या करूनच बियाण्यांच्या पेरणीस मंजूरी दिली पाहिजे मात्र या मंजूरीसाठी किती प्रतीक्षा करावी याचीही मर्यादा आहे. जगातील अनेक देशांमध्ये जीएम बियाण्यांचा वापर केला जातो आणी आपल्याकडे अजूनही बीटी, वांगी, बटाटे वा इतर पिकांच्या बाबतीत परवानगीची प्रतीक्षाच आहे. आता मात्र शेतकरी थांबायला तयार नाहीत, परवा अकोल्यात एचटीबीटीचे बियाणे वाटप करतानाच काही प्रमाण बीटी वांग्यांचे बियाणेही वाटप झाल्याचे सांगण्यात आले, पश्चीम बंगाल, हरियाणा, पंजाब या राज्यात यापूर्वीच बीटी वांग्यांची पेरणी होते असा दावा शेतकरी संघटनेचा आहे. या सर्व पृष्ठभूमीवर आता शासनाने शेतकºयांना जीएम तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यावे यासाठी तंत्रज्ञान स्वातंत्र्य सत्याग्रह आंदोलनाचे आणखी एक पर्व राज्यात सुरू होणार आहे. कोरोनाच्या काळातच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शेतकरी संघटनेच्या नेत्यांशी चर्चा करून जीएम तंत्रज्ञानाबाबत त्यांची भूमिका जाणून घेतली होती त्यामुळे शासन या तंत्रज्ञानाबाबत सकारात्मक पुढाकार घेईल अशी अपेक्षा शेतकºयांना आहेच मात्र आता कायदा मोडूनही नव्या तंत्रज्ञानाचा स्विकार करण्याची मानसिकताही तयार होत आहे. याकडे दूर्लक्ष करून चालणार नाही.

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती