शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

बोरगाव मंजूत तीव्र पाणीटंचाई

By admin | Updated: November 10, 2014 01:09 IST

१५ दिवसांपासून पाणीपुरवठाच नाही.

बोरगाव मंजू (अकोला): महान धरणातील जलसाठय़ात झालेली घट व स्थानिक प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराने बोरगाव मंजू येथील ग्रामस्थांना ऐन हिवाळय़ात पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. गत १५ दिवसांपासून गावाचा पाणीपुरवठा बंद असल्यामुळे गावकर्‍यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.बोरगाव मंजूसह परिसरातील ६४ गावांना खांबोरा योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. परंतु, महान धरणातील जलसाठा कमी झाल्याने तो अकोला शहरासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे महान धरणातून खांबोरा योजनेसाठी सोडले जाणारे पाणी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे या ६४ गावांना आता दगडपारवा धरणातील मृत साठा, दोनदचा डोह व सुकळी नंदापूर येथील कूपनलिका या ठिकाणांहून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाण्याचे हे स्रोत र्मयादित असल्यामुळे या ६४ गावांना पाणीपुरवठा करताना प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे. बोरगाव मंजूसह ६४ गावांना १५ ते २0 दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. अशातच गावातील हातपंप नादुरुस्त असल्यामुळे गावकर्‍यांना पाण्यासाठी दोन किमीपर्यंत पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. लोकांवर ऐन हिवाळय़ात पाणी विकत घेण्याची पाळी आली आहे.