शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

बोरगाव मंजूत तीव्र पाणीटंचाई

By admin | Updated: November 10, 2014 01:09 IST

१५ दिवसांपासून पाणीपुरवठाच नाही.

बोरगाव मंजू (अकोला): महान धरणातील जलसाठय़ात झालेली घट व स्थानिक प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराने बोरगाव मंजू येथील ग्रामस्थांना ऐन हिवाळय़ात पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. गत १५ दिवसांपासून गावाचा पाणीपुरवठा बंद असल्यामुळे गावकर्‍यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.बोरगाव मंजूसह परिसरातील ६४ गावांना खांबोरा योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. परंतु, महान धरणातील जलसाठा कमी झाल्याने तो अकोला शहरासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे महान धरणातून खांबोरा योजनेसाठी सोडले जाणारे पाणी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे या ६४ गावांना आता दगडपारवा धरणातील मृत साठा, दोनदचा डोह व सुकळी नंदापूर येथील कूपनलिका या ठिकाणांहून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाण्याचे हे स्रोत र्मयादित असल्यामुळे या ६४ गावांना पाणीपुरवठा करताना प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे. बोरगाव मंजूसह ६४ गावांना १५ ते २0 दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. अशातच गावातील हातपंप नादुरुस्त असल्यामुळे गावकर्‍यांना पाण्यासाठी दोन किमीपर्यंत पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. लोकांवर ऐन हिवाळय़ात पाणी विकत घेण्याची पाळी आली आहे.